Chattarpur (Delhi) Maa Katyayani Devi Temple Campus: Hanuman, Maruti.
भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती..
गुरुवार, २९ एप्रिल, २०१०
शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०
"पुस्तक दिवस" निमित्त...
माझंही एक स्वप्न होतं: मी मोठा होईन, लेखक होऊन एक छानसं पुस्तक लिहिन...वाचकांच्या खूप खूप प्रतिक्रिया मिळवेन...पण, पण, पण काय? शेवटी उलटंच झालं. या पुस्तकामुळे बरंच काही आणि सर्व काही होत असतं. खूप खूप पुस्तकं वाचली असती, तर ते सहज शक्य झालं असतं, पण तेव्हा आजच्या इतकी अक्कल नव्हती नां, पुस्तकं फाडणं जास्त माहित होतं. इतकं तरी ठीक आहे, की 'थोडी फार' नाही तरीही 'फार थोडी', पुस्तकं वाचल्यामुळे आज इतकं तरी करू शकतोय. पण बरोबरीचे मित्र कुठल्याकुठे निघून गेले याचं "शल्य" बोचतयं मनातल्या मनात, पण सांगू कोणाला? "कर्म" माझं, काही इलाज नाही. आज 'पुस्तक दिवस' या मथळ्यामुळे काहीतरी उगाच लिहावसं वाटलं, म्हणून ही गिचमिड...
आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक...। किंबहुना पेपर म्हणजेच कागदाचे महत्वच दिवसेंदिवस वाढत आहे.
कॉम्प्यूटरमध्ये रेकॉर्ड जरी फीड केले जात असले, तरीही त्याची दखल, नोंद घेणे आवश्यक असतेच. विविध प्रकरणांमध्ये, घटनांमध्ये पुरावा म्हणून प्रत्यक्ष कागद, पुस्तकच वापरले, सादर केले जाते. लहानपणी शाळेत विद्यार्थ्यांना, पुस्तकी कीडा व्हा...असा उपदेश केला जातो. कित्ता गिरवण्याचे बाळकडू पाजले जाते. प्राचीन काळापासूनच पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगता येईल, अगदी जुने ग्रंथ पाहा, ते देखील कागदावरच रचून त्याचा ग्रंथ तयार करण्यात आल्याचे दिसून येते. पुस्तक वाचण्यासाठी काही तास लागत असले, किंवा छोटेसे वाटत असले, तरी त्याची निर्मिती वाटते तितकी सोपी नाही. जसं आपण जेवण अवघ्या काही मिनिटात करतो, परंतु त्यासाठी स्वयंपाक करणार्या व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागते? अगदी हे असेच आहे. पे आणि पै म्हणजेच पेपर अर्थात कागद आणि पैसा हे दोन प्रमुख घटक असून यावरच सगळे पुढचे अवलंबून असते. अनेकदा तर दोन्ही घटकांमुळे पुस्तकाचा आकार कमी-जास्त करावा लागतो. पुस्तक-निर्मितीचे एखादे पुस्तक वाचून निर्मिती जरी केली, तरी या गोष्टी प्रत्यक्ष कार्याला सुरवात केल्यानंतरच अनुभवता येतात. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे, एकच ओवी अनुभवावी..।
एक मात्र आहे, की पूर्वी मोठ्या आकारात असलेली अनेक पुस्तकं आज विज्ञानाच्या चमत्कारामुळे त्यांचा आकार लहान करता येणे शक्य झाले आहे.अगदी मुठीत मावेल इतक्या लहान आकारात "गीता" उपलब्ध आहे. यानंतरच्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती आणि विकास होऊन संगणकाचा शोध लागून हाच शोध माणसाच्या प्रगतीला पोषक ठरणारा अक्षरशः "टर्निंग पॉईंट" ठरला. आजकाल तर ई-पुस्तकं सुद्धा इंटरनेटवर दिसू लागली आहेत. सीडी,डिव्हीडीमध्ये मोठे पुस्तक सहजगत्या संग्रहित करता येते. पुस्तकंही इतिहासाप्रमाणेच अनेक वर्ष टिकतात, पुस्तक सातासमुद्रापार नाही गेले, तरी लेखकाला सातासमुद्रापार नेते किंवा लेखक सातासमुद्रापार नाही गेला, तरीही त्याचे पुस्तक त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सातासमुद्रापार नेते. एकच आहे, पुस्तकाला भीती असते, ती 'कसर' पासून, अर्थात वाळवीपासून. ही वाळवी पुस्तक पोखरताना कोणतीही 'कसर' बाकी ठेवत नाही, सगळी कसर काढून घेते. यावर उत्तम उपाय म्हणजे संगणक (कॉम्प्यूटर) चा आधार घेणे...।
वर सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचनामुळे माणुस विद्वान होतो, जगात त्याची वाहवा होते. पुस्तकाचे एखादे पान जरी वाचले तरीही तेवढी विद्या प्राप्त होऊ शकते. म्हणतात नां - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच चिन्तयेत्...। एक सुभाषित आठवले, ते सांगतो आणि वेळेअभावी विषयाला पूर्णविराम देतो...
