मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव

  कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली. कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील य

एड्सग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे  ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले. सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस  राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे , सरचिटणीस

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे. सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे. कोर

Yoga Day

  Always compare ownself where I *am...* Do ur best and achieve the target n ur *aim...* It'll make ur future bright n shine ur *name...* Remember one thing that everyday is not *same...*

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे. येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय

जिंदगी...

मै तो बस, मैं हूँ , जहाँ चाहे जाता हूँ , अपनी जिंदगी जीता हूँ... जीते जीते सोचता हूँ  है कितने दिन है और जीना... तुम मनुष्य तो मनुष्य हो  लेकिन तुम्हें चाहिये , हर किसीका सर खाना  और तकलीफ देके  उनका बहूत खून पीना... अरे निकम्मों, जरा बहाओ पसीना , लाओ चार पैसे घर में... फिर समझ में आएगी , कैसी होती है जिंदगी , कैसा होता है वो जीना...

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना करण्यात आले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महार

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या ८१० घरांसाठी दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. २६ एप्रिल २०२० रोजी www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल. तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४,८३८ परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प

सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णय

सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे तपशील (Installments) व ते भर

'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक

सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला,