थंडी पूर्ण जाणार अशी चिन्हं असतानाच पुन्हा एकदा मध्य प्रदेशात थंडीने डोके वर काढले आहे. दहा अंशांच्या वर सरकत चाललेला पारा पुन्हा एकदा प्रदेशातील काही भागात रात्री दहा अंशांवर स्थिरावला आहे. महाशिवरात्री पर्यंत थंडी अशीच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः अनेक मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.