सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

देशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प: अजित पवार

मुंबई, ता. २८ - केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वंकष विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीच्या भरीव तरतुदीबरोबरच डाळी, भाजीपाला, बाजरी, ज्वारीच्या उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न म्हणजे खर्‍या अर्थाने दुसर्‍या हरितक्रांतीच्या दिशेने टाकलेली दमदार पावले आहेत. कृषी पतपुरवठ्यातील एक लाख कोटी रुपयांची भरीव वाढ तसेच मांस, मासे, दूध आदींच्या उत्पादन आणि वितरणात सुलभतेसाठी आखलेल्या योजना शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार्‍या आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी केलेल्या तरतुदीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वंकष उन्नतीस हातभार लागेल .
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की सध्या अस्तित्वात असलेल्या विशाल किंवा अतिविशाल ऊर्जा प्रकल्पांना भांडवली वस्तूचा पुरवठा करणार्‍या डोमेस्टिक सप्लायर्सनां पॅरलल एक्साईज ड्यूटीतून सवलत मिळणार आहे. तसेच पीपीपी अंतर्गत प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण आणले जाणार असल्याने खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून होणार्‍या विकास कामांमध्ये सुसूत्रता येईल. अर्थमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेसाठी केलेल्या आर्थिक मदतीच्या सूतोवाचमुळे मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरणाचे भान राखण्याच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या उपाययोजना जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच महत्वपूर्ण ठरतील.
वैयक्तिक करदात्यांच्या कर मर्यादेत वाढ केल्याने सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्यात आली आहे. तसेच ८० वर्षांवरील नागरिकांना २०० रुपयांऐवजी दरमहा ५०० रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांच्या वेतनात दुप्पटीने वाढ केल्याने राज्यातील सुमारे दोन लाख जणांना त्याचा लाभ होईल. अनुसूचित जाती आणि जमातीमधील इयत्ता नववी आणि दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमुळे वंचितांच्या शिक्षणास मदत होईल.

छगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई, ता. २८ - महागाई नियंत्रणाबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीला चालना देणारा तसेच कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक दर वृद्धीचे सूतोवाच करणारा अर्थसंकल्प 'आम आदमी' ला दिलासा देणारा तसेच परिपूर्ण ठरला आहे. या शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी, केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
शेती, शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत असतानाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी त्यावर कोणताही कर न लावता आणि प्राप्तीकरमर्यादा वाढवून नोकरदार वर्गालाही दिलासा देणार्‍या या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे, असे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कृषी क्षेत्राने ५.४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली ही अत्यंत चांगली बाब आहे. ही वाटचाल आगामी वर्षातही कायम रहावी यासाठी अर्थसंकल्पात विचार केला आहे. भाजीपाला, डाळींच्या उत्पादनासाठी भरीव आर्थिक तरतूद, कृषी कर्जमर्यादा ४.७५ लाखांवर, खतांवर रोख सबसिडी, सिंचन उपकरणे व कृषी अवजार स्वस्त, कोल्ड स्टोअरेज प्रकल्पांमध्ये वाढ, फूडपार्क उभारणी असे शेतकर्‍यांच्या दृष्टीने अनेक उपयुक्त निर्णय घेण्यात आले आहेत. कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा लाभ निश्चितच मोठ्या प्रमाणात होईल. सबसिडीऐवजी रोख मदतीमुळे भ्रष्टाचारासही आळा बसेल. बटतगटांच्या विकासासाठी विशेष तरतूद करतानाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोलाचा ठरू शकतो. भारत-निर्माण योजनेसाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे देशातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून जाण्यास मोठी चालना मिळणार आहे.
शिक्षणासाठी करण्यात आलेली सुमारे ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद अत्यंत महत्वपूर्ण असून याअंतर्गत सार्वशिक्षण अभियानासाठी भरीव तरतूद केली आहे. तथापि, इयत्ता नववी व दहावीतील गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजनेच्या परीघात इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याची आवश्यकता होती. असंघटित क्षेत्रासाठीही स्वावलंबन पेन्शन योजना राबवित असतानाच ८० वर्षांवरील बीपीएलधारकांना ५०० रुपये पेन्शन, इंदिरा गांधी पेन्शन योजनेची मर्यादा ६० वर्षे, तसेच ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षांपर्यंत खाली आणणे या निर्णयांचा समाजाच्या तळागाळातील नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने व आर्थिक स्वावलंबनासह जगण्यासाठी मोठा उपयोग होईल. जीवनावश्यक वस्तू व इंधनावर एक्साईज कर न आकारण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू ठरलेल्या मोबाईल, फ्रीज स्वस्त झाल्याचा फायदाही या वर्गास होईल.
आरोग्य क्षेत्रासाठी आपण भरीव तरतूद केली असली तरी हॉस्पिटलमधील उपचारांवरील खर्च वाढविण्याऐवजी नियंत्रणात ठेवता आला असता तर अधिक बरे वाटले असते, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

कोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २५ - पर्यटकांना इतर राज्यातील पर्यटन स्थळांचा विसर पडेल इतकी पर्यटन क्षमता कोकणात आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासाकरिता राज्य शासनातर्फे सवर्तोपरी सहाय्य करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.
कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त चर्चासत्रात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनमंत्री असताना कोकणसाठी केलेल्या प्रयत्नांना तेव्हाच्या मानसिकतेमुळे अनुकूल वातावरण नव्हते, परंतू आजच्या या ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मात्र कोकणवासीयांची पर्यटनाबाबतची मानसिकता अनुकूल झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र किंवा कोकणात येणारा विदेशी पर्यटक सुमारे ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग व त्यावरील पुलांची बांधकामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास येत आहेत. रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे मात्र यात अनेक अडचणी आहेत.
पर्यटन विकासासाठी सर्व संबंधितांसमवेत तपशीलवार चर्चा करण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे सांगून भुजबळ यांनी कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला.
रायगड किल्ला व परीसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी सारस्वत बँक आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे एकनाथ ठाकूर यांनी सांगितले. कार्याध्यक्ष संजय यादवराव व सुकथनकर यांनी कोकणातील पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या शासनाने दूर करण्याची विनंती केली.

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर करणे ही पालकांची जबाबदारी आहे. याचा विसर पालकांना पडलेला दिसतो. एकीकडे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना, तयारी करताना मात्र आम्हाला मराठीचा विसर पडतो, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुद्धा सध्याची पिढी अस्खलित मराठी विसरत चालली आहे हे सहज जाणवते. मराठी बोलताना, संवाद साधताना इंग्रजाळलेली मराठी वापरायची (खानदेशी शब्द म्हणजे घुसडायची) सवय झालेली आहे. अलिकडे तसे इंग्रजी सुद्धा वाढले आहे, लोकांना इंग्रजी माध्यम वापरता येऊ लागले आहे, ही बाब चांगली कौतुकास्पद आहे. पण याबरोबर आपली मातृभाषा मराठी मागे पडत चालली आहे.
मराठी बांधव कोणत्याही प्रांतात जावो, स्थायिक झालेला असो, परंतू मराठी विसरू नये, हीच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त विनंती!

