गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव

 


कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली.
कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, सुदाम पाटील, शिवसेनेच्या कामोठे आघाडी प्रमुख सुवर्णा वाळूंज आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप नेते काशिनाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, पनवेल जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, गणेश कडू, डॉ. नागनाथ येमपल्ले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, नारायणशेठ घरत, शंकरशेठ म्हात्रे, माया अहिरे, समाजसेवक बागूल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे यांनी केले.

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

एड्सग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे  ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले.
सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस  राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे , सरचिटणीस मुकुल इंगळे,अनिल शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोमवार, ६ जुलै, २०२०

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.
सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अद्याप तयार झालेली नाही, आणि लस तयार झाली तरीही नेहेमी औषधे, लस घेऊन चालणार नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यासारखे दुसरे माध्यम सध्यातरी नसावे. योगासने करू न शकणाऱ्या लोकांनी अगदी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, तोंडाला मास्क व्यवस्थित लावावा, नाकाखाली मास्क जाणार नाही याची काळजी घ्यावी.

लिफ्ट वापर...
शक्य असल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये-जा करावी. जिन्याच्या रेलिंगला स्पर्श करू नये. लिफ्ट वापरणे अगदी आवश्यक असेल तर हातात ग्लोज घाला किंवा कागदाने लिफ्टच्या बटणास, दरवाज्यास, हँडलला स्पर्श करावा, लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर लिफ्टसाठी वापरलेले ग्लोज, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावे किंवा डिस्पोज ऑफ करावे म्हणजे जास्त चांगले.

घर...
घरात प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर ठेवून बाहेरुन आल्यानंतर याचा वापर करावा किंवा सोबत सॅनिटायझरची छोटी बाटली (स्टँडर्ड सॅनिटायझर तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे) खिशात ठेवावी, गरज असेल तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा. बराच वेळ बाहेर असल्यास, भरपूर गर्दी असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास साबणाने घरी परतल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. शक्य झाल्यास आपले स्वतःचे कपडे आपणच धुवून काढावे.

बाहेरील व्यक्ती...
अत्यावश्यक कामासाठी घरी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, वॉशिंग मशीन, फॅन आदी दुरुस्ती करणारी व्यक्ती आल्यास सर्वप्रथम त्यास आपल्यासमोर हातास सॅनिटायझर लावण्यास सांगावे, त्याच्या कामाशिवाय शक्यतो अन्य वस्तूंना हात लावू देऊ नये, आपण देखील त्याच्यापासून शक्य तेवढे दूर थांबावे.

रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणे हितावह...
कोणताही रोग, विकार, आजार असो... तुमच्या प्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. प्रतिकारशक्ती उत्तम असल्यास कोरोनासारखा महाभयंकर असा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. प्रयत्न करणे आपल्या हातात असल्यामुळे, दररोज किमान अर्धा तास तरी योगासनांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योगासने करावी.
काढा- पाण्यात (व्यक्तीपरत्वे प्रमाण ठरवून) तुळस, 4-5 काळी मिरी/मिरपूड, सुंठ, मनुका, गवतीचहा, हळद, गूळ, चिमुटभर दालचिनी इ. रकमा टाकून सर्व जवळपास निम्मे उकळवून (तज्ज्ञांचा सल्ला घेऊन) काढा घ्यावा...काढा तयार झाल्यानंतर थोडे दूध घातले तरीही चालेल. चहाऐवजी काढाच घेतला तरीही अपाय नाही. (हा काढा कोरोनासाठी नाही, मात्र याचे सेवन नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढू शकते)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने काहीगोष्टी मात्र विचारनीय ठरल्या आहेत, त्यांचा अभ्यास केला जाऊन त्यादृष्टीने दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळा म्हटला की सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळ्यांना खाज सुटणे, खोकला या गोष्टी आल्याच...! हे विकार झाल्यास शासनाची, वैद्यकीय तज्ज्ञांची काय भूमिका असेल, अशा रुग्णांना कसे ट्रीट केले जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे...

रविवार, ३१ मे, २०२०

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
 Always compare ownself where I *am...*
Do ur best and achieve the target n ur *aim...*
It'll make ur future bright n shine ur *name...*
Remember one thing that everyday is not *same...*

मंगळवार, १२ मे, २०२०

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे.

येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय बदल होतील, आयुषतर्फे आरोग्य-रक्षणासाठी, रक्षकांसाठी काही आचारसंहिता तयार केली जाईल का? यासह अनेक बाबींवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

लॉकडाऊनमुळे कधी नव्हे असा एक चांगला परिणाम मात्र झाला तो म्हणजे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांनंतर एकत्र आली, मुलांच्या, आईबाबांच्या, आजोबाआजीच्या डोळ्यासमोर सगळे कुटुंबीय 24 तास दिसत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. वातावरणात ध्वनी-प्रदूषण, पर्यावरणातील प्रदूषण इ. चे वाढलेले प्रमाण प्रचंड कमी होऊन आता रात्री आकाशात तारे, चांदण्या, सप्तर्शी, शनी, शुक्र, मंगळ, नेपच्यून आदी ग्रह, नक्षत्रे सहज पहाता येत आहेत. याचबरोबर स्कायलॅब, सॅटेलाइट देखील आकाशात फिरताना डोळ्यांनी सहज दिसत असल्याचे काही नागरीकांचे म्हणणे आहे.

