मुख्य सामग्रीवर वगळा

ओसामा अखेर संपला..ओसामाचे अलकायदा आता पडणार ओस...

गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या सीमेनजीक वेगात सुरू केलेल्या ओसामा शोध मोहिमेस रविवारी मध्यरात्री (ता. २ मे) अखेर यश मिळाले. अमेरिकेच्या पथकास अपेक्षित यश मिळून ओसामाला ठार मारण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यामुळे सुमारे तीन हजार लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. ओसामाचा म्होरक्या ओसामा लादेन याचे यामागे मास्टरमाईंड असल्याचे मानले जात होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची लढाई अशीच सुरु राहणार असून, अल कायदाविरुद्धच्या लढाईतील हा सर्वात मोठा विजय आहे. आमची लढाई इस्लामविरुद्ध नसून, दहशतवाद्यांविरुद्ध आहे. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्याची अमेरिकी सैन्याला मदत झाल्याने मी त्यांचे आभार मानतो."
दरम्यान ओसामा याला ठार मारल्यास अमेरिकेस आणखी गंभीर परिणाम भागावे लागतील अशी माहिती गेल्या आठवड्यात अल कायदा या संघटनेने दिल्याचे वृत्त आहे. ओबामा यांनी लादेनला ठार मारल्याची घोषणा केली तेव्हा व्हाईट हाऊसबाहेर अनेक अमेरिकी नागरिकांची गर्दी जमली होती.
ओसामा ठार झाल्यामुळे आता ओसामाची संघटना अल कायदा ही संघटना नक्कीच ओस पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.