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

CIDCO organizes Vasant Mela at Urban Haat

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
The Urban Haat at Navi Mumbai has surfaced as the new happening destination for the exhibition and sale of artifacts of artisans from various states. Last year, the citizens of Navi Mumbai bought the artifacts from various states displayed at different exhibitions at Urban Haat and also experienced a great time. The exhibitions included CIDCO Navi Mumbai Festival, Kokan Saras, Maharashtra Mahotsav, Handloom Festival, Marathi Vyapari Mitramandal Mahotsav, Vasant Mela, Shravan Mela and Surabhi Dhamaka.


Now, Vasant Mela is being organized at Urban Haat from 9th to 20th March, 2011. With an objective to benefit the artists displaying their traditional folk art at the Urban Haat as well as the citizens, CIDCO aims to organize such exhibitions for the whole year at Urban Haat.

Through this appeal, Bachat Gats from all Zilla Parishads under Rural Development Department, Maharashtra, artisans related to Khadi Gramodyog Mandal as well as handloom, handicraft and food artists, sculptors and small businesses are being invited to participate in the Vasant Mela.

Any artist, NGO and Bachat Gat producing handloom, handicraft, food, herbal and floriculture products, art and paintings, books in various languages, bamboo and wooden furniture, jute, leather and terracotta products, and garden and nursery equipment can participate in this Vasant Mela in March 2011. To participate, contact Manager - Urban Haat, CBD Belapur, Navi Mumbai on 022-2756 1284 (0) / 95945 21169 (M) or e-mail manager.urbanhaat@gmail.com.





शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे.
श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाकुर्ली (ठाणे) येथे ७०० मेगावॉट क्षमतेचा गॅस पॉवर प्रकल्पही उभारला जाणार आहे. त्याचबरोबर गडचिरोलीला नव्या रेल्वे मार्गाने जोडले जाणार असल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कुठलीही वाढ न केल्यामुळे महागाई आटोक्यात राहण्यास मदत होईल. ई-तिकिटांच्या आरक्षण शुल्कातही कपात करण्यात आली आहे. शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अपंगांसाठी दिलेली सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाढीव सवलतीसह विविध घोषणांमुळे हा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने आम-आदमी चा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी श्री. पवार यांनी व्यक्त केली.

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे.
महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्राशी कोकण जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. मुंबईसाठी ४२ नवीन गाड्या, सर्व लोकल ट्रेन १२ डब्यांच्या करण्याची घोषणा देखील मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. नंदीग्राममध्ये रेल्वेसाठी औद्योगिक पार्क आणि महाराष्ट्रात ७०० मेगावॅटचा वायू आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. तथापि, पायाभूत सुविधा निर्मिती आणि कारखाने यांच्या सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष दिले गेले असते तर हा अर्थसंकल्प परिपूर्ण झाला असता, असे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

रेल्वे बजेट २०११...ठळक मुद्दे...! ५७.६३० कोटिंचे बजेट..

ममता बॅनर्जी सादर करीत असलेले रेल्वे बजेट २०११ ऐकताना माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव.
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी सादर करीत असलेल्या ५७.६३० कोटिंच्या रेल्वे बजेट २०११ चे ठळक मुद्दे...:-
* आम-आदमी अर्थात सामान्य माणसाला लक्षात घेऊन बजेट...

* सिंगूर येथे मेट्रो कोच फॅक्टरी

* रायबरेली कारखान्यातून पहिला कोच तीन महिन्यात

* अनेक गाड्यांची कोच साठी मागणी, नवीन कोच फॅक्टरींचा प्रस्ताव

* जम्मू काश्मिरमध्ये ब्रिज फॅक्टरी

* रेल्वे नेटवर्कला इम्फाळ जोडणार

* १८० किलोमीटरचा नवीन लोहमार्ग

* ८५ नवीन सार्वजनिक-खाजगी प्रकल्प

* नंदीग्राममध्ये इंडस्ट्रियल पार्क

* रेल-रोको आंदोलने थांबविण्याचे प्रत्येकास आवाहन

* रेल्वे मार्गाजवळ राहणार्‍या बेघरांसाठी १०,००० निवारे

* रेल्वे अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले.

*  ऑनलाइन बुकिंग स्वस्त होणार

* पायलट प्रोजेक्ट्समध्ये स्मार्ट कार्ड वापरले जाणार

* रेल्वेचे कर्मचारी हीच रेल्वेची मोठी संपत्ती

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंतीचे काम तातडीने मार्गी लावावे-भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - आंबोली घाटात वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. वनविभागास आवश्यक ते तांत्रिक सहकार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी करावे अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीतील कामांबाबत आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड, वनविभाग सहसचिव प्रदीप कुमार आदी उपस्थित होते.
गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या पावसाने आंबोली घाटातील १०० मीटर लांबीची आणि  ४० मीटरपेक्षाही उंचीची दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून येथील वाहतूक सुरळीत करावी लागली होती. संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेतच पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एखादी मोठी दरड कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक ते सर्व सहाय्य घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.

'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता मोहिम

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - येथून जवळच असलेल्या जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा केव्हज् असलेल्या घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातपर्फे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी) स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.
एलिफंटा केव्हज् (गुहा)नां देशासह विदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. परिणामी परिसरात प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला असून हा कचरा लाटांमुळे बेटावर जाऊन अडकतो. या कचर्‍यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०० स्वयंसेवकांसह महामंडळ, वनविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घारापुरी यांचाही मोहिमेत मोठा सहभाग असेल. स्वच्छतेनंतर प्रबोधन करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे येणार्‍या बोटींमध्येही स्वच्छताविषयी फलक लावण्यात येणार आहेत.

'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महाराष्ट्र दर्शन




मुंबई, ता. २४ - महाराष्ट्राची लक्झरी ट्रेन 'डेक्कन-ओडिसी' ने बर्‍याच कालावधीनंतर नियमित सहलमार्गावर धाव घेतली. दिनांक १६ ते २३ फेब्रुवारी २०११ या कालावधीत या गाडीतून सुमारे ७५ परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची सफर घडविली असल्याची माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) देण्यात आली.
'डेक्कन-ओडिसी' मुंबई, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, गोवा येथील प्रसिद्ध गिरजाघरे, समुद्रकिनारे, कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, ताडोबा अभयारण्य, नाशिक येथील गोदावरी घाट आणि प्रसिद्ध मंदिरे इ. ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली. सहलीदरम्यान पर्यटकांचे ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचे दर्शन घेडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या हंगामात डेक्कन ओडिसीच्या ८ सहली करण्याचा प्रयत्न होता, तथापि पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नोव्हेंबर व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेची अवास्तव हॉलेजची मागणी, सहलीच्या महसूलातील वाटा, एमटीडीसीचा सहलींवरील अन्य खर्च यामुळे सुारे २५.२१ लाख रुपयांचा तोटा झाला होता. याउलट फेब्रुवारीतील सहलीत पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिमाणशी प्रतिदिन ५०० डॉलर (रु. २२ ,५००/-) इतका आकार घेऊनही नफा कमी होणार आहे. महामंडळाने डेक्कन ओडिसीच्या काही सहली भाडेतत्वावर घेतल्या असून त्या नवी दिल्ली, आग्रा, सवाई माधोपूर, जयपूर, उदयपूर या मार्गावर धावत आहेत. या सहलींमधूनही पर्यटकांना किमान ३ दिवस महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद व अजिंठा या ठिकाणी फिरविण्यात येते.

