मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मतदान 2009 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठ मतदान केंद्रावर फेरमतदान जि.प., पं.स. क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल

मुंबई, ता. 8 - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. याचबरोबर 8 मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्याचा निर्णय देखील राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत लागू असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया संपली असली तरीही मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. यामुळे मतदान आणि मतमोजणीतील बराच कालावधी लक्षात घेऊन आणि विकास कामांमद्ये अडथळा येऊ नये यासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात 12 फेब्रुवारी रोजी मतदान असल्यामुळे तेथे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता मात्र 17 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील

निवडणुका...महाराष्ट्राच्या...

लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेसाठी मतदान होईल. नेहमीप्रमाणे यावेळीही 'नोट' आणि'व्होट' बँक जोरात आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील भुसावळ साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना यांच्यातच चुरस असेल हे चित्र तर स्पष्टच आहे. दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार नवीनच आहेत. निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो होईल. परंतु निवडून आल्यावर आणि विधानसभेत गेल्यावर मतदार संघातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे आणि कार्य न विसरता करायवयाची आहेत, हे विसरू नये. पुर्वीच्या ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचे कार्य यातून शिकून बोध घेऊनच पुढचे पाऊल उचलावे. प्रामुख्याने भुसावळ ते मुंबई पर्यंत एक्सप्रेस, जलद रेल्वे असावी...भुसावळ ते मनमाड अशी आणखी एक रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू करावी ही मागणी प्रलंबित आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावते आहेच. हतनूर धरणाची क्षमता वाढविण्याचा विचार व्हावा...सर्व समाजातील घटकांना सहकार्य व्हावे. विरोधकांना देखील सहकार्य करुन विरोध संपवावा. केवळ विरोधासाठी विरोध न करता विधायक कार्ये व्हावीत, हीच अपेक्षा!