मुख्य सामग्रीवर वगळा

अति सर्वत्र वर्ज्यते...।

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. एका देशातून दुसऱ्या देशात क्षणात ज्या-त्या देशातल्या घडामोडी, घटना यांची प्रत्यक्ष माहिती समजू शकते. वैज्ञानिक विविध विषयांचा अभ्यास करून मानवाच्या हितासाठी, असाध्य रोगांवर तोडगा निघावा म्हणून विविध औषधे,लसींचा शोध लावत आहेत. भारत देखील यात तसूभर देखील मागे नाही. परंतू कोणत्याही बाबतीत मर्यादा ओलांडल्यास पुन्हा शून्यावर वेळ येऊन ठेपते. बंगलोर येथील एका संशोधन केंद्राने टायफॉईड संदर्भात अँटीबायोटिक म्हणून समजल्या जाणाऱ्या हळदीवर अर्थातच हळद या घटकावर संशोधन केले. हळदीचा वापर "अति" केल्यास हळदीच्या अती वापरामुळे माणसावर जीव गमावण्याची वेळ येते असे अनुमान काढल्याचे आजच (30 जानेवारी 11) एका इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे. खरंतर, अति सर्वत्र वर्ज्यते...। हा निसर्ग नियमच आहे, हे या संशोधकांना ठाऊक नसावे. अमृत जरी अति सेवन केले तरीसुद्धा त्याचेही विष तयार होते. हळदीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी कोणत्याही निष्कर्शावर पोहोचण्यापूर्वी, अनुमान काढण्यापुर्वी ज्येष्ठ, तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदाच्या ज्येष्ठांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. निसर्गाने मानव कल्याणासाठीच हळदीसारख्या विविध वनौषधींची निर्मिती केली आहे. स्थिर बुद्धीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यास आणि ठरलेल्या मात्रेतच हळदीसारख्या वनौषधींचा वापर केल्यास अखिल मानवाचे कल्याणच होईल, किंबहुना "हल्दी" मुळे मानव "हेल्दी" आणि "वेल्दी" देखील राहील यात शंका नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012