शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी
नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013:
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे.
नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील याप्रसंगी उपस्थित होते.
आजवर ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू होती. या योजनेचे सामान्यांना मिळालेले लाभ लक्षात घेता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आघाडी सरकारने घेतला आहे.
या योजनेचे लोकार्पण केल्यानंतर यूपीए अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी भाषणासाठी उभ्या झाल्या तेव्हा लाखोंच्या जनसमुदायाने “सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी आगे बढो”चा एकच जयघोष केला. सभास्थळावर आल्यानंतर त्यांनी या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या 78 रूग्णांशी थेट संवाद साधला. सदर रूग्णांशी झालेली चर्चा गहिवरून आणणारी होती, असे श्रीमती गांधी म्हणाल्या. दुर्दैवाने एखादा गंभीर आजार जडला तर अनेकांना परिस्थितीअभावी उपचार घेणे शक्य होत नसे. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन यूपीए सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू केल्याचे श्रीमती सोनिया गांधी यांनी सांगितले. या योजनेंतर्गत केवळ शस्त्रक्रियाच होणार नसून, रूग्णाचा औषधोपचार, भोजन आणि त्याला घरापर्यंत पोहोचविण्याचीही तरतूद असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रीमती सोनिया गांधी यांनी यावेळी केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि राज्यातील श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या कामाचे कौतूक केले. आयुष्यातील विविध जबाबदा-यांचे यशस्वीरित्या वहन करायचे असेल तर सुदृढ आरोग्याची गरज आहे. त्यामुळेच गावा-खेड्यात राहणा-या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यूपीए सरकार कटिबद्ध असून, सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यूपीएने नागरिकांना केवळ सुविधाच दिल्या नाहीत तर थेट कायदेशीर अधिकारच प्रदान केल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनांसारख्या अनेक योजनांची सुरूवात महाराष्ट्रात झाली आणि त्यांची उपयोगिता लक्षात घेऊन अशा योजना देशपातळीवरही राबविल्या गेल्या, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांचे हित समोर ठेवूनच योजना आणल्या आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती सोनिया गांधी यांनी या योजनेच्या कार्डांचे वितरण केले. श्रीमती गांधी यांच्यासह सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये बालकांचाही समावेश होता. श्रीमती सोनिया गांधी यांनी या चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस केली. योजनेचे कार्ड वितरण करतेवेळीही त्यांनी तिथे आलेल्या महिलांशी मनमोकळा संवाद साधला.
दरम्यान, जनसामान्यांच्या हिताच्या असंख्य योजना लागू केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी तर आभार प्रदर्शन आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान यांनी केले. याप्रसंगी संपूर्ण राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे सचिन सावंत,प्रवक्ता व प्रभारी, कम्युनिकेशन्स विभाग यांनी कळविले आहे.
गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३
भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
पिंपरी (20 नोव्हेंबर 2013) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत दुस-यांदा भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मान आयोजक महेश लांडगे यांना व भोसरीकरांना देण्यात आाला. या स्पर्धा भोसरीतील ज्येष्ठ पै. किसनराव शंकरराव लांडगे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिं.चिं. मनपा कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी 2013 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर नानासाहेब शितोळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी (19.11.2013) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने होत आहेत.
यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व आयोजक नगरसेवक महेश लांडगे, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पोपटअण्णा फुगे, रुस्तम-ए- हिंद पै. अमोल बुचडे, भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे, राष्ट्रीय खेळाडू शंकर कंधारे, उपमहाराष्ट्र केसरी विशालअप्पा कलाटे, नगरसेवक नितीन लांडगे, शांताराम बापू भालेकर, वस्ताद मारूतीदादा गव्हाणे, पै. मारुती कंद, वस्ताद रामचंद्र लांडगे, पै. तुळशीराम लोंढे, पै. चंद्रकांत लांडगे, पै. रंगा फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार दि. 1 डिसेंबर 2013 रोजी भोसरी येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर मा. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे, पिं.चिं.कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, माजी महापौर व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, माजी महापौर व पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, दत्ता साने, नितीन काळजे, चंद्रकांत वाळके, समीर मासुळकर, राहुल जाधव, धनंजय आल्हाट, महिंद्रा कंपनीचे एच.ओ.