मुख्य सामग्रीवर वगळा

'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक

सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला, अहो बाबा कचरा नाही काढला तर मग लोकांना कोरोना होईल नां...इतकं ते मिष्किल वयं होतं त्या मुलाचं " मात्र इथे या प्रसंगाचा उल्लेख करण्यामागे उद्देश हाच की पाहा अगदी लहान मुलांना सुद्धा कोरोनाविषयी जाणीव आहे, कोरोना काय आहे रे..हे त्या मुलाला विचारल्यावर तेवढं नाही सांगता आलं, पण आजुबाजुची परिस्थिती, सोशल मीडियावरील पोस्ट, घरात होणाऱ्या चर्चा याकडे त्याचं लक्ष असल्याचा हा परिणाम... आमच्या लहानपणी एखाद्याला टायफॉईड झाला तर गंभीर समजला जायचा आणि त्या व्यक्तीस शक्यतो हॉस्पिटलमध्येच अॅडमिट करत असत, त्या व्यक्तीच्या जवळही आम्हाला फिरकू देत नसत, तेव्हा इतकं गंभीर मानलं जात होता टायफॉईड. तोच टायफॉईड आता सामान्य झालाय जवळपास...औषधंही सहज उपलब्ध आहेत...नव्यानेच आलेल्या कोरोना अर्थात COVID 19 चे तसे नाही... शासन सर्वतोपरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहे आणि सध्यातरी १४ एप्रिलपर्यंतच्या आखून दिलेल्या लॉकडाउन कालावधीत सगळ्यांनी घरीच थांबावे, शक्यतो बाहेर पडू नये हाच उपाय आहे. परंतु दररोजच्या बातम्यांवरून, अनेक नागरीक अजूनही ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत हेच लक्षात येतंय. घरी थांबाल तर नंतर शक्यतो अशा प्रकारे घरी थांबायची वेळ येणार नाही हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. दुसरे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे देखील महत्वाचे आहे. आजकाल काही झालं तरीही लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. वयाची पंचे-चाळिशी गाठेपर्यंत तरी लगेच डॉक्टरांकडे जाऊ नये साध्या साध्या गोष्टींसाठी असे वाटते. प्रतिकारशक्ती ही वाढवावी कशी? हा प्रश्न अनेकांना पडला असावा...यासाठी नियमित व्यायाम, योगासने करणे आवश्यक आहे. किमान रात्री जेवताना दोन घास कमी खाऊन पोटात थोडी रिकामी जागा ठेवल्यास अपचनाचा त्रास कमी होईल, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, थोडे सावकाश फिरावे. जेवणात/अन्न तयार करताना आले, लसूण, हिंग यांचा वापर करावा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.