मुख्य सामग्रीवर वगळा

'नवीन पोपट' तयार होऊ न देणे 'यशवंतांसाठी' महत्वाचे...

मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळणार्‍या संशयित पोपट शिंदे याचा मृत्यू झाला. निर्ढावलेल्या भ्रष्टाचाराने आणि भ्रष्टाचारास पोसणार्‍यांच्या स्वैराचारामुळे पोपट शिंदेंप्रमाणेच नवीन भेसळ माफिये तयार होऊ न देणे, यशवंत सोनवणे यांच्यासारख्या चांगल्या शासकीय अधिकार्‍यांसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव जिल्ह्यातील पानेवाडी प्रकल्पाजवळ इंधनात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावरून यशवंत सोनवणे संबंधित ठिकाणी छापा मारण्यासाठी गेले होते. घडत असलेला भेसळीचा प्रकार गंभीर आणि त्याचे स्वरूप मोठे असलेले पाहून सोनवणे यांनी आणखी काही अधिकार्‍यांना पाचारण करण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. पोपट शिंदे याला समज देतानाच परिस्थिती आणखी चिघळली, यामुळे आणखी अधिकारी, कर्मचारी आवश्यक होते. दरम्यान, सोनवणे यांच्याशी झालेल्या बाचाबाची पोपट शिंदे आणि सहकार्‍यांनी सोनवणे यांच्या अंगावर इंधन टाकून त्यांना जीवंत जाळले. यात सोनवणे यांचा घटनास्थळीवरच मृत्यू झाला होता. शिंदे याला सोनवणे यांनी पकडून ठेवल्यामुळे तो देखील सुमारे सत्तर टक्के जळाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर सहा दिवसांनी सोमवारी (ता. ३१ जानेवारी) संशयित शिंदे याचा मृत्यू झाला.
घडलेल्या घटनेमुळे शासन खडबडून जागे झाले (?) आणि ठिकठिकाणी भेसळ माफियांवर कारवाई करण्यात येऊन सुमारे दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आले. मध्यंतरी पोपट शिंदे याच्या निकटवर्तीयांनी सोनवणे हे शिंदे याला पैशाची मागणी करत होते अशा आशयाची तक्रार दिली. काही क्षण ही तक्रार जरी ग्राह्य धरली, तरीसुद्धा पैसे, लाच मागणार्‍या अधिकार्‍याला, एखाद्या व्यक्तीस जीवंत जाळणे हे कोणत्या कायद्यात बसते? जाळणे अथवा जीवे मारणे हा काही अंतिम उपाय, समाधान नाही...। लाच, भ्रष्टाचार याबाबत न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे (मिळणारा न्याय विलंबाने मिळतो, हे वेगळे), मात्र अशा विभागांकडे धाव घेणे आवश्यक आहे.
या घटनेचा आणि अशा प्रकरणांचा थोडा अभ्यास करता, विविध बाबींची बीजे प्रथम शासन रोवते. डोईजड झाल्यानंतर राजकारण्याप्रमाणे कारवाई करायची, हे अनेकदा दिसून येते. म्हणतात नां, "ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात भत्ता"। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये, मंत्रालयात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे नागरिकांच्या तक्रारींवरून जाणवते. एखाद्या मोठ्या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करायची, कालांतराने नागरिक विसरतात याची चांगली जाण असल्यामुळे नंतर सगळे थंडावते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस यशवंत सोनवणे यांनी जणू भ्रष्टाचार, भेसळ करणार्‍या माफियांविरुद्ध बलिदान दिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे शासनात देखील चांगल्या, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी कार्यरत आहेत. सोनवणे यांना त्यातलेच मानले जाते. आपल्यापेक्षा जग मोठे असते आपण जगाच्या तुलनेत जमिनीवरून जाणार्‍या, भिंतीवरच्या मुंगीइतके छोटे असतो. बोटावर मोजण्याइतक्या चांगल्या प्रतिमेच्या लोकांमुळेच सारे काही ऑल ईज वेल.. सुरू आहे याची जाणीव शासनाला, लोकप्रतिनिधींना देखील असतेच. शिंदेंसारख्या व्यक्तीची पोच अगदी मंत्रालयापर्यंत असल्यामुळे शिंदेने Mr. Clean अशी प्रतिमा देखील कागदोपत्री तयार करवून घेतली होती. शिंदे याने मुलीचे लग्न सुद्धा जवळ असलेल्या काळ्या पैशाने अगदी थाटामाटात लावून देऊन मोठमोठ्या हस्तींना आमंत्रित केले होते, या हस्तींनी लग्नात हजेरी सुद्धा लावली होती. आपली पोच किती आहे हे कदाचित शिंदे याने या माध्यमातून दाखवून दिले असावे. अन्यथा केवळ वडा विकणारा, नंतर किराणा दुकान चालवणारा, ढाबा चालविणारा एखादा माणूस इतक्या थाटामाटात समारंभ आयोजित करणे सध्याच्या काळात तरी अशक्यप्राय आहे.
                                       वाट चुकलेला पोपट आयुष्याचीच वाट चुकला...
पोपट शिंदे आणि त्याची बहिण मनमाड नजीक वाट चुकले होते आणि यानंतर तो तिथेच स्थायिक झाला, असे त्याचे निकटवर्तीय सांगतात. वाट चुकलेल्या या पोपट शिंदे आयुष्यात चालण्याच्या सन्मार्गाचीच वाट चुकला. आपण करीत असलेल्या कृत्याचा पश्चात्ताप देखील पोपट याला झाला नसावा. अन्यथा आपल्या कुटुंबियांवर याचा काय परिणाम होईल? याचा विचार त्याने नक्कीच केला असता आणि सत्कृत्य करू शकला असता.
आता तरी शासनाने खरोखर जागे होऊन भ्रष्टाचार आणि भेसळ करणार्‍यांवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी. परिणामी भविष्यकाळात नव्याने तयार होणारे असले पोपट शिंदे सारखे माफिया, भ्रष्टाचार्‍यांना वेळीच पायबंद बसेल, हीच अपेक्षा!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....