डी. विजय नायर, जालिंदर शिंदे, ॲड. नितीन लांडगे, संजय वाबळे, नगरसेविका सुरेखाताई गव्हाणे, सुनीताताई गवळी, शुभांगी लोंढे, डॉ. श्रद्धा लांडे, माजी नगरसेवक पंडीतशेठ गवळी, साहेबराव खरात, संतोष (अण्णा) लोंढे, अण्णासाहेब मगर बँकेचे नंदकुमार लांडे, माजी नगरसेविका सिमाताई फुगे, जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष संदीप (आप्पा) भोंडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम बुधवार दि. 4 डिसेंबर 2013 रोजी सायं. 7 वा. कृषीमंत्री मा. ना. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे सभापती दिलीप वळेस पाटील साहेब, गृहमंत्री मा.ना.आर.आर. पाटील साहेब माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर मा. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पिं.चि. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा भोसरी स.नं. 1 येथे 15 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या 60 हजार प्रेक्षक क्षमता असणा-या भव्य स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रथमच 15 फुट बाय 20 फुट आकाराचे 4 अत्याधुनिक एल.सी.डी. स्क्रीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धा पाहणे सुखकर होणार आहे. 25 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था स्टॅण्ड गॅलरी मध्ये व 35 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था मॅटवर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी 40 बाय 40 आकाराचे दोन मॅटचे आखाडे व एक 40 बाय 40 मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. आखाड्यात वापरण्यासाठी लाल माती खास कोल्हापूर वरून आणली असून गेल्या 10 दिवसांपासून तिची मशागत करण्यात येत आहे. या मातीत दही, लिंबू, तेल, हळद, कापूर टाकून तिची मशागत करण्यात येत आहे. या ठिकाणी 100 फुट बाय 60 फुट असे तीन टप्प्यातील भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
आखाड्याचे सुत्रसंचालक ज्येष्ठ कुस्ती तज्ज्ञ पुजारी तर व्यासपीठाचे सुत्र संचालन ज्येष्ठ सुत्र संचालक राणाप्रताप तिवारी हे करणार आहेत. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून 44 जिल्हा संघाचे गट सहभागी होणार आहेत. एकूण 7 वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये 55 किलो, 60 किलो, 74 किलो, 84 किलो, 96 किलो वजनी गटाचा समावेश आहे. या प्रत्येक वजनी गटातील विजेत्या मल्लांना गोल्डन, सिल्व्हर, ब्रॉन्झ पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 84 ते 120 किलो या वजनी गटात होणार असून विजेत्या मल्लाला चांदीची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व मल्लांना ट्रॅक सूट देण्यात येणार आहे.
शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी पैलवानांचे आगमन होणार असून त्याच वेळी स्पर्धकांचे वजन घेण्यात येईल. रविवारी दि. 1 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता सहभागी पैलवानांचे संचलन भोसरीत होणार आहे. यामध्ये भोसरीतील सर्व तालीम मंडळे, वस्ताद, भोसरी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, सर्व सार्वजनिक मंडळे सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास, भोजन, वाहनव्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे.
वाहन पार्किंगसाठी स्टेडियमच्या तिनही बाजूस 15 एकर जागेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस अधिकार-यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसरात 100 हून जास्त सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी स्टेडियम मध्ये येताना पाण्याची बाटली, कॅरीबॅग आणू नये असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी 100 खासगी बाऊन्सर, 100 सुरक्षा रक्षक, 500 स्वयंसेवक, पोलीसांना सुरक्षा व्यवस्थेसाठी मदत करणार आहेत. कुस्ती आराखड्याच्या कडेला 10 फुटांवर एक व 5 फुटांवर एक असे दोन रेलिंग लावण्यात येणार आहे.
आखाड्यात फक्त मल्ल, पंच आणि प्रशिक्षक यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पत्रकारांसाठी, वैद्कीय पथकांसाठी खेळाडूंच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी दोन पथके, रुग्णवाहीका अग्निशामक दलाचे दोन बंब असणार आहेत.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै.किसनराव लांडगे, पै. रामचंद्र लांडगे, पै. मारुती दादा गव्हाणे, पै. पोपटराव फुगे, पै. किसन शिंदे, पै. पितांबर शिंदे, पै.तुळशीराम लोंढे, पै.कचदेव लोंढे, पै. गुलाब फुगे, पै. चंद्रकांत लांडगे, पै. हिरामण लांडगे, पै.महादु लांडगे, पै.बाबा लांडगे, पै. लाला लांडगे, पै. मदन गव्हाणे, पै. गणपत गव्हाणे, पै. बाळासाहेब गव्हाणे, पै. भरत फुगे, पै. बाजीराव लांडगे आदी परीश्रम घेत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा मागील 25 वर्षामध्ये वेगाने औद्योगीक विकास झाला त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात भोसरीच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. शहराच्या या सर्वांगीण विकासात भोसरीकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसचे शहराच्या क्रीडा विकासात भोसरीचे नाव आदराने घेतले जाते. कुस्ती तसेच कबड्डीचे शेकडो खेळाडू भोसरीच्या तालमीत व मैदानात आतापर्यंत तयार होऊन त्यांनी भोसरीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे.
