मुख्य सामग्रीवर वगळा

एक+विसाव्या शतकातली आई आणि एक+विशीतली मुलं...

सोळावं वरीस धोक्याचं गं बाई..सोळावं वरीस धोक्याचं! असं अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं. मात्र एकविसाव्या शतकात सोळाव्या वर्षी मुलांना बर्‍यापैकी समज येते आणि एकवीस वर्षांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतो. एकविसाव्या शतकातली आई सुद्धा मुलाने चांगला उद्योग-धंदा करून नावलौकिक प्राप्त करावा किंवा चांगली नोकरी करून लवकरच एखादी सुन घरी येण्याची स्वप्न पहाते. हेच मुलींच्या बाबतीतही लागू होते. मात्र, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली, की तिचं एखादं छान स्थळ पाहून लग्न लावून जबाबदारीतून मोकळं कधी होऊ? याचा विचार कायम आई करत असते.
आईचं महत्व काय आहे? हे सांगण्याची विशेष गरज नाही. परंतू दिवसेंदिवस मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि त्यांना सुसंस्कारित करण्याची आईची जबाबदारी वाढते आहे. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा अशा घोषणा करणार्‍या सरकारने घोषणे पलिकडे काहीच न केल्यामुळे युवक मंडळी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात एमएनसी अर्थातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन/कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. कारण अगदी जोरात सुरू असलेले खाजगी क्षेत्रातील व्यवसाय, कारखाने बव्हंशी बंदही पडू शकतात असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. मात्र ग्लोबलायझेशनच्या या दुनियेत कॉर्पोरेट सेक्टरला चांगले दिवस आले असल्याचे दशकापासून दिसून येते.
लठ्ठ पगार देऊन पात्र उमेदवारांना इथे नोकरीसाठी आकर्षित केले जाते. चांगल्या गुणवत्तेच्या तरूणांना तर याचा लाभ होतोच. मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात कामासाठी तितकेच पिळूनही घेतले जात असल्याची उदाहरणे आहेत. सरासरी दिवसाचे आठ तास काम आणि पाच दिवसांचा आठवडा असे एकूण चाळीस तास फक्त काम असल्यामुळेही काही आळशी पण हुशार मंडळींचे चांगलेच फावते. मुलगा कामावरून घरी परत येईपर्यंत बिच्चार्‍या आईचे डोळे दाराकडे टक लावून मुलगा येण्याची प्रतीक्षा करतात. सातत्याने वाढणारी असुरक्षितता हे यामागचे एक प्रमुख कारण आहे, घरातून बाहेर पडल्यानंतर सहजासहजी कोणताही अपघात न होता घरी परत आलो तर आजचा दिवस सार्थक झाला...असे सूत्रच आता तयार झाले आहे. पूर्वीच्या आईला मुलगा कामावर गेल्यानंतर तितकी काळजी वाटत नव्हती. नोकरीवर जाताना सायकल, बस अथवा रेल्वेने अप-डाऊन करणे इतकीच मर्यादित साधनं होती. पण आजकाल अगदी शाळेतल्या मुलाला सुद्दा बाईक असते, रस्त्यावरून, गल्लीबोळातून भरधाव बाईक हाकताना मुलं दिसतात. नोकरीवरून अथवा शाळेतून मुलं घरी आल्यानंतर पूर्वी मित्र-मैत्रिणीकडे जात होती. आता ही परिस्थिती बदलली असून घरी आल्यानंतर आधी कॉम्प्यूटरवर फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सनां भेट देऊन साइन-इन करून हाय-हॅलो, आपण घरीच आहोत..असे संदेश आउट केले जातात आणि मुलांचा तर तासन् तास फेसबुकवरच गप्पा मारण्यातच वेळ जातो. त्रयस्थ व्यक्तीस फ्रेंडशिप ची रिक्वेस्ट करताना आपल्या घरातच आपल्याशी मित्राप्रमाणे वागणार्‍या आई रुपी फ्रेंडचा विसर मुलांना पडतोय...यामुळे आई आणि मुलांमधला संवादही कुठे ना कुठे हरवला असल्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. परंतु सध्या संवादाअभावी फेसबुक सारखी स्थळंच मित्र असल्याची मुलांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
आता तर शाळेतही कॉम्प्यूटर (संगणक) हा विषय असल्यामुळे दुसर्‍या इयत्तेतल्या विद्यार्थ्यालाही कॉम्प्यूटर ऑपरेट करता येतो. कॉम्प्यूटर ही आगामी दशकात काळाची गरज ठरणार असल्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. त्यातच सातत्याने पुस्तकांच्या किंमतीत देखील होणारी वाढ, प्रचंड आणि पालकांना न झेपणारा शैक्षणिक खर्च यामुळे ई-लर्निंग योजना वाढीस लागून घरबसल्याच अभ्यास, शाळा अशा गोष्टी सुरू होतील, तो दिवस दूर नाही! अशा भविष्यामुळे आई देखील संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. आपली मुलं कॉम्प्यूटरवर बसून काय करतात? कोणत्या वेबसाइट्स उघडतात, त्यातून काय साध्य करतात? याकडे लक्ष ठेवणं ही प्रत्येक आईचीच जबाबदारी ठरणार आहे, नव्हे ठरली आहे. इंटरनेटचा सदुपयोग केल्यास मुलं खरोखर सद् गृहस्थ आणि जीवनात यशस्वी होतील इतकी माहिती इंटरनेटवर असते. सध्या मुलांचे बाबाही दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आणि रात्री उशीरा घरी येत असल्यामुळेच खरंतर आईची जबाबदारी वाढते आहे. आई सुशिक्षित असल्याचा फायदा आईने नक्की करून घ्यावा.
घरातल्या घरातच माणसांऐवजी कॉम्प्यूटरमध्ये हरवत असलेल्या मुलांना यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असून केवळ आईच हे चांगल्या प्रकारे करू शकते. नेट सर्फिंग खूप केली म्हणून न रागावता, स्वतः मुलांकडून संगणक-साक्षर आणि इंटरनेट-प्रवीण होऊन आई सुद्धा मुलांना अभ्यासात मदत करू शकते. मुलं शाळेत, कॉलेजला गेल्यानंतर त्यांना लागणार्‍या नोट्सची माहिती घेऊन ती घरी परत येईपर्यंत त्या नोट्स काढून त्यांना देऊन त्यांचेही टेन्शन हलके झाल्यास कॉम्प्यूटरमध्ये हरविलेली आणि सोशल साईट्समध्ये व्यस्त असलेल्या मुलांना निश्चितच आई हीच आपला खरा फ्रेंड असल्याची जाणीव होऊन हरविलेला संवाद पुन्हा साधला जाईल हाच विश्वास!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.