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

कोल्हापूरच्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २३ - कोल्हापूर शहरासाठीची थेट पाणीपुरवठा योजना आणि महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वतः मान्यता दिली. शहरातील विविध कामांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर शहरासाठीच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले, की योजनेचा आर्थिक बोजा, भविष्यातील देखभाल दुरुस्ती व काम करण्याची सुलभता यांचा तौलनिक अभ्यास करून योग्य योजना राबवावी. कोल्हापूर महानगरपालिकेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे याचाही विचार व्हावा. ही थकबाकी असतानाही आम्ही नव्या योजनेसाठी विशेष बाब म्हणून निधी देत आहोत. ही योजना योग्यरित्या राबविली आणि चालविली गेली पाहिजे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक येतातय यामुळे महालक्ष्मी मंदिराचा शेगाव धर्तीवर विकास व्हायला हवा. शहरातील अंतर्गत रस्ते विकास प्रकल्पातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी करण्याची सूचना यावेळी पवार यांनी केली.
गृहमंत्री आर. आर. पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर वंदन बुचडे उपस्थित होते.

"महामानव डॉ. आंबेडकर" पुस्तकाचे भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ता. २३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची गुजराती भाषिकांना अत्यंत ओघवत्या व सोप्या भाषेत ओळख करून देण्यामध्ये हेमराज शाह यांचे "महामानव डॉ. आंबेडकर" हे पुस्तक निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत आंबेडकरांच्या लेखन व भाषणांचे २१ खंड प्रकाशित करून अद्यापही काही खंड प्रकाशित होतील, इतकी विपुल साहित्यसंपदा आंबेडकरांची आहे. तथापि, त्यांचे समग्र कार्य, विचार छायाचित्रांसह केवळ १३४ पानांमध्ये अत्यंत कुशलतेने शब्दबद्ध केले आहे. याबद्दल श्री. भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. हेमराज शाह हे मराठी आणि गुजराती भाषेस जोडणारा एक दुवा म्हणून अतिशय प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, शरद पवार आदींविषयी त्यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांची चरित्रलेखनावरील जबरदस्त पकड आणि अभ्यास यांची प्रचिती येते. श्री. शाह गेली १५ वर्षे सातत्याने गुजराती वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन करीत आहेत, ही बाबही सोपी नसल्याचे श्री. भुजबळ म्हणाले. यावेळी उदय शाह, अरविंद शाह, अशोक शाह, प्रशांत झवेरी आदी मान्यवर उपस्थित होते

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

सांज ये गोकुळी...

वसंतातल्या संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परतणारे विहग...
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
बोन्झाय- कुंडीतल्या या बोन्झाय लिंबास लागलेली फळे...
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

अमेरिकन काँग्रेसकडून भुजबळांना भेटीचे निमंत्रण

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २३ - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना अमेरिकन काँग्रेसकडून भेटीचे निमंत्रण देण्यात आलेआहे. अमेरिकेस भेट देण्याचे हे निमंत्रण तेथील संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीअंतर्गत असलेल्या आशिया-पॅसिफिक विषयक उपसमितीचे रँकिंग मेंबर एफ. एच. फॅलेओमावेगा यांनी पाठविले आहे.
श्री. भुजबळ यांना वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकन काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांची भेट घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न करता येऊ शकतील, यादृष्टीने चर्चा करण्याची अपेक्षा निमंत्रणात व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या १० जानेवारी ११ ला अमेरिकेतील नॉर्थ डकोटा प्रांताचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखाली महिला लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेतली होती. भुजबळ यांच्या भेटीमुळे प्रभावित झालेल्या अलायन्स फॉर यूएस-इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी यांनी अमेरिकन परराष्ट्र व्यवहार (आशिया-पॅसिफिक) उपसमितीचे रँकिंग मेंबर व यूएस-इंडिया ट्रेड काँग्रेशनल टास्क फोर्सचे उपाध्यक्ष एफ. एच. फॅलेओमावेगा यांना भुजबळ यांच्याविषयी सांगितल्यानंतर थेट निमंत्रणच पाठविण्यात आले आहे. उभय देशात व्यवसाय-व्यापार तसेच विविध क्षेत्रात संधींबाबत ही भेट उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

'डेक्कन ओडिसी' चे लवकरच पुनरुज्जीवन: एमटीडीसी बैठकीत निर्णय

मुंबई, ता. २२ - महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचे वैभव असलेल्या 'डेक्कन ओडिसी' या लक्झरी ट्रेनचे उत्तम पद्धतीने लवकरच पुनरुज्जीवन करून राज्यांतर्गत तिच्या अधिकाधीक सहली आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) बैठकीत घेण्यात आला. हॉलेज आकारात कपात करण्यासाठी केंद्र शासनाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा ठरावही करण्यात आला.
राज्याचे पर्यटनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. बैठकीस पर्यटन राज्यमंत्री व महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत कांबळे, पर्यटन विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर तसेच महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात इको-टुरिझमचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्र वनविकास महामंडळासमवेत सामंजस्य करार केला आहेय यानुसार संरक्षित वनहद्दीच्या बाहेर एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटक निवासासह अन्य आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. संरक्षित वनहद्दीमध्ये वनविकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्यातील पर्यटनाची प्रसिद्धी, प्रचार आणि प्रसार यासाठी देशात व परदेशात भरविण्यात येणार्‍या विविध पर्यटनविषयक शिबिरे तसेच प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन राज्यातील पर्यटनविषयक संधी अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. राज्यातील सागरी किनार्‍यांचा पर्यटन विकास करण्यासाठी तसेच त्याठिकाणी पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्णय यावेळी पर्यटनमंत्र्यांनी दिले.

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

'कसाब' ला फाशी- ऍड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन


IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
२६-११ च्या संपूर्ण मुंबई हल्ल्यामुळे जगाचे लक्ष्य ठरलेल्या नापाक कसाबला आज अखेर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम करून देशातील प्रत्येक नागरिकास न्याय मिळवून दिला आहे. या खटल्यासाठी सरकारतर्फे शिकस्त करणार्‍या ऍड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन.
(लवकरच संबंधित वृत्त वाचा)

नूतन वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकारांनी शासन स्तरावर उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १८ - नूतन वास्तूविशारद आणि अंतर्गत सजावटका कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आता शासन स्तरावरही उत्तम संधी उपलब्ध होत आहेत, याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील जे. डब्ल्यू. मॅरियॉट हॉटेलमध्ये काल रात्री नवव्या ड्युरियन सोसायटी इंटेरियर डिझाईन पुरस्कार वितरण श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, भारतीय स्थापत्यशास्त्र आणि अंतर्गत सजावट क्षेत्राला अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांनी विविध राजवटींच्या काळात विविध शैलींच्या माध्यमातून हा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याची जपणूक करतानाच ही परंपरा पुढे चालविण्याची आणि अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. अलिकडे शासन स्तरावर देखील साचेबद्ध वास्तूंच्या निर्मितीपेक्षा वैविध्यपूर्ण, आकर्षक तसेच अत्याधुनिक इमारती उभारण्यास शासन प्राधान्य देत आहे. खाजगी क्षेत्रात अधिक नावलौकिक, पैसा मिळत असला तरीही शासन स्तरावर उपलब्ध होणार्‍या संधींचा लाभ देखील कल्पक वास्तूविशारदांनी घ्यावा. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते आर्किटेक्ट व इंटेरिअर डिझाइनिंगच्या विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात आला.