यामध्ये कुस्तीपटू कै. पै. नामदेव लांडगे, कै. पै. सोपानराव गुळवे, कै. पै.सदाशिव फुगे, कै. पै. विश्वनाथ पांडुरंग लांडगे यांचे नाव आदराने घ्यावे लागते. तसेच पै. चंद्रकांत लांडगे, पै. तुळशीराम लोंढे, पै. नारायण लांडगे, पै. विष्णुपंत लांडे, पै.कचदेव लोंढे, पै. वस्ताद रामचंद्र लांडगे, पै. मारुतीदादा गव्हाणे, पै. किसनराव लांडगे, पै. रंगनाथ फुगे, पै. किसन शिंदे, पै. पिलाजी शिंदे, पै. लक्ष्मण शिंदे, पै. हिरामण लांडगे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
या स्पर्धेचे आयोजन भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नगरसेवक महेश लांडगे यांच्या प्रेरणेतून या फाऊंडेशनची स्थापना 2002 मध्ये झाली. त्यानंतर फाऊंडेशनने खेळाडूंसाठी विविध उल्लेखनीय उपक्रम राबविले व स्पर्धांचे आयोजन केले आहे.
यात प्रामुख्याने 2009 साली ‘‘महाराष्ट्र श्री 2009’’ ही स्पर्धा भोसरीत घेण्यात आली. या स्पर्धेत 700 हून जास्त खेळाडूंचा सहभाग होता. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे खो-खो मध्ये वरीष्ठ महिला गट व कुमारी गट असे दोन संघ राज्यभर दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत. या संघामध्ये पूजा शेलार व लविना गायकवाड या राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वरिष्ठ महिला गटात 50 हून जास्त महिला खेळाडू रोज सरावाला उपस्थित असतात.महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या क्रीडा उपक्रमांतर्गत कराटे क्लब, मेडीटेशन हॉल, बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. याचा शेकडो खेळाडूंना लाभ होत आहे. 2007 सालापासून महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने चार ठिकाणी योग शिबिर सुरु आहेत.
रविवार, २५ ऑगस्ट, २०१३
कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले- अजित पवार
मुंबई, ता. 25 : जागतिक उद्योगविश्वात भारताची शान वाढविणारे द्रष्टे उद्योजक डॉ. नीळकंठराव कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. कल्याणी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. भारत फोर्ज कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करून देऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी ते दिशादर्शक होते. उद्योग संस्कृती रुजवण्याचे काम त्यांनी मोठ्या कल्पकतेने केले. त्याचवेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उद्योगांचा विस्तार केला. आपल्या समूहाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी त्यांनी संवादाचा सेतू साधला होता. कर्मचाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे प्रतीक होते. कर्मचाऱ्यांनाही कुटुंब प्रमुखासारखा त्यांचा आधार वाटायचा. कर्मचारी आणि त्यांच्यात केवळ औपचारिक संबंध नव्हते तर आपुलकीचे नाते होते. हेच त्यांचे बळ होते. त्याच जोरावर त्यांनी आपल्या उद्योग समूहाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचे विशेषत: महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
शनिवार, १ जून, २०१३
सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता
मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली.
नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले.
बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंजूरी दिली. या धोरणानुसार 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यासाठी संचालक मंडळाने मंजूरी दिली. त्याचप्रमाणे भाडेपट्टयने वितरित करण्यात आलेल्या भूखंडांवरील बांधकामांकरिता नवी मुंबई जमिन विल्हेवाट अधिनियमानुसार कालावधी देण्यात येतो त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली असून शासनाच्या आदेशानंतर या संदर्भात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
द्रोणागिरी सेक्टर-50 व 51 मध्ये 12.5 टक्केयोजनेअंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 17.84 कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी यावेळी मंजूरी देण्यात आली. 12.5 टक्के योजनेअंतर्गत द्रोणागिरी येथील सेक्टर-52 ते 55 येथे एकात्मिक भौतिक सुविधांच्या विकासासाठी रु. 36.23 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच द्रोणागिरी येथील सेक्टर-15 मधील रस्त्याचा विकास, पावसाळी पाण्याची गटारे, पाणी पुरवठा वाहिन्या व उर्वरित मलनि:सारण वाहिन्यांच्या विकासासाठी रु. 13.35 कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.
