मुख्य सामग्रीवर वगळा

अंधेरी येथील नूतन 'आरटीओ' इमारतीचा पहिला मजला 15 दिवसांत सुसज्ज करावा - छगन भुजबळ


मुंबई, दि. 2 मे : अंधेरी (पश्चिम) येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कामकाज नूतन इमारतीतून सुरू व्हावे, या दृष्टीने या इमारतीच्या किमान पहिल्या मजल्याचे संपूर्ण काम येत्या 15 दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अंधेरी (पश्चिम) येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंडाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाचा श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत स्टील्ट अधिक दुमजली असणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम बाकी असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे, जेणे करून प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतरित करता येऊ शकेल. त्याचबरोबर पाणी व विजेच्या जुन्या जोडण्याही नव्या इमारतीत स्थलांतरित करून द्या. म्हणजे विभागाच्या कामात काही अडचण उद्भवणार नाही. या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळाचाही वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसनासह नाला सरळीकरण व भूखंडातून जाणाऱ्या प्रस्तावित डी.पी. रोडसंदर्भात संबंधित नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग तसेच मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र सदन, हायमाऊंटचे काम प्रगतीपथावर
या बैठकीत श्री. भुजबळ यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन तसेच हायमाऊंट राज्य अतिथीगृहाच्या कामकाजाच्या प्रगतीविषयीही माहिती घेतली. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या लँडस्केपिंगचे काम सुरू असून ते झाले की अंतर्गत सजावटीचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हायमाऊंट या एकूण नऊ मजल्यांच्या इमारतीच्या पाचव्या स्लॅबचे काम सध्या सुरू असून पहिल्या मजल्याच्या भिंतींच्या बांधकामालाही सुरवात करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.