उद्योग-व्यवसायातील संधीचा मराठी माणसाने लाभ घेण्याची गरज: छगन भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २० - मराठी माणसाने आता नोकरी एके नोकरी चा पाढा सोडून उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेऊन प्रगती साधण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात सॅटरडे क्लब बिझनेस एक्सलन्स पुरस्काराचे वितरणप्रसंगी केले.
ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, जीटीएल कंपनीचे संस्थापक गजाननराव तिरोडकर आणि सॅटरडे क्लबचे सर्वेसर्वा माधवराव भिडे उपस्थित होते. यावेळी तिरोडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. औरंगाबादच्या आर. जे. जोशी यांच्यासह २० विविध उद्योजकांना सन्मानित करण्यात आले.
श्री. भुजबळ म्हणाले, की मराठी माणसाने आता उद्योगाविषयीची आपली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. याला आवश्यक असलेल्या आर्थिक मार्गदर्शनासाठी माधवराव भिडे यांच्यासारखे अनेक दिग्गज आहेत. यांचे मार्गदर्शन व शासकीय पातळीवरील उपलब्ध सवलती, योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्यासाठी मराठी माणसाने पुढे येण्याची गरज आहे. यावेळी कुमार केतकर यांनी मराठी माणसाच्या उद्योगाविषयक नकारात्मक मानसिकतेची मीमांसा करताना अलिकडे अनेक मराठी उद्योजक आपल्या कार्याची पताका उंचावत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यूएफओ चे संजय गायकवाड, सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांच्यासह चेन्नई, बंगळूर, कोलकाता आदी ठिकाणचे मराठी उद्योजक उपस्थित होते.

मराठी चित्रपटांच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान द्यावे - अजित पवार

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १८ - मराठी चित्रपट निर्मितीसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
मराठी रंगकर्मींच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते. आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली नाट्य निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
नाट्यनिर्मात्यांना तांत्रिक कारणास्तव अनुदान मंजूर होत नाही, अशी अडचण सांगितल्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, की मराठी चित्रपटांना ज्या पद्धतीने अनुदान दिले जाते तीच पद्धत नाट्यनिर्मात्यांना अनुदान देण्यासाठी अनुलंबली जावी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्यगृह उभारले जावे. यासाठी जिल्हा विकास आराखड्यात निधीची तरतूद करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील. नाट्यगृहांच्या उभारणीसाठी स्थानिक आमदारांच्या विकास निधीतूनही मदत घेता येईल. तसेच नागपूर येथे आणखी एक नाट्यगृह उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यवाही करावी असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले, की विविध संस्थांना मंजूरी आणि अनुदान देण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया बदलण्यात येणार आहेत. यानंतर निर्मात्यांना अतिशय व्यवस्थित आणि अडथळ्याविना अनुदान मिळेल. आमदार हेमंत टकले, वित्त व नियोजन विभाग मुख्यसचिव सुधीर श्रीवास्तव, ज्येष्ठ अभिनेत्री व निर्मात्या स्मिता तळवलकर, लता नार्वेकर, दीपक करंजीकर, दिलीप जाधव, सुधीर भट, संतोष कोचरकर, चंदू लोकरे, प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते.

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

मध्य प्रदेशात पुन्हा थंडी

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community थंडी पूर्ण जाणार अशी चिन्हं असतानाच पुन्हा एकदा मध्य प्रदेशात थंडीने डोके वर काढले आहे. दहा अंशांच्या वर सरकत चाललेला पारा पुन्हा एकदा प्रदेशातील काही भागात रात्री दहा अंशांवर स्थिरावला आहे. महाशिवरात्री  पर्यंत थंडी अशीच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः अनेक मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.

इंदूरमध्ये भूगर्भातून आवाज?

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
शुक्रवारी (ता. 18) सकाळी सातपासून बराच वेळ शहराच्या पश्चिमेस भूगर्भातून मोठा आवाज ऐकू येत होता. विहीर खोदण्यासाठी सुरुंग लावल्यानंतर ब्लास्टिंग करताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आवाज येत होता. अनेकांनी याबाबत मोबाईलद्वारे एकमेकांकडे विचारणा केली. नेमका कुठून आवाज येत होता, हे समजू शकले नाही.

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

रस्त्यावरच्या 'ट्राफिक-जाम' मध्ये अडकले वाळवंटाचे जहाज 
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

कॉमेडी का फट़का...

बगळ्यांची माळफुले..अजुनी

वसंताच्या संध्याकाळी गच्चीत गेलो, आज काहीतरी वेगळा फोटो काढायचा असा विचार मनात घोळथच होता, इतक्यात ही मोठ्ठी बगळ्यांची रांग दिसली...चटकन क्लिक केले..नंतर ही ओळ (बगळ्यांची माळ फुले, अजुनी अंबरात...) नकळत तोंडातून बाहेर पडली...
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

पुण्याच्या चिंतन ग्रुप आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद: 11 मार्चला पारितोषिक वितरण

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
पुणे, ता. 17 - एड्स, लोकसंख्यावाढ, कुपोषण व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या व सेवा परम् कर्तव्यम् मानणाऱ्या चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'भ्रष्टाचार व प्रतिबंधक उपाय' या ज्वलंत व धगधगत्या भ्रष्टाचार या विषयाशी निगडित निबंध स्पर्धा घेण्यात आली. पुणे विद्यापीठांतर्गत समाविष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेस पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम पारितोषिक रु. 1111/-, द्वितीय 751/-, तृतीय 501/- व उत्तेजनार्थ 251/- व सर्वांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र येत्या 11 मार्चला पुण्यात कै. द. वि. निकम स्मृती पुरस्कार कार्यक्रमात मान्यवरांना देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक निलेश दिलिप कोकाटे, गेणबा सोपानराव मोझे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, येरवडा, पुणे, द्वितीय- सौरभ वसंत उबाळे, डी. ई. एस. लॉ कॉलेज, पुणे, तृतीय- अजिंक्य अनिलराव शिंदे, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव- पुणे यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ - ताई भागवत धुमसे-श्री. साईबाबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोपरगाव, परिमल दिलिप शिंदे- बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी-पुणे, सुरेंद्र तुळशीराम बनसोडे- जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय भेडा, ता. नेवासा अहमदनगर, नानासाहेब गव्हाणे- वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, रानडे इन्स्टिट्यूट डेक्कन, पुणे, चैताली मोहन साबणे- श्रीराम धामणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, म्हसरूळ शाखा, दिंडोरी रोड नाशिक, प्रत्युषा गोविंद जाधव- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, मानसी माधव कंगणे- शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ओतुर-पारनेर, अहमदनगर, प्रिया देसले- श्रीमती पुष्पाबाई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कँप, मालेगाव-नाशिक, स्मिता जयंत देंडगे- आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय, एरंडवणे-पुणे आणि रघुनाथ कोकाळे- मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर, पुणे यांना जाहीर करण्यात आले आहे. असे अध्यक्ष आनंद थोरात यांनी कळविले आहे.

