प्रेम म्हणजे प्रेम असतं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम म्हणजे प्रेम असतं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

प्रेमासाठी..वाट्टेल ते...!!!

प्रेमात सर्व काही माफ असतं..प्रेम हे आंधळं असतं! असं म्हणतात नां..? होय अगदी खरं आहे ते..आता हेच बघा नां...
प्रेमात अक्षरशः चिंब झालेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीच्या अटी लग्नापूर्वीच तिला लिखित स्वरूपात म्हणजेच स्टँप पेपरवर लिहून दिल्या. अटींप्रमाणे लग्नानंतर हा पती ठरलेल्या वेळेत घरी आला नाही, तेव्हा त्याला बिचार्‍याला लिहून दिल्याप्रमाणे चक्क रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले.
सन २००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते. हे नवरोबा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे बहुदा नेहमीच घरी परत यायला उशीर होतो. नवरोबा मदिरालयात जाऊन मदिरा प्राशन तर करुन आले नाही नां? याची शंका त्यांच्या सौभाग्यवतीला येत होती.
नवरोबाने हबीबगंज (भोपाळ नजीक) पोलिस ठाण्यात जाऊन बायकोविरुद्ध तक्रार केली, दोघांनाही ठाण्यात बोलावून समजाविण्यात आले आणि स्टँप पेपरवर असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आला. पाहूया या अटी तरी कोणत्या होत्या..?
अटी अशा-
१). एका वेळचा स्वयंपाक बायको आणि एका वेळचा नवरोबांनी करावा.
२). संध्याकाळी सातच्या आत घरात..अन्यथा नवरोबांनी बाहेर झोपावे.
३). रात्री नऊनंतर टीव्ही बंद.
४). पे अकाउंट दोघांचे संयुक्त खाते असेल.
५). घर खर्चात सुरवातीला नवरोबाचे पैसे वापरले जातील.
६). घर खरेदीची रजिस्ट्री (व्यवहार) सौभाग्यवतींच्या नावावर होतील.
७). सौं. नी मोबाईलवर कॉल केल्यानंतर लगेच पिक केला जाईल, टाळंटाळ करणार नाही.
८). दारू सौं. ना विचारून नंतरच प्यावी.
९). नवरोबा आपल्या आईस भेटण्यास जाणार नाही.

नवरोबांवर अशा नऊ अटी लादून प्रेयसी त्यांची सौभाग्यवती झाली होती.
# @ असलं प्रेम नक्कोच नको.. प्रेमासाठी वाट्टेल ते..म्हणतात नां, ते हेच!

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...