महानगरपालिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
महानगरपालिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४
564 ग्रामपंचायतींच्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई दि. 16 – एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा, उल्हासनगर, सोलापूर, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा तसेच जामनेर, अकोले, अक्कलकुवा, अहमदपूर आणि पोंभुर्णा या पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत राज्यातील 22 जिल्ह्यातील एकूण 564 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.
या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवार दि. 4 मार्च ते शनिवार दि. 8 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 10 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 12 मार्च 2014 हा असेल.
नगरपरिषद निवडणुकांसाठी शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी ते शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून शनिवार, दि. 1 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे सोमवार दि. 10 मार्च 2014 हा व अपिल असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी असेल.
उल्हासनगर, सोलापूर, व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका प्रभागातील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी व ठाणे महानगरपालिकेच्या 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 25 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 4 मार्च 2014 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. बुधवार, दि. 5 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक शुक्रवार दि. 7 मार्च 2014 हा असेल.
जामनेर (जि. जळगाव), अकोले (जि.अहमदनगर), अक्कलकुवा (जि.नंदूरबार), अहमदपूर (जि.लातूर) आणि पोंभुर्णा (जि.चंद्रपूर) या पंचायत समित्यांमधील प्रत्येकी एका निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. 3 मार्च ते शुक्रवार दि. 7 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येणार असून शनिवार, दि. 8 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे गुरुवार दि. 13 मार्च 2014 तर अपिल आहे तेथे मंगळवार दि. 18 मार्च, 2014 हा असेल.
सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका होणाऱ्या वरील सर्व ठिकाणी रविवार दि. 23 मार्च, 2014 रोजी मतदान घेण्यात येणार असून सोमवार दि.24 मार्च, 2014 रोजी मतमोजणी होईल. यासर्व निवडणुकांच्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणुका असलेल्या ठिकाणी संबंधित प्रभागामध्ये आज रात्रौ 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व ती निवडणुकांचा निकाल जाहिर होण्याच्या दिनांकापर्यंत अस्तित्वात राहील असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२
दहा महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान - साडेनऊहजार उमेदवार रिंगणात
मुंबई, ता. १५ - बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी उद्या (ता. १६) मतदान होणार असून १ हजार २४४ जागांसाठी ९ हजार ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील असा-
बृहन्मुंबई- जागाः २२७ उमेदवार २२३३ मतदान केंद्र ८३२६ मतदार संख्या १०२७९३७७.
ठाणे- जागाः १३० उमेदवार ७७८ मतदान केंद्र १४७१ मतदार संख्या ११९४८८६.
उल्हासनगर- जागाः ७८ उमेदवार ५०४ मतदान केंद्र ५७६ मतदार संख्या ४७६३२७.
नाशिक- जागाः १२२ उमेदवार ९२९२ मतदान केंद्र १२५३ मतदार संख्या १००३०००.
पुणे- जागाः १५२ उमेदवार ११७७ मतदान केंद्र २९९६ मतदार संख्या २५५८५७८.
पिंपरी-चिंचवड- जागाः १२८ उमेदवार ८८३ मतदान केंद्र १३३० मतदार संख्या ११५२५८८.
सोलापूर- जागाः १०२ उमेदवार ५५७ मतदान केंद्र ९२६ मतदार संख्या ७५४२४०.
अमरावती- जागाः ८७ उमेदवार ७२४ मतदान केंद्र ६४२ मतदार संख्या ५१७३३८.
अकोला- जागाः ७३ उमेदवार ५१७ मतदान केंद्र ४२३ मतदार संख्या ३४९५३६.
नागपूर- जागाः १४५ उमेदवार १२३२ मतदान केंद्र २४९८ मतदार संख्या १९८६०५७.
सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील असा-
बृहन्मुंबई- जागाः २२७ उमेदवार २२३३ मतदान केंद्र ८३२६ मतदार संख्या १०२७९३७७.
ठाणे- जागाः १३० उमेदवार ७७८ मतदान केंद्र १४७१ मतदार संख्या ११९४८८६.
उल्हासनगर- जागाः ७८ उमेदवार ५०४ मतदान केंद्र ५७६ मतदार संख्या ४७६३२७.
नाशिक- जागाः १२२ उमेदवार ९२९२ मतदान केंद्र १२५३ मतदार संख्या १००३०००.
पुणे- जागाः १५२ उमेदवार ११७७ मतदान केंद्र २९९६ मतदार संख्या २५५८५७८.
पिंपरी-चिंचवड- जागाः १२८ उमेदवार ८८३ मतदान केंद्र १३३० मतदार संख्या ११५२५८८.
सोलापूर- जागाः १०२ उमेदवार ५५७ मतदान केंद्र ९२६ मतदार संख्या ७५४२४०.
अमरावती- जागाः ८७ उमेदवार ७२४ मतदान केंद्र ६४२ मतदार संख्या ५१७३३८.
अकोला- जागाः ७३ उमेदवार ५१७ मतदान केंद्र ४२३ मतदार संख्या ३४९५३६.
नागपूर- जागाः १४५ उमेदवार १२३२ मतदान केंद्र २४९८ मतदार संख्या १९८६०५७.
निर्भयपणे मतदान करा
महानगरांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदान करून आपला हा बहुमोल हक्क बजवावा असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
या सर्व महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होत असून संबंधित सर्व महानगरपालिका हद्दीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य शासनाने आ पल्या विशेषाधिकारांचा वापर करून मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
महानगरांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदान करून आपला हा बहुमोल हक्क बजवावा असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
या सर्व महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होत असून संबंधित सर्व महानगरपालिका हद्दीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य शासनाने आ पल्या विशेषाधिकारांचा वापर करून मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...