मुख्य सामग्रीवर वगळा

कांद्याने केल्या गुदगुल्या...

मध्यंतरी झालेल्या अकाली पावसामुळे राज्यासह देशाच्या अनेक भागात मुख्यत्वे कांदा हे हाती आलेले पीक खराब होऊन कांद्याने न चिरताच डोळ्यात पाणी आणले होते. सुमारे चाळीस रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेल्यानंतर शासनाने त्वरीत हालचाली केल्यामुळे काही राज्यात जाणवणारी कांद्याची कमतरता आणि परिस्थितीनुरुप वाढलेले भाव कमी होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमधून कांदा संबंधित राज्यात पुरवला जाणार असल्याचा निर्णय कृषि मंत्रालयाने घेतला आहे.
खाण्यासाठी आणि स्वयंपाकात चवीपुरता का होईना, कांदा मिळणार असल्याचा आनंद आणि गुदगुल्या ग्राहक आणि गृहिणींना होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012