मुख्य सामग्रीवर वगळा

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे.
महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्राशी कोकण जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. मुंबईसाठी ४२ नवीन गाड्या, सर्व लोकल ट्रेन १२ डब्यांच्या करण्याची घोषणा देखील मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. नंदीग्राममध्ये रेल्वेसाठी औद्योगिक पार्क आणि महाराष्ट्रात ७०० मेगावॅटचा वायू आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. तथापि, पायाभूत सुविधा निर्मिती आणि कारखाने यांच्या सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष दिले गेले असते तर हा अर्थसंकल्प परिपूर्ण झाला असता, असे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...