मुख्य सामग्रीवर वगळा

विठ्ठल उमप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई. ता. 26-  जांभूळ-आख्यान या विस्मरणीय लोकनाट्यामुळे जनमानसांवर अधिराज्य गाजविलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा लोकरंगनायक काळाच्या पडद्याआड गेला. मनोरंजन आणि प्रबोधन यांची सुरेख सांगड घालणारे स्व. उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत रंगभूमीची सेवा केली, या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.

लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला-उपमुख्यमंत्री पवार

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री विठ्ठल उमप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.
श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की उमप यांनी लोककलेचा प्रत्येक कलाप्रकार आत्मीयतेने हाताळला. जांभुळ-आख्यान सारखा कार्यक्रम सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. वयाच्या 80 वर्षानंतर देखील ते तळमळीने लोककला सादर करीत होते. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते
कार्यरत होते आणि लोककलेची साधना करीत होते.

उपेक्षितांच्या दुःखांना वाचा फोडणारा कलावंत हरपला - छगन भुजबळ

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनाने फुले-शाहू-आंबेडकरांचा महान वारसा जोपासणारा आणि आपल्या कलेच्या माध्यमातून उपेक्षितांची दुःखे अभिजनांपर्यंत पोचविणारा अस्सल लोककलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. महात्मा जोतीराव फुले याच्या अखंडावर आधारित "गीतफुले' या मी निर्माण केलेल्या ध्वनिफितीमध्ये उमप यांनी "सर्वांचा निर्मिक आहे एक' ही कविता म्हटली होती. उमप यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त नुकताच माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. शाहीर उमप यांच्या निधनाने आंबेडकरी लोकचळवळीचे आणि राज्याच्या लोककला क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. शाहीर आत्माराम पाटील यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राने आपला आणखी एक महान लोककलाकार गमावला आहे.

झी मराठी वाहिनीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सारेगमप या संगीत मालिकेचे ते मार्गदर्शक होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012