वाळूज महानगर प्रकल्पाच्या भविष्यातील विकासाकरिता तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
नेरुळ-बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे प्रकल्पातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता अंदाजित अर्थसंकल्पानुसार रु. 739.46 लाख खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंबंधातील निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. याचबरोबर नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरती परिक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याच्या योजनेसही या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
वाळूज महानगर प्रकल्पातील नगर-1, 2 व 4 मधील पायाभूत सुविधांसंदर्भातील उर्वरित विकासाकरिता रु. 667 कोटी खर्चासही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
रविवार, ३१ मार्च, २०१३
दमा असूनही दम-दार गाणारे विष्णुबुवा...
जे गरिब पर हित करे, ते रहीम बड लोग।
कहाँ सुदामा बापुरो, कृष्ण मिताई जोग।।
अर्थात- जे लोक गरीबांचे भले करतात, ते सर्वात मोठे. मोठे ते नाहीत, जे एखाद्या मोठ्या पदावर असतील...। इथे रहीमदासजींनी कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण देऊन सांगितलंय की सुदामा गरीब असूनही, कृष्णाने त्याच्याशी मैत्री केली होती..! सुदामा कृष्णाचा 'जिवलग मित्र' होता.
रहीम यांचा हा दोहा अचानक आठवला! निमित्त होतं, ते म्हणजे दारासमोर बसून मधुर आवाजात अभंग सादर करणार्या भिक्षेकर्याचं...! वयाची सत्तरी गाठलेला मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही दारोदार फिरून भिक्षा मागणारा हा भिक्षेकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळे अभंग, भजनं सादर करून मिळेल त्या पैशावर हा गृहस्थ कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालवतोय.
विष्णुबुवा असं यांचं नाव असून काही दिवसांपासून ते इंदूरमधल्या विशेषतः महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरून मराठी बांधवांकडून मिळतील ते पैसे, कपडे आदी वस्तूंद्वारे आपला उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरल्यामुळे मराठीत बोलता येतं आणि दोन पैसे जास्त मिळतात अशी विष्णुबुवांची भावना आहे. ते मूळचे महाराष्ट्रातल्या मलकापूरचे असून विदर्भासह मध्य प्रदेशातल्या भोपाळ, जबलपूर, हरदा, इंदूर आदी ठिकाणी जाऊन त्यांच्या मधुर आवाजामुळे नागरीक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्यांची वाहवा करतात, मात्र पैसे फार कमी लोक देतात अशी खंत विष्णुबुवा व्यक्त करतात. आपला आधार असलेला एकमेव मुलगा आणि सून काही वर्षांपूर्वीच वारले, यामुळे नातू पांडरुंग याला सोबत घेऊन गावोगावी फिरतो आणि मिळेल त्यात पोट भरतो. मधुनमधुन मध्यप्रदेशातल्या एखाद्या छोट्या गावात शासनातर्फे दोहे, भजनं गाण्याची संधी मिळते तेव्हा मात्र काही-हजार रुपये मिळतात आणि तेवढ्यापुरतं का होईनां, विष्णुबुवांना आनंद होतो. स्व. पं. भीमसेन जोशी यांचे अभंग, भजनं, कबीर, रहीम यांचे दोहे सादर करतात. अक्षरशः काठीचा आधार असलेली एकतारी सुद्धा जुनी झाली असल्याचं तिच्याकडे पाहिल्यावर सहज लक्षात येतं. विष्णुबुवांना सध्या दम्याचा त्रास होत असून गाणं म्हणताना काहीवेळा दम लागतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मधुर आणि दमदार आवाजात ते भजनं सादर करतात. दम्याचा त्रास होऊ नये म्हणून जवळ बाळगलेला स्प्रे सुद्धा लवकरच संपणार असून, त्यासाठी पैसे कसे जमतील याची चिंता त्यांना सध्या सतावते आहे. तरुणाईला सुद्धा लाजवेल इतका खणखणीत त्यांचा आवाज आहे, हे मात्र खरंय...
शनिवार, १६ मार्च, २०१३
संवेदनशील मतदान केंद्रांबाबत सतर्कता बाळगावी- राज्य निवडणूक आयुक्त
पुणे, दि. 16 : ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार
पाडण्याच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलिस आणि संबंधित
अधिकाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला
सत्यनारायण यांनी आज येथे दिल्या.
पुणे
जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 63 रिक्त जागांच्या
होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी 29 मार्च 2013 रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात
श्रीमती सत्यनारायण यांनी आज येथे आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी विकास देशमुख व
अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आदींसह अन्य संबंधित अधिकारी यावेळी
उपस्थित होते.
मतदान यंत्रे, मार्कर पेन व इतर मतदानाच्या साहित्याबाबत आढावा घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक असलेल्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संबंधितांना निवडणुकांची माहिती द्यावी. तसेच पेडन्यूजबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त केल्या असून त्यासंदर्भातील तक्रारी या समित्यांकडे दाखल कराव्यात.
