मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

terror... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"माओवाद" भूमीवाद अजून किती जीव घेणार...

पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यामध्ये सिल्धा परिसरात माओवाद्यांनी संयुक्त सुरक्षा दलाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात सोमवारी 24 जवान ठार झाले. मोटारसायकलींवरून आलेल्या पन्नासपेक्षा अधिक माओवाद्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याधुनिक शस्त्रांनी दहा मिनिटे हल्ला केला. अनेक वर्षांपासून माओवाद, भारत-चीन, भारत-पाकिस्तान भूमीवादावरून अतिरेकी, नक्शलवादी यांचे भारतात अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत, होत आहेत. सीमेवर बिचारे जवान अहोरात्र लढताहेत. परंतु अद्याप शासन गप्प का? केवळ फाइलमध्ये किंवा कागदी घोडे नाचवून काहीच उपयोग नाही, हे नुकत्याच झालेल्या या हल्ल्याने सिद्ध केले आहे. कसाबची साक्ष देखील जवळपास पूर्ण झाली आहे. मग आता हे रेंगाळणे का? आदेश न मानणार्‍या लोकांना माओवादी बेदम झोडपतात ही दंडूकेशाही आणि बंदूकशाही नव्याने सावकारीसारखी सुरू होत आहे, भविष्यातल्या अराजकतेची ही नांदी आहे. पुण्यातही जर्मन बेकरी घटना ताजी आहेच.. केवळ सुरक्षा यंत्रणांना दोष देण्यात काहीच तथ्य नाही, त्या यंत्रणा आपल्या परिने कार्य करून वेळोवेळी सतर्क देखील करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आणि सर्वच