सुभाषित असे आहे- स्वदेशेशु धनं विद्या विदेशेशु धनं मति। परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वैधनं।(अर्थात, आपल्या देशात विद्या हेच धन असते, या धनाचे मूल्य विदेशात बुद्धी म्हणून केले जाते, तसेच चांगले चारित्र्य हे सर्वत्र धनासारखे असते.)
आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक...। किंबहुना पेपर म्हणजेच कागदाचे महत्वच दिवसेंदिवस वाढत आहे.
कॉम्प्यूटरमध्ये रेकॉर्ड जरी फीड केले जात असले, तरीही त्याची दखल, नोंद घेणे आवश्यक असतेच. विविध प्रकरणांमध्ये, घटनांमध्ये पुरावा म्हणून प्रत्यक्ष कागद, पुस्तकच वापरले, सादर केले जाते. लहानपणी शाळेत विद्यार्थ्यांना, पुस्तकी कीडा व्हा...असा उपदेश केला जातो. कित्ता गिरवण्याचे बाळकडू पाजले जाते. प्राचीन काळापासूनच पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगता येईल, अगदी जुने ग्रंथ पाहा, ते देखील कागदावरच रचून त्याचा ग्रंथ तयार करण्यात आल्याचे दिसून येते. पुस्तक वाचण्यासाठी काही तास लागत असले, किंवा छोटेसे वाटत असले, तरी त्याची निर्मिती वाटते तितकी सोपी नाही. जसं आपण जेवण अवघ्या काही मिनिटात करतो, परंतु त्यासाठी स्वयंपाक करणार्या व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागते? अगदी हे असेच आहे. पे आणि पै म्हणजेच पेपर अर्थात कागद आणि पैसा हे दोन प्रमुख घटक असून यावरच सगळे पुढचे अवलंबून असते. अनेकदा तर दोन्ही घटकांमुळे पुस्तकाचा आकार कमी-जास्त करावा लागतो. पुस्तक-निर्मितीचे एखादे पुस्तक वाचून निर्मिती जरी केली, तरी या गोष्टी प्रत्यक्ष कार्याला सुरवात केल्यानंतरच अनुभवता येतात. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे, एकच ओवी अनुभवावी..।
एक मात्र आहे, की पूर्वी मोठ्या आकारात असलेली अनेक पुस्तकं आज विज्ञानाच्या चमत्कारामुळे त्यांचा आकार लहान करता येणे शक्य झाले आहे.अगदी मुठीत मावेल इतक्या लहान आकारात "गीता" उपलब्ध आहे. यानंतरच्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती आणि विकास होऊन संगणकाचा शोध लागून हाच शोध माणसाच्या प्रगतीला पोषक ठरणारा अक्षरशः "टर्निंग पॉईंट" ठरला. आजकाल तर ई-पुस्तकं सुद्धा इंटरनेटवर दिसू लागली आहेत. सीडी,डिव्हीडीमध्ये मोठे पुस्तक सहजगत्या संग्रहित करता येते. पुस्तकंही इतिहासाप्रमाणेच अनेक वर्ष टिकतात, पुस्तक सातासमुद्रापार नाही गेले, तरी लेखकाला सातासमुद्रापार नेते किंवा लेखक सातासमुद्रापार नाही गेला, तरीही त्याचे पुस्तक त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सातासमुद्रापार नेते. एकच आहे, पुस्तकाला भीती असते, ती 'कसर' पासून, अर्थात वाळवीपासून. ही वाळवी पुस्तक पोखरताना कोणतीही 'कसर' बाकी ठेवत नाही, सगळी कसर काढून घेते. यावर उत्तम उपाय म्हणजे संगणक (कॉम्प्यूटर) चा आधार घेणे...।
वर सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचनामुळे माणुस विद्वान होतो, जगात त्याची वाहवा होते. पुस्तकाचे एखादे पान जरी वाचले तरीही तेवढी विद्या प्राप्त होऊ शकते. म्हणतात नां - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच चिन्तयेत्...। एक सुभाषित आठवले, ते सांगतो आणि वेळेअभावी विषयाला पूर्णविराम देतो...