शुक्रवार, ८ मार्च, २०१३
जागतिक महिला दिन संदेश, शुभेच्छा
English madhe LADY, Marathit MAHILA, Hindi madhe NARI...
Yanchi saath nasel tar, aahe baatch Adhuri...
Theva lakshat ek goshta, ek na ek divas padel hi
Sampurna Duniyela BHARI...!!!
Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechha.
इंग्रजी मध्ये लेडी, मराठीत महिला, हिंदी मध्ये नारी...
यांची साथ नसेल तर, आहे बातच अधुरी...
ठेवा लक्षात एक गोष्ट, एक ना एक दिवस पडेल ही
संपूर्ण दुनियेला भारी...!!!
जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.
Yanchi saath nasel tar, aahe baatch Adhuri...
Theva lakshat ek goshta, ek na ek divas padel hi
Sampurna Duniyela BHARI...!!!
Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechha.
इंग्रजी मध्ये लेडी, मराठीत महिला, हिंदी मध्ये नारी...
यांची साथ नसेल तर, आहे बातच अधुरी...
ठेवा लक्षात एक गोष्ट, एक ना एक दिवस पडेल ही
संपूर्ण दुनियेला भारी...!!!
जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.
रविवार, ३ मार्च, २०१३
अकोला येथे काँग्रेस मेळावा उत्साहात
अकोला, दि. 2 मार्च: आजवर केवळ काँग्रेसनेच जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मीलची जागा देण्याचा निर्णय असो वा देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेस पक्षानेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य काँग्रेस भविष्यातही अशाच प्रकारे पूर्ण करीत राहील, असे मोहन प्रकाशजी यांनी म्हटले आहे.
अकोला येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात आयोजित अमरावती विभागीय काँग्रेस मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनिस अहमद, अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री. माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी फोडाफाडीचे राजकारण करीत आहे. देशातील विविध समाज आणि घटकांमध्ये व्देष निर्माण करण्याचे राजकारण त्यांनी चालवले आहे. केवळ काँग्रेस पक्षानेच नेहमी देशाचा आणि सर्वसामान्यांचा विचार केला असून, जनताही सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे आ. माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाने अकोला परिसर व अमरावती विभागात केलेल्या विविध कामांची उदाहरणे देत सरकार नेहमी या विभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अकोला विमानतळाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, इतर प्रलंबित समस्यांवर विचार सुरू आहे. अमरावती विभाग व अकोला परिसरात गारपीटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितले.
या मेळाव्याला अमरावती विभागातील काँग्रेसचे आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शुक्रवार, १ मार्च, २०१३
राहुल गांधी यांची मुंबई भेट...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.
सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले.
त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी प्रतिमेवर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत राहुलजी गांधी यांनी स्व. वसंतदादा पाटील यांनी राजकारण, सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ते सचिन सावंत यांनी कळविले आहे.
नवी मुंबई मेट्रो – आता वाटचाल 21 व्या शतकाच्याही पुढे
स्वयंपूर्ण नवी मुंबईतील भविष्याची गती सांभाळणारा तर्कसंगत आणि सुयोग्य प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो. परिवहनाच्या बृहद आराखड्यावर आधारीत बहुपर्यायी दळणवळण व्यवस्थांना पूर्णत्व देणे हाच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा उद्देश.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशन आणि ली असोसिएट्स साऊथ एशिया यांच्या सूचनाबरहूकुम नवी मुंबईत पाच मार्गांचे जाळे विणले जाणार आहे. पूर्णत: उन्नत मार्गिकेवरून धावणारी ही मेट्रो पहिल्या टप्प्यात 11 कि.मी. अंतराच्या बेलापूर ते पेंधर क्षेत्रातील परिवहनाला नवे परिमाण देईल यात शंका नाही.
रेल्वेने निर्धारित केलेल्या बांधकाम दर्जाच्या परिमाणांची काटेकोर पूर्णता जागे अभावी, जागेच्या पूर्व-नियोजित वापरामुळे अथवा आरक्षणामुळे होऊ न शकल्याने नवी मुंबईतील काही नोडस् रेल्वे मार्गापासून वंचित राहिले. जनतेला सर्व सुविधा पुरविण्याचा वसा घेतलेल्या, नागरिकांच्या समस्यांची, मागण्यांची प्राथम्याने दखल घेणाऱ्या सिडको प्रशासनानं त्यावर काढलेला तोडगा म्हणजे नवी मुंबई मेट्रो.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शक्यतेबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून प्राप्त होताच सिडकोने व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पास गती देण्यास प्रारंभ केला. सिडकोच्या बांधकाम दर्जास साजेसा आणि प्रकल्प परंपरेत बसेल असा हा प्रकल्प व्हावा, नागरिकांच्या गरजांची पूर्तता योग्यरित्या व्हावी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा सिडको अधिकाऱ्यांनी अभ्यास केला.
