मुख्य सामग्रीवर वगळा

'गुरू' ची मागणी अमान्य करण्यातच शहाणपण...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरू याने आपल्याला जम्मू-काश्मिर येथील तुरुंगात हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. शासनाने गुरूची ही मागणी सपशेल अमान्य करावी. फाशीची शिक्षा ठोठावण्यात या देशद्रोह्याला अद्याप फाशी झाली नाही, परंतू त्याची मागणी शासन अमान्य करीत असल्याचे ऐकून तरी या हल्ल्यात क्षती पोहोचलेल्यांच्या कुटुंबियांना धन्य वाटेल.
संसदेवर हल्ला करून संसदेचे किंबहुना संपूर्ण देशाचेच पावित्र्य आणि शांतता भंग करणार्‍या अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावून बरेच दिवस उलटले. परंतू दुर्दैवाने अद्याप यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणेने त्वरीत सडेतोड प्रत्युत्तर देऊन चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठविले हे कौतुकास्पद आहे. मुंबई हल्ल्यातील एकमेव आरोपी अजमल कसाब यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्याच्या फाशी संदर्भात आपला निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय होईल तेव्हा होईल, परंतू देशद्रोही, अतिरेक्यांच्या फाशीसाठी इतका विलंब होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा आणि शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. वास्तविक अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या कार्यवाहीसाठी, घातपाती कृत्त्यांबाबत, अतिरेकी कारवायांबाबत, घातक कृत्त्यांबाबत शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून अल्पावधीत निर्णय देणे आवश्यक आहे.
अफजल गुरू याने आपल्याला दिल्लीच्या तिहार कारागृहातून हलवून जम्मू-काश्मिर च्या कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी नुकतीच केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने शासनाकडे काही विचारणा केली आहे. गुरू याने संसदेवर हल्ला करताना हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या तसेच कायमची क्षती झालेल्या सुरक्षा कर्मचारी अथवा संबंधितांच्या कुटुंबियांच्या झालेल्या अवस्थेचा विचार तेव्हा केला नसावा. आपले कुटुंबीय जम्मू-काश्मिर येथे रहात असून आपल्याला भेटण्यासाठी येथे येणे त्यांना अडचणीचे होत असल्यामुळे आपल्याला जम्मू-काश्मिर कारागृहात हलविण्यात  यावे अशी मागणी त्याने केली आहे. संसदेवरील हल्ल्यात क्षती झालेल्या कुटुंबियांना तर त्यांच्या व्यक्तीस कायमचे गमवावे लागले आहे. त्यांची व्यक्ती त्यांना पुन्हा कधीही न भेटण्यासाठी देशासाठी बलिदान देऊन भारतमातेच्या कुशीत सामावली आहे. शासनाने याचे भान ठेवून गुरू याची कोणतीही मागणी मान्य न केल्यास खरोखर शहाणपणाचा निर्णय ठरेल, हाच विश्वास!
देशात झालेले अतिरेकी हल्ले:
१२ मार्च १९९३ - मुंबई - २५७ ठार
१४ फेब्रुवारी १९९८ -  कोईम्बतूर - ४६ ठार
१ ऑक्‍टोबर २००१ - जम्मू-काश्‍मीर विधानभवन - ३५ ठार
१३ डिसेंबर २००१ - नवी दिल्ली येथे भारतीय संसदेवर हल्ला
२४ सप्टेंबर २००२ - अक्षरधाम मंदिरावर हल्ला - ३१ ठार
१४ मे २००३ - जम्मूच्या लष्करी तळावर हल्ला - ३० ठार
२५ ऑगस्ट २००३ - मुंबईत कार बॉम्बचा स्फोट - ५२ ठार
१५ ऑगस्ट २००४ - आसाममध्ये स्फोट - १६ ठार
५ जुलै २००५ - अयोध्येत हल्ला
२९ ऑक्‍टोबर २००५- नवी दिल्ली तीन जागी बॉम्बस्फोट - ७० ठार
७ मार्च २००६ - वाराणसी येथे बॉम्बस्फोट - २१ ठार
११ जुलै २००६ - मुंबई लोकल रेल्वेगाड्यांत सात बॉम्बस्फोट - सुमारे २०० पेक्षा अधिक ठार
८ सप्टेंबर २००६ - मालेगाव मशिदीत बॉम्बस्फोट - ३७ ठार, सुमारे १२५ पेक्षा अधिक जखमी
१८ मे २००७ - हैदराबाद मक्‍का मशिदीवर हल्ला - ४ पोलिसांसह १३ ठार
२५ ऑगस्ट २००७- हैदराबाद लुम्बिनी पार्कमध्ये स्फोट - ४२ ठार
१३ मे २००८ - जयपूर - बॉम्बस्फोटांची मालिका - सुमारे १०० पेक्षा अधिक ठार

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.