मुख्य सामग्रीवर वगळा

सिडकोच्या प्रकल्पांना नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट

 
मुंबई, ता. १८ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणार्‍या जमिनीसंदर्भात येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांचे समाधान होईल, असे पुनर्वसन आणि पुनःस्थापना धोरण अवलंबिण्यात येईल तसेच या प्रकल्पग्रस्तांचे १२.५ टक्के भूखंड वाटपाबाबतचे अधिकारही अबाधित राहतील. अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली आहे. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेटी दरम्यान  पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे उपस्थित होते. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी तसेच सिडकोच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण नवी मुंबईस भेट देत आहोत. नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर आकारास यावे तसेच येथून स्थलांतरीत होणार्‍या प्रकल्पग्रस्तांची योग्य काळजी घेतली जावी या अनुषंगाने सिडको आणि शासन स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, १९७० साली केवळ १.१७ लक्ष लोकसंख्या असणारा हा परीसर आज १८ लक्ष लोकांचे निवासस्थान असून हीच सिडकोच्या चांगल्या कार्याची पोचपावती आहे.
श्री. जाधव यांनी यासह विमानतळ प्रकल्प, उन्नती गृहनिर्माण योजना, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, आगरी कोळी संस्कृती भवन आणि एक्झिबिशन सेंटर या प्रकल्पांना भेट दिली. प्रकल्पाच्या विकासासंदर्भात सूचना देखील केल्या. सिडकोच्या विभाग प्रमुखांशी विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष नकुल पाटील, संचालक सुभाष भोईर, नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडाचे वाटप, गरजेपोटी बांधलेल्या घरांचे प्रश्न इ. विषयी चर्चा करण्यात आली. सिडकोचे मागील ४० वर्षातील विविध प्रकल्प आणि विकसनशील प्रकल्पांविषयी माहिती देणारे सादरीकरण मुख्य नियोजक एम. व्ही. लेले यांनी केले. श्री. सत्रे यांनी प्रकल्पांविषयी विस्तृत माहिती दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...