प्रकल्पाच्या जडणघडणीचे टप्पे निश्चित करणे, कालावधी ठरविणे, दर्जाची सुनिश्चिती करणे आणि संभाव्य खर्चाचा अंदाज घेणे, ह्यासाठी सिडकोने या क्षेत्रातील अग्रगण्य अशा लुईस बर्गर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीची विशेष सल्लागार म्हणून पारदर्शक आणि स्पर्धात्मक लिलाव पद्धतीने नेमणूक केली. दरम्यान प्रकल्पाच्या देखरेखीसाठी सिडकोच्या तांत्रिक गटाची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनानं 10 सप्टेंबर 2010 रोजी, भारतीय ट्रॅम कायदा, 1886 अन्वये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासन आणि अंमलबजावणीसाठी सिडकोला अधिकार दिले. मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा पायाभरणी समारंभ 1 मे 2011 रोजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचे आवाहन सिडकोला केले. प्रकल्पाचा नियोजित कालावधी पाच वर्षांचा असला तरी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा श्री. सत्रे यांनी निर्धार व्यक्त केला असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे.
ज्या दोन स्तंभांवर मेट्रो मार्गाचा व्हायडक्ट आधारलेला असतो ते पायर्स उभारणे हा या प्रकल्पाचा सर्वाधिक महत्वाचा टप्पा आहे. मेट्रोचा संपूर्ण डोलाराच यावर आधारलेला असल्याने त्याचा पाया भक्कम असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून यास अधिक काळ लागतो. शिवाय या कामाचे सर्व सामान रस्त्यावर पसरलेले असल्याने त्यास जागाही खुप लागते आणि रहदारीची गैरसोयही होते. म्हणून या कामी दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजवर या दोन्ही कंपन्यांनी 86 पायर्स उभारले आहेत. व्हायाडक्ट सोबतच स्थानकांची बांधणी, मेट्रो रेल्वेच्या कामांची यंत्र-सामुग्री ठेवण्यासाठी आगारांचा विकास तसेच विद्युत व्यवस्था, सिग्नल यंत्रणा यांची कामेही विविध टप्प्यांवर सुरु आहेत.
दरम्यान नवी मुंबईच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता सिडकोने काही महत्वाचे बदल या प्रकल्पात केले आहेत. डब्यांची रुंदी 2.9 मिटरवरून 3.2 मिटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने याला मान्यता दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात सुचविलेल्या 75 व्होल्ट एकदिश विद्युत प्रवाहाऐवजी (DC) कमी संख्येच्या ट्रॅक्शन सबस्टेशनचा, कमी जागा लागणारा 25,000 व्होल्ट एकांतरीत विद्युत प्रवाहाचा (AC) वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या दूरसंपर्क प्रणालिसाठी ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅक सर्किट (ए.एफ.टी.वी.) आणि सिग्नल यंत्रणेसाठी रंगीत प्रकाश प्रणाली निश्चित करण्यात आली होती, यात सुधारणा करून दूरसंपर्कावर आधारित सर्वोत्कृष्ट रेल्वे नियंत्रण प्रणाली (सीबीटीसी) हा पर्याय निवडण्यात आला आहे. एएफटीसी प्रणालित तांब्याचा वापर असल्याने हवामानातील काही घटकांचा त्यावर विपरित परिणाम संभवतो ज्यामुळे यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तांब्याच्या चोरींची शक्यताही असते. म्हणून हा बदल अत्यंत मूलगामी स्वरुपाचा आहे.
सीबीटीसी यंत्रणेत माहिती प्रक्षेपण अधिक खात्रीलायक होते. तसेच यात केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून होणारे संदेशवहन दोन्ही बाजुंनी शक्य होते. रेल्वे गाडीचे अचूक स्थलनिर्देशन शक्य होते. तसेच उर्जा संवर्धनही होते. परिणामी धावपट्टीवरील दोन गाड्यांमधील अंतर 90 सेकंदापर्यंत कमी करून प्रणालीची क्षमता 65,000 पीएचपीडीटी इतकी वाढते. मेट्रोच्या सर्व स्थानकांवर स्वयंचलित प्रवासशुल्क यंत्रणा स्थापन्यात येणार आहे. या संगणकीकृत यंत्रणेत स्वयंचलित प्रवेशद्वार असतील. तिकिटांएवजी स्मार्ट टोकन्स आणि स्मार्ट कार्डसचा वापर करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पात दर्जा तसेच सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मेट्रो प्रणालीच्या अंतिम निविदा प्रक्रियेत यासाठी स्वतंत्र गुणवत्ता लेखापरीक्षक आणि स्वतंत्र सुरक्षा निर्धारक यांची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे व दोघेही महामंडळाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास कटीबद्ध असतील.
