मुख्य सामग्रीवर वगळा

नूतन वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकारांनी शासन स्तरावर उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १८ - नूतन वास्तूविशारद आणि अंतर्गत सजावटका कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आता शासन स्तरावरही उत्तम संधी उपलब्ध होत आहेत, याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील जे. डब्ल्यू. मॅरियॉट हॉटेलमध्ये काल रात्री नवव्या ड्युरियन सोसायटी इंटेरियर डिझाईन पुरस्कार वितरण श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, भारतीय स्थापत्यशास्त्र आणि अंतर्गत सजावट क्षेत्राला अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांनी विविध राजवटींच्या काळात विविध शैलींच्या माध्यमातून हा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याची जपणूक करतानाच ही परंपरा पुढे चालविण्याची आणि अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. अलिकडे शासन स्तरावर देखील साचेबद्ध वास्तूंच्या निर्मितीपेक्षा वैविध्यपूर्ण, आकर्षक तसेच अत्याधुनिक इमारती उभारण्यास शासन प्राधान्य देत आहे. खाजगी क्षेत्रात अधिक नावलौकिक, पैसा मिळत असला तरीही शासन स्तरावर उपलब्ध होणार्‍या संधींचा लाभ देखील कल्पक वास्तूविशारदांनी घ्यावा. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते आर्किटेक्ट व इंटेरिअर डिझाइनिंगच्या विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात आला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012