मुख्य सामग्रीवर वगळा

'कसाब' चा पुळका कशाला "साब"...

(संग्रहित छायाचित्र)
देशाची आर्थिक राजधानी मानली जाणार्‍या मुंबईवरील हल्ल्याला येत्या २६ नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होतील. जवळपास ६० तास सुरक्षा यंत्रणांनी अथक परिश्रम करून अतिरेक्यांच्या ताब्यात असलेली हॉटेल ताजसह इतर ठिकाणे मुक्त केली होती. या हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होऊन अनेक महिने उलटून गेले. कसाही वागणार्‍या उर्मट कसाबसाठी शासनाला इतका पुळका कशाला हवा?
संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत मुंबईतील महत्वाची ठिकाणे ताब्यात घेऊन बेछुट गोळीबार करून देशाच्या अनेक नागरिकांना आणि कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या अधिकार्‍यांना देखील मारणार्‍या नराधम अतिरेक्यांपैकी कसाब हा एक अतिरेकी सुरक्षा पथकांच्या हाती जखमी अवस्थेत जीवंत सापडला. रुग्णालयातून उपचार घेऊन बरा झाल्यानंतर कसाबची रवानगी तुरुंगात करण्यात येऊन त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. स्वतंत्र सेल, स्क्वॉड, यंत्रणा..सर्वच अगदी स्वतंत्र..। खरंतर प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी कसाब याने गोळी झाडताना दाखविल्याची चित्रफीत उपलब्ध असताना आणखी पुरावे मागण्याची मुळात गरजच काय?
कसाब याचे जेवण, राहणी, सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष तैनाती, वाहतूक, वहन, तपासण्या, विशेष वकील इ.वर दररोज लाखो रुपये खर्च झाला असून हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात तर कधीच पोहोचला आहे. मध्यंतर तो तुरुंगाधिकार्‍यांशी वाईट वागला, कुटे थुंकला, तरीही सर्व काही निमुटपणे सहन करायचे..। इतकी सन्मानाची वागणूक त्याला कशाला हवी? पाकिस्तानमधील भारतीय वंशाच्या लोकांना अथवा भारतीय कैद्यांना मिळणारी वागणूक शासनाने ध्यानात घेणे नितांत गरजेचे आहे. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याची देखील अनेक उदाहरणे आजकाल समोर येत आहेत. परंतु इतक्या मोठ्या देशद्रोह्याला, अतिरेक्याला पोलिस संरक्षणाची गरजच का? कसाबकडून मिळवायची तेवढी माहिती घेणे पूर्ण झाल्याचे सुरक्षा यंत्रणेचे सांगितले असल्याचे वृत्त आहे. परिणामी त्याला जनतेच्या सुपूर्द करणे अथवा लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणे आवश्यक ठरले आहे. दोन वर्ष उलटून देखील अद्याप त्यावर निर्णय न होऊ शकणे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे.
अतिरेकी, देशद्रोही यांच्यासाठी विशेष कायद्याची तरतूद घटनेत करण्यात यावी. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानच्या भारत-विरोधी कारवायांना अजिबात पायबंद न बसता उलटपक्षी पोषक वातावरण, परिस्थिती निर्माण होईल. शासनाच्या ताब्यात असलेल्या सर्वच अतिरेक्यांना लवकरात लवकर फाशी देऊन संभाव्य खर्च टाळण्यात यावा. खर्च होणारी रक्कम शहीदांच्या कुटूंबांना दिल्यास मोठा आधार होऊन, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, हवे तसे शिक्षण घेता येईल, देशाच्या शिलकेत एकप्रकारे भरच पडेल, हाच विश्वास!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा - छगन भुजबळ

मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले. हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्य...