Reflection

Reflection...like mirror!
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

शासनांकडून केला जातोय 'सीबीआय' चा दुरुपयोग- जोगिंदरसिंह

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
इंदूर, ता. १५ - सीबीआय ला तपास सुरू करण्यापूर्वी शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. अनेक अशी प्रकरणे आहेत, ज्यात परवानगी मिळतच नाही. शासन कोणतेही असो, प्रथम आपल्या हिताचा विचार करूनच नंतर तपासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत सीबीआयला 'फ्री हँड' मिळणार नाही, तोपर्यंत त्याचा दुरुपयोगच होत राहील. असे मत माजी सीबीआय-प्रमुख जोगिंदरसिंह यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की केवळ हातावर हात ठेवून सुवर्ण पदक मिळू शकत नाही, त्यासाठी मेहनत आवश्यक असते. कायद्यात बदल करणे सध्या नितांत आवश्यक आहे. एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, की काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास आयोगाची आवश्यकता नव्हती, ही जबाबदारी सीबीआय देखील पार पाडू शकले असते. आरुषि प्रकरणाचे कोडे अद्याप उलगडले नसल्याच्या प्रश्नावर, सीबीआय जादू ची छडी नसून साक्षीदार, पुरावे मिळून देखील देशात शेकडो आरुषिंसारखी प्रकरणे अद्याप गुलदस्त्यात पडून आहेत. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सध्या फक्त राजा यांनाच संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून अद्याप बरेच काही बाकी आहे.
विदेशी बँकांमधील काळ्या पैशासह देशात दररोज तयार होणार्‍या काळ्या पैशाकडे सुद्धा शासनाने पहावे. दररोज कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी डील होत आहेत. करचुकवेगिरी न होता केवळ आयकर जरी नियमित आणि व्यवस्थित जमा झाला, तरीसुद्धा शासकीय कोषात चांगला पैसा खेळू लागेल.

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

व्हॅलेंटाइन...अडथळा अंतराचा..!

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
दिवसभर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला काही तासांचा पण क्षणांप्रमाणे वाटणारा वेळ..भावी आयुष्य, मैत्रीच्या पुढच्या प्रवासात घालवायच्या आयुष्याची रंगविलेली स्वप्नं..रात्री झोपताना येणाऱ्या उद्याच्या कल्पनेचे कप्पे हृदयातून मनात साचवून झोपलेला तो किंवा ती...। खिडकीबाहेरून येणारा मंद वाऱ्याबरोबरचा सुवासाचा दरवळ..आणि, आणि सकाळी हळूच गालावर मोरपीस फिरल्याप्रमाणे त्याने किंवा तिने स्पर्श करून व्हॅलेंटाइन डे च्या दिलेल्या शुभेच्छा..।

एक काळ होता, त्या काळात घरातल्या महिलांनी परपुरुषाच्या समोर यायचे नाही. अगदी महत्त्वाचंच असल्यास अथवा संभाषण साधायचं असल्यास पडद्यामागे राहून बोलणी करायची..। या प्रघातामध्ये कालांतराने बदल होत जाऊन एकविसाव्या शतकात तर हे सगळं पडद्याआड गेलं आहे. वडील म्हणजे हिटलर वाटणाऱ्या मुलांना आता वडील म्हणजे मित्रच वाटू लागले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय.

मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलू नये, बघू नये..मुलीने मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू नये अशा विचारांची बैठक आता बदललीये. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम देव दर्शनासाठी मंदिरात जाणार्‍या मुला-मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोणताही किंतू, परंतु न बाळगता अथवा एकमेकांशी बोलल्यास घरचे काय म्हणतील? याचा विचार न करता एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी एकत्र जमलेली मुलं-मुली बिनदिक्कत भेटून विचारांचे आदान प्रदान करतात. पूर्वीचे अत्यंत कडक असे घरातले वातावरण सुद्धा बदललेले असून अनेक घरांमध्ये बिनधास्त वातावरण असल्याचे जाणवते. शालेय शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात जाणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या सुद्धा वाढते आहेच. माणसाचे बदललेले विचार अथवा विचारांच्या बैठकीत झालेले चांगले परिवर्तन याचे द्योतक असल्याचे मानावे लागेल.

शिक्षण घेताना एकमेकांची झालेली ओळख, या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास, गरजा यांची जाणीव होऊन अनेकदा ही मैत्री आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात बदलल्याची उदाहरणं अगदी डोळ्यासमोरची आहेत. दिवसभर घराच्या बाहेर असल्यामुळे घरच्या सदस्यांपेक्षा किंबहुना मित्र-मैत्रिणीच जवळचे वाटून त्यांच्याशी सुख-दुःखं शेअर करून डोक्यावरचं टेन्शन घालवूनच घरी परत यायचं असा मनसुबा सुद्धा अनेक मुलं रचतात आणि तशी कृती करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडं स्थैर्य आल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या लग्नाचा विषय घरात सुरू होतो..आणि सुरू होते काळजी...।   

आपलं शिक्षण सुरू असताना, इंटर्नशिप करताना, आर्टिकलशिप करताना आपल्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांशी झालेली ओळख आणि या ओळखीतूनच झालेली मैत्री, मित्र-मैत्रिणीकडून एखाद्या यक्ष प्रश्नावर दिले गेलेले सोल्युशन आणि त्याचा प्रभाव या गोष्टी हृदयाच्या एका कप्प्यात नकळत केव्हा घर करून त्यात घट्ट बसतात हे कळतही नाही.

एकमेकांना भेटून घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा केव्हा भेट होईल या विचाराने जीव कासावीस होतो, आणि जाणीव होते प्रेमाची! सध्याचे दिनमान अतिशय खराब असून संपूर्ण आयुष्य ज्याच्याबरोबर काढायचं असतं असा जोडीदार निवडणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. वृत्तपत्र, टीव्हीवर सुद्धा फसवणुकीच्या बातम्या सतत प्रसिद्ध होत असल्यामुळे चिंता असतेच..! त्यातल्या त्यात माहितीतला मुलगा किंवा मुलगी असली तर चांगलंच अशी भूमिका मन घेऊ लागतं आणि
याला आकार मिळून स्वप्नं प्रत्यक्ष साकार होण्याची प्रतीक्षा सुरू होते. दोघांची भेट झाल्यानंतर मनाची स्पंदनं सुद्धा आतून बाहेर डोकावतात आणि विचार बाहेर येतात. वडील जरी फ्रेंडली वागत असले तरीही मुलांना सगळ्यात जवळची व्यक्ती आईच वाटते नां...।

