मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

jwellery लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने महान उद्योजक हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवस

सोने झाले सोन्यासारखे..

अशी खचितच एखादी व्यक्ती असेल, की जिला सोनं आवडत नाही, आकर्षण नाही...। अगदी श्रीमंतांपासून गरीबापर्यंत समाजातील सगळ्याच घटकांना सोन्याची क्रेझ असते. त्यातल्या त्यात महिलांचं तर विचारुच नका। सोनं न आवडणारी महिला शोधूनही सापडणार नाही. सोन्याचा उपयोग विशेषतः मध्यमवर्गीयांना व्यवहार करण्यासाठी चांगलाच होतो. कोणत्याही अडचणीत पैसा जवळ नसला, कमी पडत असला, ऐनवेळी इमर्जन्सी उद्भवल्यास सोनंच शेवटी पैसा मिळवून देणं हा एकमेव पर्याय असतो. इतकं अमूल्य महत्व सोन्याचं आहे. परंतु दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत असून मध्यमवर्गीयांसाठी तरी ते सोन्यासारखेच जणू झाले आहेत. परिणामी आगामी लगीन सराईमध्ये आपल्या मुलीच्या अंगावर सोनं घालण्याबाबत पालक चिंतेत आहेत. सध्या (ही बातमी टाइप होईपर्यंत) सोन्याने वीस हजाराचा टप्पा ओलांडला आहे. थेंबे थेंबे तळे साचे..या उक्तीप्रमाणे एक-एक ग्रॅम सोनं जमवायचा विचार केला तरीही तो सहजासहजी शक्य नाही. कारण सतत वाढणार्‍या महागाईमुळेच उद्याची चिंता असलेली सामान्य व्यक्ती एकदम दोन हजार रुपये देऊ शकत नाही. आज अनेक देणी द्यायची असल्यामुळे पैशाला जणू पाय फुटले असल्याचे चित्र आहे.