मुख्य सामग्रीवर वगळा

कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील: भुजबळ

मुंबई, दि. 21 मार्च : कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी आपले ठोस प्रयत्न सुरू असून येत्या वर्षभरात पर्यटन विकासाची जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
विधान परिषद सदस्य सर्वश्री राजन तेली, संजय दत्त, भाई जगताप, परशुराम उपरकर, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री. भुजबळ बोलत होते.
श्री. भुजबळ यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकण रिव्हिएरा सर्किट अंतर्गत सर्किट-1, सर्किट-2 व सर्किट-3 साठी अनुक्रमे 3 कोटी 2 लाख रुपये, 2 कोटी 88 लाख 54 हजार रुपये व 1 कोटी 34 लाख 42 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास प्राप्त झाला. हा सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी पूर्ण खर्च झाला असून त्याअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या माध्यमातून विजयदुर्ग येथील निवास व्यवस्था, उपाहारगृह, वाहनतळ व जलक्रीडा इत्यादी कामांचा समावेश आहे. या सुविधा खाजगीकरणाद्वारे सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. सिंधुदुर्ग येथे पर्यटकांसाठी मालवण जेट्टीचे बांधकाम व मजबुतीकरणही करण्यात आले. त्याचबरोबर दिवेआगार, उभादांडा येथे रॉयल टेंट तसेच धामापूर व आंबोली येथे पर्यटक निवासांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
कोकण विकास पॅकेज अंतर्गत राज्य शासनाकडून सन 2004मध्ये 3 कोटी 60 लाख रुपये वितरित करण्यात आले. हा निधीसुध्दा खर्च होऊन त्याअंतर्गत निर्धारित कामेही पूर्ण करण्यात आल्याची माहितीही भुजबळ त्यांनी दिली.
12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार रायगड जिल्ह्यासाठी 24 कोटी 80 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 52 कोटी 57 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी 18 कोटी 89 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 82 कोटी 99 लाख रुपये तर मुंबईसाठी 45 कोटी 73 लाख रुपये असा सुमारे 225 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर करून महाराष्ट्र पर्यटन महामंडळास वितरित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या निधीतून तारकर्ली येथे धूप प्रतिबंधक बंधारा व स्कुबा डायव्हिंग केंद्र आणि कुणकेश्वरसाठी 5 कोटी 70 लाख रुपये खर्चाची कामे प्रगतीपथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पर्यटन विकासाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना 9 कोटी 25 लाख 45 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सन 1999मध्ये स्थापन करण्यात आलेले सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळ हे विविध कारणांमुळे स्थापनेपासूनच कार्यरत नसल्याने ते सध्याच्या कंपनी कायद्याअंतर्गत इझी एक्झिट स्कीम-2011अंतर्गत बंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे सागरी क्षेत्र पर्यटन विकास महामंडळ हे कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन करण्याची प्रक्रिया सुध्दा सुरू असल्याची माहितीही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.

* गुहागरमध्ये पर्यटक सुविधा विकसित करताना स्थानिक लोकप्रतिनिधींची मतेही विचारात घेणार

12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सागरी किनारा पर्यटन विकास महामंडळास वितरित करण्यात आलेल्या निधीतून सुधारित कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी 6 कोटी रुपयांच्या निधीतून गुहागर येथे पर्यटक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित अधिकारी यांची मते विचारात घेऊनच या सुविधा निर्माण करण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
सर्वश्री हेमंत टकले, विक्रम काळे, सतीश चव्हाण, रमेश शेंडगे, प्रकाश बिनसाळे, श्रीमती उषाताई दराडे या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले, 12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्याची विशेष गरज याअंतर्गत सागरी किनारा पर्यटन विकासासाठी राज्य शासनाला सन 2006-07 ते सन 2007-08 या दोन वर्षांत अनुक्रमे 62.50 कोटी व 57.50 कोटी रुपये तर सन 2009-10मध्ये 105 कोटी रुपये असे एकूण 225 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास वितरित करण्यात आले. तथापि, या कामांची अंमलबजावणी करताना जागेची उपलब्धता, वन विभागाच्या अडचणी, सी.आर.झेड. निर्बंध इत्यादी कारणांमुळे मंजूर करण्यात आलेली कामे हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही. परंतु, आता या निधीचे फेरआढावा घेऊन नियोजन करण्याबाबत मी स्वत: बैठका घेतलेल्या आहेत. त्यानुसार या वर्षात केंद्राकडून आलेला निधी अजिबात अखर्चित न राहाता त्याचा पूर्णत: विनियोग करण्यात येईल. गुहागरसाठी राखून ठेवलेल्या 6 कोटी रुपयांचा विनियोगही संबंधितांशी सल्लामसलत करून योग्य त्या सुविधांवर खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...

सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर

मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन...