मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे.

येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय बदल होतील, आयुषतर्फे आरोग्य-रक्षणासाठी, रक्षकांसाठी काही आचारसंहिता तयार केली जाईल का? यासह अनेक बाबींवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

लॉकडाऊनमुळे कधी नव्हे असा एक चांगला परिणाम मात्र झाला तो म्हणजे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांनंतर एकत्र आली, मुलांच्या, आईबाबांच्या, आजोबाआजीच्या डोळ्यासमोर सगळे कुटुंबीय 24 तास दिसत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. वातावरणात ध्वनी-प्रदूषण, पर्यावरणातील प्रदूषण इ. चे वाढलेले प्रमाण प्रचंड कमी होऊन आता रात्री आकाशात तारे, चांदण्या, सप्तर्शी, शनी, शुक्र, मंगळ, नेपच्यून आदी ग्रह, नक्षत्रे सहज पहाता येत आहेत. याचबरोबर स्कायलॅब, सॅटेलाइट देखील आकाशात फिरताना डोळ्यांनी सहज दिसत असल्याचे काही नागरीकांचे म्हणणे आहे.

परंतु, वर्क फ्रॉम होम..मुळे ऑफिसचा फिल येत नसल्याचे आयटी क्षेत्रातल्या अनेकांचे म्हणणे आहे. 'वर्क फ्रॉम होम' मुळे कंपन्यांची देखील प्रचंड बचत देखील होत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे, अनेकदा प्रोजेक्ट, टास्क सहजासहजी हाताळता येत नसल्याची देखील तक्रार आहे. इंटरनेट सेवेवर अचानक ट्राफिक वाढल्याने नेट कनेक्टिव्हिटी अनेकदा डिस्टर्ब होत आहे, यामुळे मीटिंग्ज, मोठे प्रोजेक्ट्स, फाईल अपलोड आणि डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत.

लॉकडाऊन पूर्णपणे काढून घेण्यात आल्यानंतर मात्र अनेक दिवस काळजी घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे. चेहऱ्यावर मास्क लावणे, शक्यतो लांब बाह्यांचा शर्ट वापरणे, बाहेर निघताना हँडग्लोज, दुचाकी अथवा कार, आपल्या वाहनाची हँडल, संबंधित एरिया निर्जंतुंक केल्याशिवाय शक्यतो निघू नये याप्रकारची खबरदारी  तसेच आणखी उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.

बाहेरगावहून घरी जाण्यासाठी रस्त्यांवर वाहनांची गर्दी नक्की होईल, यासाठी शासन, पोलिस यंत्रणा सावधगिरी बाळगेलच, मात्र नागरीकांनी स्वतः सतर्क रहाणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमांवरच थेट, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करुन, तपासणी अहवाल संबंधित जिल्ह्यांच्या हॉस्पिटलनां (बहुदा ज्या जिल्ह्यातून प्रवासी आले आहेत आणि ज्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत अशा दोन्ही जिल्ह्यांना) शासकीय रुग्णालये, हॉस्पिटलचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल यात शंका नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....