मुख्य सामग्रीवर वगळा

निवडणुका...महाराष्ट्राच्या...

लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेसाठी मतदान होईल. नेहमीप्रमाणे यावेळीही 'नोट' आणि'व्होट' बँक जोरात आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील भुसावळ साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना यांच्यातच चुरस असेल हे चित्र तर स्पष्टच आहे. दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार नवीनच आहेत. निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो होईल. परंतु निवडून आल्यावर आणि विधानसभेत गेल्यावर मतदार संघातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे आणि कार्य न विसरता करायवयाची आहेत, हे विसरू नये. पुर्वीच्या ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचे कार्य यातून शिकून बोध घेऊनच पुढचे पाऊल उचलावे.
प्रामुख्याने भुसावळ ते मुंबई पर्यंत एक्सप्रेस, जलद रेल्वे असावी...भुसावळ ते मनमाड अशी आणखी एक रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू करावी ही मागणी प्रलंबित आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावते आहेच. हतनूर धरणाची क्षमता वाढविण्याचा विचार व्हावा...सर्व समाजातील घटकांना सहकार्य व्हावे. विरोधकांना देखील सहकार्य करुन विरोध संपवावा. केवळ विरोधासाठी विरोध न करता विधायक कार्ये व्हावीत, हीच अपेक्षा!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012