Dajikaka Gadgil लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Dajikaka Gadgil लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने महान उद्योजक हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवसायातील कारागिर आणि कामगारांच्या श्रमांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे आपल्या यशाचं श्रेय त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच यशात सहभागी करुन घेतलं, यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
माणसं जोडणं, संघटना बांधणं, लोकांच्या हक्कांसाठी लढणं, संकटांच्या-अडचणींच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं या आपल्या स्वभावगुणांमुळे त्यांनी पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. पुणेकरांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. अनेक मानसन्मानांनी त्यांचा गौरव केला. दाजीकाकांनी त्यांच्या पत्नी कमलाबाईंच्या निधनानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने न उतरवता ते वैकुंठधामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच ठेवून देण्याचा निर्णय घेतला होता. लातूर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भरीव निधी उभारण्यातही त्यांचा पुढाकार होता. अशा अनेक घटनांमधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी सिद्ध करुन दाखवली. त्यांच्यासारखा उद्योजक आणि उमद्या मनाचा माणूस निघून जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...