मुख्य सामग्रीवर वगळा

लेखणी नवीनच...

ब्लॉगपोस्ट वर "लेखणी" नव्यानेच प्रवेश करते आहे. नवीन लेखणी आपणां सर्वांसमोर आणताना आनंद होतोय. इंटरनेटच्या माध्यमातून आपणां पर्यंत पोहोचणे, ते सुद्धा गूगल च्या माध्यमातून, म्हणजे, सुवर्णयोगच की...। प्रिंट मीडिया चा 14 वर्षांचा अनुभव आणि अनेक वाचक, आपल्यासारख्या ज्येष्ठांनी शिकवून, शिकून एक तप गाठलं तेव्हा थोडंतरी शिकलो. अजूनही तत..पप. होतेच, हा भाग वेगळा! या ब्लॉगवरील लिखाण आपल्याला आवडेल हीच अपेक्षा, हो, आता तसा थेट पत्रकारितेचा संपर्क नसला, तरीही स्पर्श आहेच. पण वेळेअभावी बऱ्याचदा विषय थोडक्यात आटोपला आहे, असे वाटले तरीही आपण त्यामागील भावना लक्षात घ्यावी ही विनंती...।असो! लवकरच आपल्यासमोर लेखणी एक चांगला विषय सादर करेल...तोपर्यंत नमस्कार...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012