मुख्य सामग्रीवर वगळा

लहुजींनी ज्ञानप्रसार केला: प्रा. हरी नरके

मुंबई, ता. १८- महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीमध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी वस्त्यावस्त्यात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम केले. असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. हरी नरके यांनी केले. मुंबई येथे क्रांतीकारक लहुजी साळवे यांच्या २१६ व्या जयंतीनिमित्त भारतीय बहुजन परिषदेच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. नरके म्हणाले, की जोतीराव-सावित्रीबाईंना घर सोडावे लागले, तेव्हा लहुजी त्यांच्या मदतीला धावले नसते तर फुले यांचा कार्य बंद पडले असते. आपल्या शैक्षणिक चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून जोतीराव लहुजींना गुरूस्थानी मानत होते.  साहित्यिकांना सध्या देण्यात येणारे वाड्‍.मय पुरस्कार इंग्रज सरकारला सुरू करायला लावण्यात लहुजींचा मोठा हातभार होता.
मुक्ता साळवे या दलित साहित्यातील आद्य लेखिका असून त्यांचा निबंध दीडशे वर्षांपूर्वी राज्यात गाजला होता. परिक्षेतील पुरस्कार स्वीकारताना आपल्याला खाऊच्या खेळण्याचे बक्षिस नको, तर शाळेला ग्रंथालय द्या अशी मागणी मुक्ताने केली होती. ब्रिडीश राजवटीत दक्षिणा प्राईज कमेटीतर्फे पुरोहितांना दिल्या जाणार्‍या दक्षिणेतील काही रक्कम ग्रंथ पुरस्कारासाठी केली जावी अशी मागणी लोकहितवादी व त्यांच्या सहकार्यांनी सरकारकडे केली होती.
साहित्य हे संस्कृतीच्या जनुकांचे वाहक असते. सहिष्णुता आणि भलेपणाची वृत्ती जागती ठेवण्याचं काम लेखक करतो. साहित्य संमेलन म्हणजे एक प्रकारे सामुहिक उमदेपणाचा उत्सव असतो. वाचन ही एक कला असून वाचनात मागे असलेले लोक समाज उपद्रवात पुढे जातात. अणूबाँबच्या स्फोटापेक्षाही जगाला निरक्षरतेचा धोका मोठा आहे. निरक्षरता मानवी संस्कृतीला धोक्यात टाकते असे प्रतिपादन प्रा. नरके यांनी यावेळी केले.
कुसुम कपोले यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. बाबासाहेब गोपले यांनी १५ ठराव मांडले. स्वागताध्यक्ष अप्पासाहेब अवचारे, विकास तांबे, साहित्यिक दया हिवराळे, संपत जाधव, शरद जाधव यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक व आभार व्यंकट शिंदे यांनी मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...