परंतु, वर्क फ्रॉम होम..मुळे ऑफिसचा फिल येत नसल्याचे आयटी क्षेत्रातल्या अनेकांचे म्हणणे आहे. 'वर्क फ्रॉम होम' मुळे कंपन्यांची देखील प्रचंड बचत देखील होत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे, अनेकदा प्रोजेक्ट, टास्क सहजासहजी हाताळता येत नसल्याची देखील तक्रार आहे. इंटरनेट सेवेवर अचानक ट्राफिक वाढल्याने नेट कनेक्टिव्हिटी अनेकदा डिस्टर्ब होत आहे, यामुळे मीटिंग्ज, मोठे प्रोजेक्ट्स, फाईल अपलोड आणि डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत.

लॉकडाऊन पूर्णपणे काढून घेण्यात आल्यानंतर मात्र अनेक दिवस काळजी घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे. चेहऱ्यावर मास्क लावणे, शक्यतो लांब बाह्यांचा शर्ट वापरणे, बाहेर निघताना हँडग्लोज, दुचाकी अथवा कार, आपल्या वाहनाची हँडल, संबंधित एरिया निर्जंतुंक केल्याशिवाय शक्यतो निघू नये याप्रकारची खबरदारी  तसेच आणखी उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.

बाहेरगावहून घरी जाण्यासाठी रस्त्यांवर वाहनांची गर्दी नक्की होईल, यासाठी शासन, पोलिस यंत्रणा सावधगिरी बाळगेलच, मात्र नागरीकांनी स्वतः सतर्क रहाणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमांवरच थेट, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करुन, तपासणी अहवाल संबंधित जिल्ह्यांच्या हॉस्पिटलनां (बहुदा ज्या जिल्ह्यातून प्रवासी आले आहेत आणि ज्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत अशा दोन्ही जिल्ह्यांना) शासकीय रुग्णालये, हॉस्पिटलचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल यात शंका नाही.

शनिवार, २ मे, २०२०

जिंदगी...

मै तो बस, मैं हूँ ,
जहाँ चाहे जाता हूँ ,
अपनी जिंदगी जीता हूँ...
जीते जीते सोचता हूँ 
है कितने दिन है और जीना...
तुम मनुष्य तो मनुष्य हो 
लेकिन तुम्हें चाहिये ,
हर किसीका सर खाना 
और तकलीफ देके 
उनका बहूत खून पीना...
अरे निकम्मों,
जरा बहाओ पसीना ,
लाओ चार पैसे घर में...
फिर समझ में आएगी ,
कैसी होती है जिंदगी ,
कैसा होता है वो जीना...

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र
शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक,
सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना करण्यात आले आहे.

कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता
मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध
स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या
गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले
आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यातर्फे अशाप्रकारच्या सार्वजनिकहिताच्या उपक्रमाकरिता देण्यात येणारे आर्थिक योगदान हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्याकलम ६९ अंतर्गत कर सवलतीस पात्र करण्यात आले आहे. कोविड-१९ किंवा कोरोनाशी लढण्याकरिता नवीमुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ मध्ये मोठ्या प्रमाणावर आपले आर्थिक योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ चा तपशील खालीलप्रमाणे :
Name of Account : Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Bank Saving Account : 39239591720
Bank : State Bank of India
Mumbai Head Branch Fort : 400023
Branch Code : 00300
IFSC CODE : SBIN0000300


मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आरटीजीएस/एनईएफटी द्वारे आर्थिक सहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी
गृहनिर्माण संस्थेच्या नावासह देण्यात आलेली रक्कम हा तपशील jointregcidco@gmail.com या ई-मेल
आयडीवर पाठवावा
. तसेच धनादेशाद्वारे (चेक) रक्कम देऊ इच्छिणाऱ्यांनी यतिश पाटील यांच्याशी