प्रकल्पाविषयीच्या अपेक्षा वाढल्यामुळे भागधारकांना प्रकल्पाच्या विविध गतिविधीविषयी आवश्यक आणि योग्य माहिती देणे अत्यावश्यक झाले होते व ते परिणामकारकरित्या साधता यावे म्हणून मेट्रो प्रकल्पास वाहिलेले एक स्वतंत्र संकेतस्थळ निर्मिण्यात आले. www.navimumbaimetrorail.com या संकेतस्थळावर सामान्य जनतेला या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. निविदा प्रक्रियेत वास्तुरचना क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आलेला सहभाग व परिपूर्ण तयारी यामुळेच हे साध्य करण्यात यश आले आहे.
मेट्रो प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी एकूण 6 वेगवेगळे पर्याय असलेल्या सर्वकष प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला व प्रत्येक पर्यायाचे फायदे–तोटे लक्षात घेऊन सिडको महामंडळाचा भागभांडवळात 26% सहभाग असलेला पर्याय अंतिम करण्यात आला. याचा प्रारंभीचा कार्यकाल 10 वर्षाचा असून त्याचा खर्च रू. 550 करोड इतका आहे. चालक संस्थेची निवड करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
महामंडळाच्या धोरणानुसार प्रकल्पाच्या आरंभापासून दर पंधरवड्यानी या प्रकल्पाचा आढावा अतिशय बारकाईने घेतला जातो त्यावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक स्वत: जातीने लक्ष ठेवून असतात तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते आजपर्यंत प्रकल्पपुर्तीच्या एकूण कारभाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या कमीत कमी 60 बैठका तसेच प्रकल्प स्थळाला विविध राज्यस्तरीय मान्यवरांकडून दिल्या जाणाऱ्या नियमित भेटीच्या आधारे प्रकल्पाचा मध्यावधी आढावा घेण्याची आवश्यकता नाही, असे जर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
(शब्दांकन- डॉ. मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको)
दिल्ली मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशन आणि ली असोसिएट्स साऊथ एशिया यांच्या सूचनाबरहूकुम नवी मुंबईत पाच मार्गांचे जाळे विणले जाणार आहे. पूर्णत: उन्नत मार्गिकेवरून धावणारी ही मेट्रो पहिल्या टप्प्यात 11 कि.मी. अंतराच्या बेलापूर ते पेंधर क्षेत्रातील परिवहनाला नवे परिमाण देईल यात शंका नाही.
रेल्वेने निर्धारित केलेल्या बांधकाम दर्जाच्या परिमाणांची काटेकोर पूर्णता जागे अभावी, जागेच्या पूर्व-नियोजित वापरामुळे अथवा आरक्षणामुळे होऊ न शकल्याने नवी मुंबईतील काही नोडस् रेल्वे मार्गापासून वंचित राहिले. जनतेला सर्व सुविधा पुरविण्याचा वसा घेतलेल्या, नागरिकांच्या समस्यांची, मागण्यांची प्राथम्याने दखल घेणाऱ्या सिडको प्रशासनानं त्यावर काढलेला तोडगा म्हणजे नवी मुंबई मेट्रो.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शक्यतेबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून प्राप्त होताच सिडकोने व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पास गती देण्यास प्रारंभ केला. सिडकोच्या बांधकाम दर्जास साजेसा आणि प्रकल्प परंपरेत बसेल असा हा प्रकल्प व्हावा, नागरिकांच्या गरजांची पूर्तता योग्यरित्या व्हावी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा सिडको अधिकाऱ्यांनी अभ्यास केला.
प्रकल्पाच्या जडणघडणीचे टप्पे निश्चित करणे, कालावधी ठरविणे, दर्जाची सुनिश्चिती करणे आणि संभाव्य खर्चाचा अंदाज घेणे, ह्यासाठी सिडकोने या क्षेत्रातील अग्रगण्य अशा लुईस बर्गर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीची विशेष सल्लागार म्हणून पारदर्शक आणि स्पर्धात्मक लिलाव पद्धतीने नेमणूक केली. दरम्यान प्रकल्पाच्या देखरेखीसाठी सिडकोच्या तांत्रिक गटाची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनानं 10 सप्टेंबर 2010 रोजी, भारतीय ट्रॅम कायदा, 1886 अन्वये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासन आणि अंमलबजावणीसाठी सिडकोला अधिकार दिले. मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा पायाभरणी समारंभ 1 मे 2011 रोजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचे आवाहन सिडकोला केले. प्रकल्पाचा नियोजित कालावधी पाच वर्षांचा असला तरी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा श्री. सत्रे यांनी निर्धार व्यक्त केला असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे.
