मुख्य सामग्रीवर वगळा

ऍम्युझमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १५ - ऍम्युझमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजक कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. इंडियन असोसिएशन ऑफ ऍम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित अकराव्या "ऍम्युझमेंट एक्स्पो" या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तंत्रज्ञान जितक्या गतीने विकसित होते तितक्याच गतीने ऍम्युझमेंट (मनोरंजन) उद्योगांनी या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या विविध उपक्रमात सुद्धा सातत्याने नाविन्यपूर्णता आणि अभिनवता आणण्याची गरज असते. तसे झाले तरच एकदा येणारा पर्यटक, ग्राहक पुन्हा तिथे येईल. तसेच नवीन ग्राहकांची देखील भर पडेल. ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिण्याची गरज आहे.
सुमारे पाच हजार कोटिंचा ऍम्युझमेंट उद्योगाच्या आशिया-पॅसिफिक विभागातील वृद्धीचा दर ५.५ टक्के प्रतिवर्ष इतका आहे. तोच युरोपसह अन्यत्र ५ टक्के आहे. म्हणूनच अनेक परकीय गुंतवणुकदार कंपन्या भारतात या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. देशात महानगरांसह छोट्या-छोट्या खेड्यांमधील नागरिकांचा ओढाही ऍम्युझमेंट पार्ककडे वाढू लागला आहे. त्यांना आवश्यक त्या मनोरंजन सुविधा उपलब्ध करण्यासाठी देशातील व परकीय उद्योजकांनी गुंतवणुक करण्याची गरजही भुजबळ यांनी प्रतिपादित केली.
कार्यक्रमास एयएएपीएय चे संस्थापक सदस्य अशोक गोयल, अरुणकुमार मुच्छला, बलवंत चावला, एमजीएम आनंद, राजन शाह, ट्रेड शो समितीचे चेअरमन अजय सरीन आदी मान्यवर आणि देशातील उद्योजकांसह १४ देशांमधील उद्योजक उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.