९७६८०१४४१३ या मोबाइल क्रमांकावर किंवा नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हाउजिंग सोसायटी फेडरेशनच्या
श्री. भास्कर म्हात्रे यांच्याशी ९८१९३०६९६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या ८१० घरांसाठी दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. २६ एप्रिल २०२० रोजी www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल. तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४,८३८ परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. तथापि, काही अर्जदारांनी घरे सरेंडर/रद्द केली तर काही अर्जदार कागदपत्रे छाननी अंतर्गत अयशस्वी ठरल्याने प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र अर्जदारांची अंतिम यादी/निकाल २६ एप्रिल २०२० रोजी जाहीर करण्यात आली असून सदर यादी अर्जदारांना www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वाटपपत्राची कार्यवाही देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल. ज्या सदनिकाधारकांना ५ वा हफ्ता भरतेवेळी टाळेबंदीमुळे अडचण आली आहे अथवा ते हफ्ता भरू शकले नाहीत, अशा सदनिकाधारकांना यापूर्वीच ३० जून २०२० पर्यंत सदनिकेचा हफ्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या सदनिकाधाराकांना येस बॅंकेच्या समस्येमुळे हफ्ता भरतेवेळी अडचण आली आहे वा ते हफ्ता वेळेत भरू शकले नाही, अशा सदनिकाधारकांच्या विलंब शुल्काबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, नवीन पनवेल (प.), सीबीडी बेलापूर येथील ९ भूखंड (निवासी + वाणिज्यिक वापर) आणि वाशी येथील २ भूखंड (वाणिज्यिक वापर) ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे दि. १८ जानेवारी २०२० रोजी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांपैकी नवीन पनवेल (प.) व खारघर येथील ८ महत्तम बोलीधारकांना भूखंडांचे वापटपत्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बोलीधारकांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णय

सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे तपशील (Installments) व ते भरण्याचा अंतिम दिनांक नमूद केलेले असतात. सध्याच्या प्रक्रियेनुसार संबंधित वाटपदारांनी वाटपपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे हफ्त्यांची रक्कम एक रकमी भरावयाची असते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत बॅंकांशी संबंधित समस्या, अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या, संचार करण्यास असलेले निर्बंध इ. बाबींमुळे विहीत मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम ऑनलाईन माध्यमातून टप्प्याटप्प्याने अंशतः भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली होती. वरिल पार्श्वभूमीस अनुसरून संबंधित भूखंड वाटपदारांनी त्यांच्या भरावयाच्या हफ्त्यांची एकूण रक्कम टप्प्याटप्पयाने अंशत: ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे नंतर लागू होणारे विलंब शुल्क हे केवळ उर्वरित रकमेवर लागू होईल व अर्जदारांवर अधिकचा आर्थिक भार पडणार नाही. तरी सर्व संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशतः ऑनलाइन पद्धतीने विहीत मुदतीनुसार भरावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

बुधवार, १ एप्रिल, २०२०

'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक

सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला, अहो बाबा कचरा नाही काढला तर मग लोकांना कोरोना होईल नां...इतकं ते मिष्किल वयं होतं त्या मुलाचं " मात्र इथे या प्रसंगाचा उल्लेख करण्यामागे उद्देश हाच की पाहा अगदी लहान मुलांना सुद्धा कोरोनाविषयी जाणीव आहे, कोरोना काय आहे रे..हे त्या मुलाला विचारल्यावर तेवढं नाही सांगता आलं, पण आजुबाजुची परिस्थिती, सोशल मीडियावरील पोस्ट, घरात होणाऱ्या चर्चा याकडे त्याचं लक्ष असल्याचा हा परिणाम... आमच्या लहानपणी एखाद्याला टायफॉईड झाला तर गंभीर समजला जायचा आणि त्या व्यक्तीस शक्यतो हॉस्पिटलमध्येच अॅडमिट करत असत, त्या व्यक्तीच्या जवळही आम्हाला फिरकू देत नसत, तेव्हा इतकं गंभीर मानलं जात होता टायफॉईड. तोच टायफॉईड आता सामान्य झालाय जवळपास...औषधंही सहज उपलब्ध आहेत...नव्यानेच आलेल्या कोरोना अर्थात COVID 19 चे तसे नाही... शासन सर्वतोपरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहे आणि सध्यातरी १४ एप्रिलपर्यंतच्या आखून दिलेल्या लॉकडाउन कालावधीत सगळ्यांनी घरीच थांबावे, शक्यतो बाहेर पडू नये हाच उपाय आहे. परंतु दररोजच्या बातम्यांवरून, अनेक नागरीक अजूनही ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत हेच लक्षात येतंय. घरी थांबाल तर नंतर शक्यतो अशा प्रकारे घरी थांबायची वेळ येणार नाही हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. दुसरे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे देखील महत्वाचे आहे. आजकाल काही झालं तरीही लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. वयाची पंचे-चाळिशी गाठेपर्यंत तरी लगेच डॉक्टरांकडे जाऊ नये साध्या साध्या गोष्टींसाठी असे वाटते. प्रतिकारशक्ती ही वाढवावी कशी? हा प्रश्न अनेकांना पडला असावा...यासाठी नियमित व्यायाम, योगासने करणे आवश्यक आहे. किमान रात्री जेवताना दोन घास कमी खाऊन पोटात थोडी रिकामी जागा ठेवल्यास अपचनाचा त्रास कमी होईल, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, थोडे सावकाश फिरावे. जेवणात/अन्न तयार करताना आले, लसूण, हिंग यांचा वापर करावा.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...