मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रेल्वे बजेट २०११-प्रतिक्रिया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे. महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्