मुंबई, ता. १२- मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून सुमारे ५५३ कोटी रुपये खर्चाचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मुंबई-गोवा राज्यमार्ग क्र. १७ वरील इंदापूर ते झाराप या चार टप्प्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचा सुसाध्यता अहवाल तपासण्याचे काम सुरू असून ते येत्या मार्च २०११ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर या कामाचा अहवाल केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येऊन मंजुरीनंतर चौपदरीकरणाचे हे काम त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्नशील आहोत. हे काम इंदापूर ते कशेळी घाट (लांबी ७७ किमी), कशेळी घाट ते संगमेश्वर (लांबी ९९ किमी), संगमेश्वर ते टाकेवाडी (लांबी १०७ किमी), टाकेवाडी ते झाराप (लांबी ८३ किमी) याप्रमाणे चार टप्प्यात आहे.
झाराप ते पत्रादेवी हे सुमारे २१ किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येत्या डिसेंबर २०११ पर्यंत हे पूर्ण होईल.
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...