सोमवार, ७ मार्च, २०११

अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे मागासवर्गीयांचा भक्कम पाठीराखा हरपला: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
मुंबई, दि. 4 फेब्रुवारी : ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे देशातील अल्पसंख्य, मागासवर्गीय समाजाचा भक्कम पाठीराखा काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, अर्जुन सिंग हे भारतीय राजकारणातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांत इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घेतलेल्या कणखर पुढाकारामुळेच मागासवर्गीय समाजाला हा लाभ होऊ शकला. अल्पसंख्य, मागासवर्गीय समाज याबद्दल नेहमीच अर्जुन सिंग यांचा ऋणी राहील, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...