भावी आयुष्य सुद्धा सोबत काढायचं दोघांनी ठरविल्यानंतर घरी सगळ्यात आधी आईला सांगितलं जातं. नंतर आई सुद्धा योग्य वेळ पाहून वडिलांना हे सांगते आणि पुढच्या हालचाली सुरू होतात. मुलगा किंवा मुलगी काही आई-वडिलांच्या पाहण्यात असतो तर काहींना नोकरीमुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बिचाऱ्या मुलांवर संस्कारच चांगले झालेले असतात नां...। परंतू पुढच्या सोपस्कारांसाठी क्वचित प्रसंगी हे संस्कार (सध्याच्या भाषेत) आडकाठी ठरतात. मुलगी दुसऱ्या घरी जाणार अथवा मुलगा दुसऱ्याच्या मुलीला सून म्हणून घरी आणणार असतो.  यापूर्वी ती दोघं मित्र-मैत्रीण असल्यामुळे काहीच न विचारलेल्या या दोन जीवांना आता काही नां काही विचारले जाते. आई-वडिलांनी नाही विचारले तरीही तिसऱ्या पिढीतली मंडळी यांना दशकापूर्वी महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा समजला जाणारा...दोन हृदयांमध्ये अंतर निर्माण करणारा म्हणजेच जात हा मुद्दा विचारतात..आणि बिचाऱ्या तो-तिला चटकन गरगरल्यासारखे होते. सार्वजनिक ठिकाणी जातिभेद न मानणारे आजही हा प्रसंग स्वतःवर ओढवल्यास सहजासहजी मानायला तयार होत नाहीत, हे सत्य आहे. सत्य हे कटू असते म्हणतात नां, ते ही दोघं अनुभवतात. इतके दिवस आदराने पाहिल्या जाणाऱ्या या मुलाकडे, मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून आपल्या चांगल्या, हुशार मुलगा, मुलीच्या जीवनात का आले? या नजरेने कटाक्ष टाकून अक्षरशः दोघांना रडवेले केले जाते. तरीही, पालक मुलांच्या व्हॅलेंटाइन पुढे नतमस्तक होऊन त्यांना कधीही न तुटणाऱ्या गाठीत बांधणारेही पालक
या 21 व्या शतकात आहेत. यांचा आदर्श घेऊन आणि झपाट्याने पुढे सरकणाऱ्या काळाला वंदन करून फक्त आणि फक्त "मानव हीच जात" मानावी! नव्या युगाच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन काही अनुरूप नसलेले विचार बदलण्याची नितांत गरज आहे.

मुंबई मॅरेथॉनप्रमाणेच मुंबई सायक्लोथॉनही आंतरराष्ट्रीय बनविणार- भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १४ - मुंबई मॅरेथॉन आज केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली आहे. हजारो आंतरराष्ट्रीय स्पर्धक यात सहभागी होतात. आता मुंबई सायक्लोथॉनचा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे आणि यासाठी प्रयत्नांना यशही मिळत असल्याचे स्पर्धेस मिळणार्‍या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
स्पर्धेत अडथळा आणण्यासाठी दर करण्याकरिता भुजबळांची धाव
आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर सर्व स्पर्धक सी-लिंकच्या दिशेने रवाना झाले. यावेळी केबलस्टेडच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धकांची छायाचित्रे टिपण्यासाठी काही छायाचित्रकार मध्येच उभे होते. काही अक्षरश: रस्त्यावर आडवे झाले होते. आधीच्या राऊंडचे काही सायकलस्वारही नेमके याच मार्गाने उलटे येत होते. यांना भुजबळ यांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून छायाचित्रे काढण्याची विनंती केली.  स्पर्धेत सी-लिंकवरील एकूण १०४ किमी च्या १२ लॅप सुरळीत आणि उत्कंठापूर्ण पद्धतीने पार पडल्या.

अमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १३ - अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मुंबई सायक्लोथॉन 'टूर द मुंबई-२०११' मध्ये आज अमेरिकेच्या रेडिओशेक टीमच्या रॉबी हंटर याने राजीव गांधी सागरी सेतूच्या साक्षीने १०४ किमी. चे अंतर पार करून विजेतेपद पटकाविले. इटलिच्या लिक्विगॅस टीमचा इलिया व्हिव्हियानी आणि यूके मोटरपॉईंट टीमच्या जॉनी एकव्हॉय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे १५ हजार, सहा हजार आणि तीन हजार युरोचे बक्षीस मिळाले.
भुजबळ फाऊंडेशन, आयडी स्पोर्ट्स, युनियन सायक्लिक इंटरनॅशनल आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये १२ देशांचे विविध संघ तसेच तीन देशांच्या राष्ट्रीय संघांच्या सुमारे १०८ स्पर्धकांनी भाग घेतला. यासह २८ किलोमीटरची ऍमॅच्युअर राईड, प्रत्येकी १५ किलोमीटरच्या कॉर्पोरेट व ग्रीन राईड्स, ३ किलोमीटरची किड्स राईड अशा अन्य विभागांमध्ये एकूण ९५०० पेक्षा अधिक सायकलस्वारांनी सहभागी होऊन "पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा" हा संदेश दिला.
१२ आंतरराष्ट्रीय संघांव्यतिरिक्त भारताच्या स्पर्धकांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यात अमरदीपसिंग, सी. राजेश (दोघेही भारतीय रेल), सोम वीर, विनोद मलिक, सतबीरसिंग व अतुल कुमार (सर्व इंडियन आर्मी) यांचा समावेश होता. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, कृपाशंकर सिंह, आमदार पंकज भुजबळ आदींच्या हस्ते फ्लॅग राईड करण्यात आले. आयडी स्पोर्ट्स चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अकील खान यांनी परीश्रम घेतले. डेव्हिड मॅक्वेड यांनी रेस डिरेक्टर म्हणून काम पाहिले.

इटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्नाटकचा साबू गांगर राष्ट्रीय स्पर्धेत विजेते

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
नाशिक (वार्ताहर) - नाशिक फेस्टिव्हल निमित्ताने भुजबळ फाऊंडेशन आणि आयडी स्पोर्ट्स आयोजित आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा शुक्रवारी नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाली. इटलीच्या 'लिकवी गॅस' टीमचा विवियानी इलिया तर राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचा साबू गांगर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे सहा हजार युरो आणि सव्वालाख रुपयांचे बक्षीस राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकचे खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
स्वीस येथील इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन, द युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आणि इंडियाज सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारतात 'टूर द मुंबई' ही नाशिक आणि मुंबई येथे दोन टप्प्यात सायक्लॉथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी मुंबईत संपन्न झाला. नाशिकच्या स्पर्धेत सुमारे पाच हजार दोनशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. यात १०८ आंतरराष्ट्रीय, ६८ राष्ट्रीय स्पर्धक होते. उर्वरित स्पर्धकांमध्ये नाशिक शहरातील आम नागरीक, तरुण तरुणी आदींचा समावेश होता. सुमारे २५ हजार नाशिककरांनी विविध रेस पाहिल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांची मुख्य रेसपुर्वी सेरेमोनियल राईड झाली. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जिंजर हॉटेलपासून ही राईड निघाली.
दरवर्षी फ्रान्समध्ये आयोजित केल्या जाणार्‍या टूर द फ्रान्स या स्पर्धेप्रमाणेच भारतात आयडी स्पोर्ट्सतर्फे टुर द मुंबई ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा गेल्या वर्षापासून घेत असल्याचे स्पोर्ट्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अकील खान यांनी सांगितले. दरवर्षी स्पर्धेत नवनवीन शहरे वाढविली जातील असेही ते म्हणाले.
संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग मुळे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याचा मुख्य उपाय म्हणजे इंधनाचा कमी वापर करणे, यामुळेच 'बर्न फॅट्स, नॉट फ्यूएल' हे घोषवाक्य बनवून भुजबळ फाऊंडेशनने सायकलिंगचा प्रचार प्रसार करण्यासाठी 'चरबी जाळा, इंधन वाचवा' हा पर्यावरण रक्षणाचा संदेश सायकल स्पर्धेद्वारे दिल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
स्पर्धेत अमेरिकेच्या रॅडिओशॅक चा मॅकवेन रॉबी याला द्वितीय तर दक्षिण आफ्रिकेच्या टीम बोनीटास चा डे टायटलर याला तृतीय क्रमांक मिळाला. यांना अनुक्रमे तीन हजार, दीड हजार युरो चा धनादेश देण्यात आला. राष्ट्रीय स्पर्धेत ६३ किमी च्या राईडमध्ये कर्नाटकचा साबू गांगर यांना सव्वा लाखाचे प्रथम बक्षीस तर दिल्लीच्या सचिन कुमार यांना ८५ हजाराचे तर कर्नाटकच्या श्रीधर सावनूर यांना ६५ हजाराचे बक्षीस देण्यात आले.

