मुख्य सामग्रीवर वगळा

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग ही एक वैयक्तिक रोजनिशी आहे. दररोजचे व्यासपीठ..असेही आपण म्हणू शकतो. इथे आपण आपले स्वतःचे विचार मांडू शकतो. मत व्यक्त करू शकतो. जे अपेक्षित आहे ते लिहू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ब्लॉग म्हणजे एक वेबसाइटच असते. आपण दररोज येथे वेगवेगळ्या नोंदी लिहू शकता. नवीन नोंद, लिखाण पानाच्या वरच्या बाजूस दिसते. जेणेकरून अभ्यागत किंवा वाचक, नवीन काय आहे? ते वाचू शकेल. यानंतर त्यांना संबंधित विषयावर आपले मत मांडण्याची संधी सुद्धा येथे टिप्पणी (comment) द्वारे त्यांना मिळू शकते. विषय पूर्ण झाल्यानंतर खालच्या बाजूस comments/टिप्पणी लिहिण्यासाठी एक चौकोन दिसेल, येथे टिप्पणी लिहिली जाते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.