मुख्य सामग्रीवर वगळा

आंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंतीचे काम तातडीने मार्गी लावावे-भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - आंबोली घाटात वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. वनविभागास आवश्यक ते तांत्रिक सहकार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी करावे अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीतील कामांबाबत आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड, वनविभाग सहसचिव प्रदीप कुमार आदी उपस्थित होते.
गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या पावसाने आंबोली घाटातील १०० मीटर लांबीची आणि  ४० मीटरपेक्षाही उंचीची दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून येथील वाहतूक सुरळीत करावी लागली होती. संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेतच पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एखादी मोठी दरड कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक ते सर्व सहाय्य घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012