मुख्य सामग्रीवर वगळा

"पुस्तक दिवस" निमित्त...

माझंही एक स्वप्न होतं: मी मोठा होईन, लेखक होऊन एक छानसं पुस्तक लिहिन...वाचकांच्या खूप खूप प्रतिक्रिया मिळवेन...पण, पण, पण काय? शेवटी उलटंच झालं. या पुस्तकामुळे बरंच काही आणि सर्व काही होत असतं. खूप खूप पुस्तकं वाचली असती, तर ते सहज शक्य झालं असतं, पण तेव्हा आजच्या इतकी अक्कल नव्हती नां, पुस्तकं फाडणं जास्त माहित होतं. इतकं तरी ठीक आहे, की 'थोडी फार' नाही तरीही 'फार थोडी', पुस्तकं वाचल्यामुळे आज इतकं तरी करू शकतोय. पण बरोबरीचे मित्र कुठल्याकुठे निघून गेले याचं "शल्य" बोचतयं मनातल्या मनात, पण सांगू कोणाला? "कर्म" माझं, काही इलाज नाही. आज 'पुस्तक दिवस' या मथळ्यामुळे काहीतरी उगाच लिहावसं वाटलं, म्हणून ही गिचमिड...
आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्‍या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक...। किंबहुना पेपर म्हणजेच कागदाचे महत्वच दिवसेंदिवस वाढत आहे.
कॉम्प्यूटरमध्ये रेकॉर्ड जरी फीड केले जात असले, तरीही त्याची दखल, नोंद घेणे आवश्यक असतेच. विविध प्रकरणांमध्ये, घटनांमध्ये पुरावा म्हणून प्रत्यक्ष कागद, पुस्तकच वापरले, सादर केले जाते. लहानपणी शाळेत विद्यार्थ्यांना, पुस्तकी कीडा व्हा...असा उपदेश केला जातो. कित्ता गिरवण्याचे बाळकडू पाजले जाते. प्राचीन काळापासूनच पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगता येईल, अगदी जुने ग्रंथ पाहा, ते देखील कागदावरच रचून त्याचा ग्रंथ तयार करण्यात आल्याचे दिसून येते. पुस्तक वाचण्यासाठी काही तास लागत असले, किंवा छोटेसे वाटत असले, तरी त्याची निर्मिती वाटते तितकी सोपी नाही. जसं आपण जेवण अवघ्या काही मिनिटात करतो, परंतु त्यासाठी स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागते? अगदी हे असेच आहे. पे आणि पै म्हणजेच पेपर अर्थात कागद आणि पैसा हे दोन प्रमुख घटक असून यावरच सगळे पुढचे अवलंबून असते. अनेकदा तर दोन्ही घटकांमुळे पुस्तकाचा आकार कमी-जास्त करावा लागतो. पुस्तक-निर्मितीचे एखादे पुस्तक वाचून निर्मिती जरी केली, तरी या गोष्टी प्रत्यक्ष कार्याला सुरवात केल्यानंतरच अनुभवता येतात. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे, एकच ओवी अनुभवावी..।
एक मात्र आहे, की पूर्वी मोठ्या आकारात असलेली अनेक पुस्तकं आज विज्ञानाच्या चमत्कारामुळे त्यांचा आकार लहान करता येणे शक्य झाले आहे.अगदी मुठीत मावेल इतक्या लहान आकारात "गीता" उपलब्ध आहे. यानंतरच्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती आणि विकास होऊन संगणकाचा शोध लागून हाच शोध माणसाच्या प्रगतीला पोषक ठरणारा अक्षरशः "टर्निंग पॉईंट" ठरला. आजकाल तर ई-पुस्तकं सुद्धा इंटरनेटवर दिसू लागली आहेत. सीडी,डिव्हीडीमध्ये मोठे पुस्तक सहजगत्या संग्रहित करता येते. पुस्तकंही इतिहासाप्रमाणेच अनेक वर्ष टिकतात, पुस्तक सातासमुद्रापार नाही गेले, तरी लेखकाला सातासमुद्रापार नेते किंवा लेखक सातासमुद्रापार नाही गेला, तरीही त्याचे पुस्तक त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सातासमुद्रापार नेते. एकच आहे, पुस्तकाला भीती असते, ती 'कसर' पासून, अर्थात वाळवीपासून. ही वाळवी पुस्तक पोखरताना कोणतीही 'कसर' बाकी ठेवत नाही, सगळी कसर काढून घेते. यावर उत्तम उपाय म्हणजे संगणक (कॉम्प्यूटर) चा आधार घेणे...।
वर सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचनामुळे माणुस विद्वान होतो, जगात त्याची वाहवा होते. पुस्तकाचे एखादे पान जरी वाचले तरीही तेवढी विद्या प्राप्त होऊ शकते. म्हणतात नां - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच चिन्तयेत्...। एक सुभाषित आठवले, ते सांगतो आणि वेळेअभावी विषयाला पूर्णविराम देतो...
सुभाषित असे आहे- स्वदेशेशु धनं विद्या विदेशेशु धनं मति। परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वैधनं।(अर्थात, आपल्या देशात विद्या हेच धन असते, या धनाचे मूल्य विदेशात बुद्धी म्हणून केले जाते, तसेच चांगले चारित्र्य हे सर्वत्र धनासारखे असते.)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.