मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई येथे राष्ट्रीय पातळीवर खुली लेख स्पर्धा

मुंबई, ता. ३ - मुंबई येथे संवादिनी संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संवादिनी संस्था प्रामुख्याने ओबीसी वर्गासाठी कार्यरत असून या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातात. याचा एक भाग म्हणून संस्थेने राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
लेख स्पर्धेचे विषय असे- १. बहुजनांच्या विकासात शासकीय योजनांची भूमिका, २. मी, माझी संस्था आणि बहुजन विकास, ३. आजचा बहुजन समाज आणि राजकारण, ४. आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व इ.
उपरोक्त चार विषयांसाठी स्पर्धा असून शब्दमर्यादा १५०० ते २०००० पर्यंत असावी. ही लेख स्पर्धा सर्वांसाठी खुली असून २० मे २०११ पर्यंत अरूण लावंड, सी/२४, सहकार नगर, वडाळा, मुंबई - ३१ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी अरूण लावंड ९८६९७४६५१८ किंवा श्रीकृष्ण नाईक ९७५७१७५३९४ येथे संपर्क साधावा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.