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

'गुरू' ची मागणी अमान्य करण्यातच शहाणपण...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरू याने आपल्याला जम्मू-काश्मिर येथील तुरुंगात हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. शासनाने गुरूची ही मागणी सपशेल अमान्य करावी. फाशीची शिक्षा ठोठावण्यात या देशद्रोह्याला अद्याप फाशी झाली नाही, परंतू त्याची मागणी शासन अमान्य करीत असल्याचे ऐकून तरी या हल्ल्यात क्षती पोहोचलेल्यांच्या कुटुंबियांना धन्य वाटेल.
संसदेवर हल्ला करून संसदेचे किंबहुना संपूर्ण देशाचेच पावित्र्य आणि शांतता भंग करणार्‍या अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावून बरेच दिवस उलटले. परंतू दुर्दैवाने अद्याप यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणेने त्वरीत सडेतोड प्रत्युत्तर देऊन चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठविले हे कौतुकास्पद आहे. मुंबई हल्ल्यातील एकमेव आरोपी अजमल कसाब यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्याच्या फाशी संदर्भात आपला निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय होईल तेव्हा होईल, परंतू देशद्रोही, अतिरेक्यांच्या फाशीसाठी इतका विलंब होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा आणि शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. वास्तविक अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या कार्यवाहीसाठी, घातपाती कृत्त्यांबाबत, अतिरेकी कारवायांबाबत, घातक कृत्त्यांबाबत शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून अल्पावधीत निर्णय देणे आवश्यक आहे.
अफजल गुरू याने आपल्याला दिल्लीच्या तिहार कारागृहातून हलवून जम्मू-काश्मिर च्या कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी नुकतीच केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने शासनाकडे काही विचारणा केली आहे. गुरू याने संसदेवर हल्ला करताना हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या तसेच कायमची क्षती झालेल्या सुरक्षा कर्मचारी अथवा संबंधितांच्या कुटुंबियांच्या झालेल्या अवस्थेचा विचार तेव्हा केला नसावा. आपले कुटुंबीय जम्मू-काश्मिर येथे रहात असून आपल्याला भेटण्यासाठी येथे येणे त्यांना अडचणीचे होत असल्यामुळे आपल्याला जम्मू-काश्मिर कारागृहात हलविण्यात  यावे अशी मागणी त्याने केली आहे. संसदेवरील हल्ल्यात क्षती झालेल्या कुटुंबियांना तर त्यांच्या व्यक्तीस कायमचे गमवावे लागले आहे. त्यांची व्यक्ती त्यांना पुन्हा कधीही न भेटण्यासाठी देशासाठी बलिदान देऊन भारतमातेच्या कुशीत सामावली आहे. शासनाने याचे भान ठेवून गुरू याची कोणतीही मागणी मान्य न केल्यास खरोखर शहाणपणाचा निर्णय ठरेल, हाच विश्वास!
देशात झालेले अतिरेकी हल्ले:
१२ मार्च १९९३ - मुंबई - २५७ ठार
१४ फेब्रुवारी १९९८ -  कोईम्बतूर - ४६ ठार
१ ऑक्‍टोबर २००१ - जम्मू-काश्‍मीर विधानभवन - ३५ ठार
१३ डिसेंबर २००१ - नवी दिल्ली येथे भारतीय संसदेवर हल्ला
२४ सप्टेंबर २००२ - अक्षरधाम मंदिरावर हल्ला - ३१ ठार
१४ मे २००३ - जम्मूच्या लष्करी तळावर हल्ला - ३० ठार
२५ ऑगस्ट २००३ - मुंबईत कार बॉम्बचा स्फोट - ५२ ठार
१५ ऑगस्ट २००४ - आसाममध्ये स्फोट - १६ ठार
५ जुलै २००५ - अयोध्येत हल्ला
२९ ऑक्‍टोबर २००५- नवी दिल्ली तीन जागी बॉम्बस्फोट - ७० ठार
७ मार्च २००६ - वाराणसी येथे बॉम्बस्फोट - २१ ठार
११ जुलै २००६ - मुंबई लोकल रेल्वेगाड्यांत सात बॉम्बस्फोट - सुमारे २०० पेक्षा अधिक ठार
८ सप्टेंबर २००६ - मालेगाव मशिदीत बॉम्बस्फोट - ३७ ठार, सुमारे १२५ पेक्षा अधिक जखमी
१८ मे २००७ - हैदराबाद मक्‍का मशिदीवर हल्ला - ४ पोलिसांसह १३ ठार
२५ ऑगस्ट २००७- हैदराबाद लुम्बिनी पार्कमध्ये स्फोट - ४२ ठार
१३ मे २००८ - जयपूर - बॉम्बस्फोटांची मालिका - सुमारे १०० पेक्षा अधिक ठार

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

शुक्रवारी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या रविवारी दि. १३ फेब्रुवारी, २०११ रोजी मुंबई सायक्लोथोनचे (Tour-de-Mumbai-2011) आयोजन करण्यात आले आहे. या सायक्लोथोनचे प्रमुख आयोजक असलेल्या आय. डी. स्पोर्ट्सच्या वतीने सायक्लोथोन च्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध फशन डिझायनर नीता लुल्ला यांच्या कलेक्शनचा फेशन शो नुकताच मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी ramp वर सायकल चालवून उपस्थिताना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि सायकल चालवण्याचे महत्व सांगितले. सायक्लोथोन मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, नीता लुल्ला आणि आय. डी. स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अकिल खान उपस्थित होते.

झाडावरील नारळ काढण्याची समस्या


IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
पर्यावरण संतूलनासाठी गेल्या काही वर्षात लोक चांगलेच जागरूक झाले असून घरासमोर विविध झाडे, वेली, वृक्ष लावून पर्यावरणावरचे आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी नारळाचे वृक्ष देखील लावण्यात आले असून ठिकठिकाणाच्या नारळाच्या झाडांना फळे लागत असल्याचे दिसते. परंतू नारळाची झाडे बरीच उंच असल्यामुळे झाडाला लागलेली फळं काढता येणे शक्य होत नाही. झाडावरील फळं (शहाळे) काढण्यासाठी नारळाच्या झाडावर चढणारे भरपूर पैसे घेत असल्याची तक्रार असून यापेक्षा फळ झाडावरच असलेले चांगले अशी भावना लोकांची झाली आहे.

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

टीम से बाहर रखनें पर "हसी" को 'हसी'...

