मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बौद्धिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त

1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८    2. के.व्ही.के. सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७    3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२    4. डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३    5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७    6. एक्स.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२    7. आर.के. त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५    8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०    9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०   10. टी.एन. शेषन् : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६   11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१   12. जे. एम. लिंगदोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४   13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५   14. बी.बी. टंडन : १६ मे २००५ to २८ जुन २००६   15. एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९   16. नवीन चावला : २० एप्रिल २००९ पासून अद्याप... यापैकी टी. एन. शेषन् यांनी निवडणूक आयोगाचे महत्व शासन व मतदारांना पटवून

मंत्र्यांचा कँपस इंटरव्ह्यू एक चांगला पायंडा...

राज्याच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये इच्छुक (उमेदवार) मंत्र्यांचे कँपस इंटरव्ह्यू घेण्यात आले. अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्याची तर काही मंत्र्यांनी आपल्या कामाची, कामगिरीची फाईलच यावेळी दाखविली, काही मंत्र्यांनी बाहेर व्यवस्थित अभ्यास करून प्रवेश केल्यानंतर आपल्या कामांचा पाढा म्हणून दाखवला. काहीही असो...शिक्षणाचा कुठे ना कुठे फायदा तर झाला? शंभर टक्के शिक्षीत आणि गुन्हे दाखल नसलेल्या उमेदवारासच भविष्यकाळात निवडणुकीत (मग ती गावपातळीपासून थेट दिल्लीपर्यंत, कोणतीही असो) तिकिट देण्याची पद्धत सुरू करणे काळानुसार आवश्यक आहे. परिणामी घाणेरड्या राजकारणापासून दूर राहून देशाचा विकास खर्‍या अर्थाने करणे सहज शक्य होईल, हीच अपेक्षा.