मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.
सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अद्याप तयार झालेली नाही, आणि लस तयार झाली तरीही नेहेमी औषधे, लस घेऊन चालणार नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यासारखे दुसरे माध्यम सध्यातरी नसावे. योगासने करू न शकणाऱ्या लोकांनी अगदी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, तोंडाला मास्क व्यवस्थित लावावा, नाकाखाली मास्क जाणार नाही याची काळजी घ्यावी.

लिफ्ट वापर...
शक्य असल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये-जा करावी. जिन्याच्या रेलिंगला स्पर्श करू नये. लिफ्ट वापरणे अगदी आवश्यक असेल तर हातात ग्लोज घाला किंवा कागदाने लिफ्टच्या बटणास, दरवाज्यास, हँडलला स्पर्श करावा, लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर लिफ्टसाठी वापरलेले ग्लोज, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावे किंवा डिस्पोज ऑफ करावे म्हणजे जास्त चांगले.

घर...
घरात प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर ठेवून बाहेरुन आल्यानंतर याचा वापर करावा किंवा सोबत सॅनिटायझरची छोटी बाटली (स्टँडर्ड सॅनिटायझर तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे) खिशात ठेवावी, गरज असेल तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा. बराच वेळ बाहेर असल्यास, भरपूर गर्दी असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास साबणाने घरी परतल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. शक्य झाल्यास आपले स्वतःचे कपडे आपणच धुवून काढावे.

बाहेरील व्यक्ती...
अत्यावश्यक कामासाठी घरी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, वॉशिंग मशीन, फॅन आदी दुरुस्ती करणारी व्यक्ती आल्यास सर्वप्रथम त्यास आपल्यासमोर हातास सॅनिटायझर लावण्यास सांगावे, त्याच्या कामाशिवाय शक्यतो अन्य वस्तूंना हात लावू देऊ नये, आपण देखील त्याच्यापासून शक्य तेवढे दूर थांबावे.

रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणे हितावह...
कोणताही रोग, विकार, आजार असो... तुमच्या प्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. प्रतिकारशक्ती उत्तम असल्यास कोरोनासारखा महाभयंकर असा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. प्रयत्न करणे आपल्या हातात असल्यामुळे, दररोज किमान अर्धा तास तरी योगासनांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योगासने करावी.
काढा- पाण्यात (व्यक्तीपरत्वे प्रमाण ठरवून) तुळस, 4-5 काळी मिरी/मिरपूड, सुंठ, मनुका, गवतीचहा, हळद, गूळ, चिमुटभर दालचिनी इ. रकमा टाकून सर्व जवळपास निम्मे उकळवून (तज्ज्ञांचा सल्ला घेऊन) काढा घ्यावा...काढा तयार झाल्यानंतर थोडे दूध घातले तरीही चालेल. चहाऐवजी काढाच घेतला तरीही अपाय नाही. (हा काढा कोरोनासाठी नाही, मात्र याचे सेवन नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढू शकते)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने काहीगोष्टी मात्र विचारनीय ठरल्या आहेत, त्यांचा अभ्यास केला जाऊन त्यादृष्टीने दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळा म्हटला की सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळ्यांना खाज सुटणे, खोकला या गोष्टी आल्याच...! हे विकार झाल्यास शासनाची, वैद्यकीय तज्ज्ञांची काय भूमिका असेल, अशा रुग्णांना कसे ट्रीट केले जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.