रविवार, २९ एप्रिल, २०१२
गुरुवार, १९ एप्रिल, २०१२
घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत किशोर कुळकर्णी यांची महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट
जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी
महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी
जळगाव दौर्यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात
केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय
कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले.
ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.
महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगावमध्ये विविध शाळांच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांच्या अक्षरांना आपण वळण लावले असून त्या कार्याबद्दल त्यांचा माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते नागरी सत्कार देखील करण्यात आला होता. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. यात स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन येथील शाळेत देखील त्यांनी हा उपक्रम यशस्वी राबविला असून त्याबाबत विकास आणि सौ. भारती आमटे यांनी कुळकर्णी यांच्या कार्याबाबत नोंदविलेला अभिप्राय आणि त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची विविध प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित बातम्या, लेख आदी साहित्य देखील राष्ट्रपती महोदयांना या भेटीत दाखविण्यात आले. किशोर कुळकर्णी यांच्या कार्याबाबत महामहिम राष्ट्रपती महोदयांनी समाधान व्यक्त केले. या भेटीत कुळकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. आरती कुळकर्णी देखील सोबत होत्या.
शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२
भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज
मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.
श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील-
मालेगाव- जागा ८०, उमेदवार ४७१, मतदान केंद्रे ४६७, संवेदनशील मतदान केंद्रे १४४, मतदार संख्या ३, ६७, ३७४.
लातूर- जागा ७०, उमेदवार ४१८, मतदान केंद्रे ३०८, संवेदनशील मतदान केंद्रे ०, मतदार संख्या २, ५१, २१०.
चंद्रपूर- जागा ६६, उमेदवार ४५८, मतदान केंद्रे २९९, संवेदनशील मतदान केंद्रे २१, मतदार संख्या २, ३६, ९९५.
परभणी- जागा ६५, उमेदवार ४२३, मतदान केंद्रे २६६, संवेदनशील मतदान केंद्रे ४१, मतदार संख्या २, ०३, ४४९.
एकूण- एकूण जागा ३७१, उमेदवार २, ४०२, मतदान केंद्रे १, ८५३, संवेदनशील मतदान केंद्रे ४३०, मतदार संख्या १५, १८, १७३.
श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील-
मालेगाव- जागा ८०, उमेदवार ४७१, मतदान केंद्रे ४६७, संवेदनशील मतदान केंद्रे १४४, मतदार संख्या ३, ६७, ३७४.
लातूर- जागा ७०, उमेदवार ४१८, मतदान केंद्रे ३०८, संवेदनशील मतदान केंद्रे ०, मतदार संख्या २, ५१, २१०.
चंद्रपूर- जागा ६६, उमेदवार ४५८, मतदान केंद्रे २९९, संवेदनशील मतदान केंद्रे २१, मतदार संख्या २, ३६, ९९५.
परभणी- जागा ६५, उमेदवार ४२३, मतदान केंद्रे २६६, संवेदनशील मतदान केंद्रे ४१, मतदार संख्या २, ०३, ४४९.
एकूण- एकूण जागा ३७१, उमेदवार २, ४०२, मतदान केंद्रे १, ८५३, संवेदनशील मतदान केंद्रे ४३०, मतदार संख्या १५, १८, १७३.
शनिवार, ७ एप्रिल, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
