मुख्य सामग्रीवर वगळा

गणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम लवकरच

मुंबई, - मुंबईसह राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला शासनाचे नेहमीच प्राधान्य असून गणपतीपुळे व तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. असे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलिया येथील शुअर लाइफ सेव्हिंग या संस्थेचे प्रमुख श्री. नॉर्मन फार्मर यांच्यासह राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटीचे प्रमुख पी. डी. शर्मा, युवराज चंदेशा आणि जूहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड या संस्थेचे सुनिल कनोजिया यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.
अशासकीय संस्था (एनजीओ) असलेल्या या संस्थांनी संयुक्तपणे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर लाइफगार्ड सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. जुहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड संस्थेतर्फे कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय लाइफ-सेव्हिंग उपक्रम व्यवस्थितरित्या चालविण्यात येत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली.
ते म्हणाले, की समुद्रकिनार्‍यांवर लाइफसेव्हिंग सुविधा आम्हाला विकसित करावयाचीच आहे. त्यादृष्टीने या संस्थांच्या प्रतिनिधींनी आमच्या गणपतीपुळे आणि तारकर्ली किनार्‍यांची पाहणी करावी. तेथे कोणकोणत्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, कोणती साधने आपल्याला लागतील, कोणत्या सुविधा विकसित करण्यात येतील, किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच त्यांची निगा कशी राखणार, लागणारा निधी व त्याचा विनियोग यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. तसेच स्थानिक नागरिकांनाच लाइफ सेव्हर म्हणून प्रशिक्षित करून आपल्या कामात सहभागी करण्याची सूचनाही केली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर उपस्थित होते



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.