मुख्य सामग्रीवर वगळा

दहा महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान - साडेनऊहजार उमेदवार रिंगणात

मुंबई, ता. १५ - बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी उद्या (ता. १६) मतदान होणार असून १ हजार २४४ जागांसाठी ९ हजार ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

महानगरपालिकानिहाय तपशील असा-

बृहन्मुंबई-     जागाः २२७      उमेदवार २२३३        मतदान केंद्र ८३२६    मतदार संख्या १०२७९३७७.
ठाणे-     जागाः १३०     उमेदवार ७७८        मतदान केंद्र १४७१     मतदार संख्या ११९४८८६.
उल्हासनगर-    जागाः ७८     उमेदवार ५०४         मतदान केंद्र ५७६     मतदार संख्या ४७६३२७.
नाशिक-     जागाः १२२     उमेदवार ९२९२         मतदान केंद्र १२५३     मतदार संख्या १००३०००.
पुणे-     जागाः १५२     उमेदवार ११७७         मतदान केंद्र २९९६     मतदार संख्या २५५८५७८.
पिंपरी-चिंचवड- जागाः १२८     उमेदवार ८८३         मतदान केंद्र १३३०     मतदार संख्या ११५२५८८.
सोलापूर-     जागाः १०२     उमेदवार ५५७         मतदान केंद्र ९२६     मतदार संख्या ७५४२४०.
अमरावती-     जागाः ८७     उमेदवार ७२४         मतदान केंद्र ६४२     मतदार संख्या ५१७३३८.
अकोला-     जागाः ७३     उमेदवार ५१७         मतदान केंद्र ४२३     मतदार संख्या ३४९५३६.
नागपूर-     जागाः १४५     उमेदवार १२३२       मतदान केंद्र २४९८  मतदार संख्या १९८६०५७.
 
निर्भयपणे मतदान करा

महानगरांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदान करून आपला हा बहुमोल हक्क बजवावा असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

या सर्व महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होत असून संबंधित सर्व महानगरपालिका हद्दीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य शासनाने आ पल्या विशेषाधिकारांचा वापर करून मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012