सुभाषित असे आहे- स्वदेशेशु धनं विद्या विदेशेशु धनं मति। परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वैधनं।(अर्थात, आपल्या देशात विद्या हेच धन असते, या धनाचे मूल्य विदेशात बुद्धी म्हणून केले जाते, तसेच चांगले चारित्र्य हे सर्वत्र धनासारखे असते.)
गुरुवार, २२ एप्रिल, २०१०
वसुधैव कुटुंबकम्...स्वप्न कधी साकार होणार?
आज (२२ एप्रिल) वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो, आनंद वाटतो, परंतु संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब अर्थातच वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना, हे स्वप्न कधी साकार होणार ? खरंतर हे कोडंच आहे. इतकं मात्र म्हणता येईल, की अनेक पाकळ्या असलेल्या या फुलाची एक-एक पाकळी आता उलगडू लागल आहे. अनेक बडी राष्ट्र पृथ्वीचं रहस्य उलगडण्याच्या मागे सध्या लागली आहेत. यासाठी महाकाय अशी यंत्रणा सुद्धा राबवली जातेय. सुरवातीलाच यात दोष निर्माण झाला, तरीही हिंमत न हारता पुन्हा नव्याने सुरवात करून नव्या जोमाने मोहिम-शोध-कार्य सुरूच आहे. दुसरा भाग सांगायचा झाल्यास पृथ्वी एक आहे, पण इथे अनेक जाती-धर्म, भेद-भाव, राज-कारणं आहेत. अनेक देशांमध्ये हिंसा सुरूच आहे, निष्पाप मरताहेत, हिंसा करणारे मात्र हातावर तुरी ठेवून पसार होण्यात यशस्वी होत आहेत. हे सगळं का होतयं, केवळ सत्तेसाठीच नां? देशप्रेम राहिलं कुठे आता? असे अनेक प्रश्न निकाली काढण्याऐवजी माणसांऐवजी त्यांनाच जीवंत ठेवण्यात अनेक ठिकाणच्या सरकारांना स्वारस्य आहे. विविध देशांमध्ये बराच मोठा भाग नक्सलवादी, अतिरेकी, विघातक ताकदींच्या हातात आहे. याला जबाबदार कोणाला ठरवावे? हे सर्व का चालले आहे? केवळ पोटासाठी-खिशासाठीच नां? पण इतर निष्पापांनाही मनं आहेत, त्यांचेही कुटुंब आहे, त्यांची वाट पाहणारे घरी कोणीतरी आहेत, त्यांची तरी कदर व्हावी. बिचारी पृथ्वी...दररोज किती घटना पहाव्या लागताहेत तिला...सचेत असूनही अचेत व्हावे लागते आहे तिला, ते सुद्धा नाईलाजाने...एक दिवस नक्की येईल, तेव्हा माझी सर्व बाळं एकत्र येऊन जाती-भेद विसरून फक्त अखील मानव-माणूस म्हणूनच जीवन व्यतीत करेल आणि मी सुखी होईन...असं तिला नक्कीच वाटत असणार। "सर्वे भवंतु सुखिनः संतू निरामय"...असं माणसाचं निरामय जीवन पाहण्यासाठी सृष्टी आणि पृथ्वी रचयित्याचे डोळेही आसुसलेले असणारच...।
महाबलि
महाबलि
बुधवार, २१ एप्रिल, २०१०
शुक्रवार, ९ एप्रिल, २०१०
गुरुवार, १ एप्रिल, २०१०
इंटरनेट गावोगावी पोहोचणार, पण..
अजूनही घराघरात कॉम्प्यूटर नाही....
अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही....
अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे....
अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत....
अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो....
अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात....
अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत....
अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही....
अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!
अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही....
अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे....
अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत....
अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो....
अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात....
अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत....
अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही....
अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...