आगामी विश्वचषक क्रिकेट मैचों से ऑस्ट्रेलिया टीम के फ़िल्डर मायकल हसी इन्हें बाहर रखा गया है। चयन समिती के इस निर्णय से हसी को हसी आयी है। इंग्लैंड के ख़िलाफ एकदिवसीय मैच में हसी ज़खमी हुए थे। उनकी इस ज़खम से खिलवाड कर चयन समिती नें हसी इनके दिल को ठेंस पहुचाई है, और समिती के निर्णय पर हसी आ रही है, ऐसा श्रीमान हसी इन्होंनें वक्तव्य किया है।

इंदूरच्या किमान तापमानात वाढ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
११ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेल्या इंदूर शहराच्या किमान तापमानात गेल्या दोन दिवसापासून दोन अंशांनी वाढ झाली असून काल (ता. ९) शहराचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसाचे तापमान  देखील वाढतच असून रात्री देखील काही घरांमध्ये पंखे सुरू करण्याची गरज भासत आहे.

सिडकोतर्फे औरंगाबाद झालरक्षेत्राचा विकास आराखडा प्रसिद्ध

औरंगाबाद, ता. ९ - सिडकोने औरंगाबाद महानगर पालिका हद्दीलगत २८ गावातील १५००० हेक्टर क्षेत्राच्या औरंगाबाद झालर क्षेत्राकरिता प्रारूप विकास आराखडा ३ फेब्रुवारीला महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध केला आहे.
या आराखड्यात समाविष्ट प्रस्ताव, तपशिलात्मक अहवाल आणि विकास नियंत्रण नियमावली संदर्भात इच्छुकांकडून सूचना व हरकती मागविण्यासाठी ७ फेब्रुवारी २०११ रोजी वृत्तपत्रांमधून जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. शासनपत्रात ही जाहीर सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात इच्छुकांनी आपल्या सूचना व हरकती सादर कराव्यात. हा प्रारूप विकास आराखडा अवलोकनार्थ सिडको च्या निर्मल, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात तसेच नियोजन विभाग, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई आणि सिडको कार्यालय,  नवीन औरंगाबाद येथे उपलब्ध आहे.
तसेच हा आराखडा परिशिलनाकरिता जिल्हाधिकारी औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद मुख्य प्रशासक (नवी शहरे), सिडको नवीन औरंगाबाद, उपसंचालक, नगर नियोजन विभाग, औरंगाबाद, सहाय्यक संचालक, नगर नियोजन विभाग औरंगाबाद, तहसिलदार औरंगाबाद आणि संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
प्रारूप आराखड्याचा प्रस्ताव, नियमावली आदी तपशिलासह अध्ययनाकरिता सिडकोच्या संकेत स्थळावर (www.cidcoindia.com) औरंगाबाद फ्रिंज एरिया लिंकवरून डाऊनलोड करता येईल. हा संपूर्ण आराखडा विक्रीकरिता सिडको कार्यालय नवीन औरंगाबाद येथेही उपलब्ध आहे. या संदर्भातील आपल्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात मुख्य प्रशासक (नवीन शहरे), सिडको कार्यालय, उद्योग भवन, नवीन औरंगाबाद येथे सादर कराव्या, असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

फुलला वसंत...

वसंत पंचमी म्हणजेच प्रफुल्लित मन, टवटवी, हिवाळ्याने सुस्तावलेल्या चराचर सृष्टीला ऊब देऊन फुलं उमलली नाहीत, कोकिळेचे कुंजन आणि सृष्टीचे गुंजन स्वर ऐकू आले नाहीत, तर नवलच...!!!
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

राज्यात इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार

मुंबई, ता. ७ - राज्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची तसेच काही पथकर नाके बंद करण्याची शिफारस आज संबंधित समित्यांनी प्रस्तावित केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पथकराचे धोरण अधिक पारदर्शी होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा आवश्यक असल्याचे सुचविले होते. त्या अनुशंगाने शासनाने तीन स्वतंत्र समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांची बैठक गेल्या महिन्यात श्री. भुजबळ यांनी दोनदा घेतली होती. आज सायंकाळी रामटेक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या समित्यांनी केलेल्या शिफारशींची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, की खाजगीकरणाचे धोरण व पथकर प्रणाली रस्त्यांच्या विकासासाठी जागतिक स्तरावर देशात वापरली जाते. राज्यातही या पद्धतीचा अवलंब करून सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्पही राज्यातच राबविला गेला. या धोरणामुळे रस्ते विकासात खाजगी गुंतवणूक होऊन राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद कमी वाहतुक असलेल्या रस्त्यांकडे (ग्रामीण मार्ग, अन्य जिल्हा मार्ग इ.) वळविणे शक्य होते. श्री. हजारे यांच्या सूचनेनुसार, खाजगीकरणांतर्गत प्रकल्पांमधील पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या पथकर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर गोळा करण्याविषयी आणि पथकर स्थानकांवरील  अडचणी दूर करून वाहतुकीस अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याविषयीच्या स्वतंत्र ३ समित्यांची स्थापनाने शासनाने केली. यात मुख्य अभियंता स्तरावरील अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली असून त्यात डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, खाजगीकरण वि षयातील तज्ज्ञ तसेच सुचविण्यात आलेले प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या समित्या अभ्यास करीत आहेत.
राज्यातील विविध पथकर स्थानकांवर दररोज जमा होणार्‍या पथकराची एकत्रित माहिती शासनाकडे उपलब्ध होण्यासाठी 'सी-डॅक' ने विकसित केलेली संगणक प्रणाली वापरावी आणि ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करावी. काही मोठ्या पथकर स्थानकांवर सुरवातीस प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर गोळा करावा. प्रक्रियेतील अडचणींचा आढावा घेऊन ही प्रणाली संपूर्ण राज्यभर बसविण्याची शिफारस पहिल्या समितीने केली आहे.
राज्यात ई-टॅग योजना अंमलात आणून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर वसुली करण्यासंबंधी कार्यवाही करावी. जेणे करून प्रवाशांचा वेळ पथकर स्थानकांवर वाया जाणार नाही. प्रारंभी मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे औरंगाबाद जालना रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू तसेच मुंबईतील एंट्री पॉईंट्स येथे प्रायोगिक तत्वावर राबवावी असे प्रस्तावित केले आहे. यातील अडचणी जाणून नंतर राज्यभर ही योजना राबवावी अशी शिफारस दुसर्‍या समितीने केली आहे.
तिसर्‍या समितीने राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ५६ पथकर नाके, राष्ट्रीय महामार्गावरील २८ पथकर नाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील ६१ पथकर नाके अशा एकूण १६५ पथकर स्थानकांचा अभ्यास केला. या नाक्यांदरम्यानच्या अंतराचा अभ्यास करून काही नाकी बंद करण्याची शिफारस देखील समितीने केली आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पथकर नाक्यांवर काही सुविधा व सुधारणाही प्रस्तावित केल्या असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

लवकरच मासिक राशीभविष्य...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community आपल्या सर्व वाचक, मित्रमंडळी, हितचिंतक आणि ज्येष्ठ श्रेष्ठांच्या छान प्रतिसादामुळे या छोट्याशा ब्लॉगवर आणखी काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचे मासिक राशीभविष्य यापुढे आपणांस दरमहा या ब्लॉगवर वाचता येईल.
धन्यवाद..

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...