Panvel लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Panvel लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंदा ‘पनवेलचा महागणपती’ची उज्जैनच्या  पार्श्वभूमीवर महाकाल स्वरूपात निर्मिती केली आहे. यंदाचे हे विशेष आकर्षण आणि त्याकरिता साडेसहा हजार स्केअर फुटीचा कोरीव मूर्तीच्या लेण्यांचा तितकाच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक शामियाना कलेच्या उत्तम नमुन्यातून निर्माण करण्यात आला आहे.


मुंबई आणि पुणेनंतर पनवेलमध्येही गणेशोत्सवाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि भक्तीचे निर्मळ पावित्र्य राखत ‘कांतीलाल प्रतिष्ठान’ने सालाबादप्रमाणे फिल्मसिटीचे कला दिग्दर्शक आणि कारागीरांच्या संकल्पनेतून यंदा ‘महाकाल’चा देखावा उभा करण्यात आला आहे.


मुंबईच्या राजन खातू यांच्या कार्यशाळेत ‘पनवेलचा महागणपती’ सोज्वळ आणि शांतरसाने न्हावून निघत आहे. मूर्ती अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच देखाव्यावरही कारागिरांचा शेवटचा हात फिरत आहे.


महाद्वारावरील १६ फुटी भगवान शंकरांची मूर्ती भक्तांना शक्ति देणारी असून आकर्षित करणारी आहे.


महाकालस्वरूप फिलर, कोरीव मूर्ती आणि प्रशस्त शामियांना तयार करण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरु आहे. पनवेलच्या महागणपतीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल वाढविणारी आणि आवडनिवड जपत गणेशोत्सवाला आकार देण्याचे कार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत.


तेव्हा गणेशोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद, भक्ती आणि समाधान द्विगुणित करावा, असे आवाहन संयोजक किरण करावकर, सुधीर सोमवंशी यांनी केले आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

पनवेलचा महागणपती मंडप 'श्रीगणेशा'; अध्यक्ष कडू यांच्या हस्ते शुभारंभ

 पनवेल: (ता. १०) कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य मंडप उभारणीला सोमवारी (ता. १०) श्रीगणेशा झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मंडप उभारणीचा श्रीफळ वाढविण्यात आला. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन रुग्णालयासमोरील गुजराथी शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडप उभारण्यात सुरुवात झाली आहे.रायगड, नवी मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात ‘पनवेलचा महागणपती’ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. भव्य राजवाडा, आकर्षक विद्युत रोषणाई, सुबक सजावट आणि १८ ते २१ फुटांची गणेशमूर्ती हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अकरा दिवसांच्या उत्सवादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच मंडप उभारणी कधी सुरू होणार, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता असते. यंदाही वेगळे आकर्षण असणार आहे अशी माहिती अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मंडपाच्या उभारणीपासूनच चर्चेत राहणारा हा उत्सव यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्यार आहे.



यंदाच्या उत्सवासाठी सुमारे सात हजार चौरस फुटांचा शामियाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बाहेरील मंडपही अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात येत आहे. जर्मन पद्धतीच्या हँगर तंत्रज्ञानाचा वापर करून मंडप उभारणी करण्यात येत आहे. अँल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या या हँगरची उभारणी हायड्रा आणि कामगारांच्या मदतीने करण्यात येत आहे.

मंडप उभारणीच्या शुभारंभाप्रसंगी कडू यांचे सहकारी सुधीर सोमवंशी, किरण करावकर, देवेंद्र तांडेल, सुरज भोईर, अश्विनी भोसले, निशा पाटील, रेश्मा भोईर, निशा भोईर, यशश्री म्हात्रे आदी उपस्थित होते.


सोमवार, १३ जुलै, २०२६

जि. प. शिक्षकांचा भार महापालिकेवर नको: कांतीलाल कडू

 

(पनवेल, ता. ११): पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे वर्गीकरण करताना त्या शाळांमधील शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करू नये, अशी मागणी लोकमुद्रा जनहित पार्टीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांचे वर्गीकरण झाल्यास महापालिकेवर शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. 


पनवेल महापालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून, त्यामध्ये सुमारे ६,९९५ विद्यार्थी आणि २६५ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शाळांसोबत शिक्षकांचाही समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याबद्दल कडू यांनी आक्षेप नोंदविला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचा भार महापालिकेवर टाकणे योग्य ठरणार नाही. अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांचे निवृत्ती वेतन, इतर लाभ आणि उच्च वेतनश्रेणीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. हा खर्च अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
त्याऐवजी राज्य शासनाच्या 'पवित्र' पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती केल्यास नव्या उमेदवारांना संधी मिळेल आणि महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भारही पडणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती महापौर नितीन पाटील आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी कडू यांच्यासमवेत ज्येष्ठ सदस्य भूषण साळुंके, देवेंद्र तांडेल, संज्योगिता परदेशी, भाग्यश्री दोडके आणि रेश्मा पाटील उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल तसेच याबाबत लवकरच लेखी भूमिका स्पष्ट केली जाईल, असे आश्वासन आयुक्त मंगेश चितळे यांनी बैठकीत दिल्याचे कडू यांनी सांगितले.




सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...