ज्या दोन स्तंभांवर मेट्रो मार्गाचा व्हायडक्ट आधारलेला असतो ते पायर्स उभारणे हा या प्रकल्पाचा सर्वाधिक महत्वाचा टप्पा आहे. मेट्रोचा संपूर्ण डोलाराच यावर आधारलेला असल्याने त्याचा पाया भक्कम असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून यास अधिक काळ लागतो. शिवाय या कामाचे सर्व सामान रस्त्यावर पसरलेले असल्याने त्यास जागाही खुप लागते आणि रहदारीची गैरसोयही होते. म्हणून या कामी दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजवर या दोन्ही कंपन्यांनी 86 पायर्स उभारले आहेत. व्हायाडक्ट सोबतच स्थानकांची बांधणी, मेट्रो रेल्वेच्या कामांची यंत्र-सामुग्री ठेवण्यासाठी आगारांचा विकास तसेच विद्युत व्यवस्था, सिग्नल यंत्रणा यांची कामेही विविध टप्प्यांवर सुरु आहेत.
दरम्यान नवी मुंबईच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता सिडकोने काही महत्वाचे बदल या प्रकल्पात केले आहेत. डब्यांची रुंदी 2.9 मिटरवरून 3.2 मिटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने याला मान्यता दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात सुचविलेल्या 75 व्होल्ट एकदिश विद्युत प्रवाहाऐवजी (DC) कमी संख्येच्या ट्रॅक्शन सबस्टेशनचा, कमी जागा लागणारा 25,000 व्होल्ट एकांतरीत विद्युत प्रवाहाचा (AC) वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या दूरसंपर्क प्रणालिसाठी ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅक सर्किट (ए.एफ.टी.वी.) आणि सिग्नल यंत्रणेसाठी रंगीत प्रकाश प्रणाली निश्चित करण्यात आली होती, यात सुधारणा करून दूरसंपर्कावर आधारित सर्वोत्कृष्ट रेल्वे नियंत्रण प्रणाली (सीबीटीसी) हा पर्याय निवडण्यात आला आहे. एएफटीसी प्रणालित तांब्याचा वापर असल्याने हवामानातील काही घटकांचा त्यावर विपरित परिणाम संभवतो ज्यामुळे यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तांब्याच्या चोरींची शक्यताही असते. म्हणून हा बदल अत्यंत मूलगामी स्वरुपाचा आहे.
सीबीटीसी यंत्रणेत माहिती प्रक्षेपण अधिक खात्रीलायक होते. तसेच यात केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून होणारे संदेशवहन दोन्ही बाजुंनी शक्य होते. रेल्वे गाडीचे अचूक स्थलनिर्देशन शक्य होते. तसेच उर्जा संवर्धनही होते. परिणामी धावपट्टीवरील दोन गाड्यांमधील अंतर 90 सेकंदापर्यंत कमी करून प्रणालीची क्षमता 65,000 पीएचपीडीटी इतकी वाढते. मेट्रोच्या सर्व स्थानकांवर स्वयंचलित प्रवासशुल्क यंत्रणा स्थापन्यात येणार आहे. या संगणकीकृत यंत्रणेत स्वयंचलित प्रवेशद्वार असतील. तिकिटांएवजी स्मार्ट टोकन्स आणि स्मार्ट कार्डसचा वापर करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पात दर्जा तसेच सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मेट्रो प्रणालीच्या अंतिम निविदा प्रक्रियेत यासाठी स्वतंत्र गुणवत्ता लेखापरीक्षक आणि स्वतंत्र सुरक्षा निर्धारक यांची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे व दोघेही महामंडळाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास कटीबद्ध असतील.
प्रकल्पाविषयीच्या अपेक्षा वाढल्यामुळे भागधारकांना प्रकल्पाच्या विविध गतिविधीविषयी आवश्यक आणि योग्य माहिती देणे अत्यावश्यक झाले होते व ते परिणामकारकरित्या साधता यावे म्हणून मेट्रो प्रकल्पास वाहिलेले एक स्वतंत्र संकेतस्थळ निर्मिण्यात आले. www.navimumbaimetrorail.com या संकेतस्थळावर सामान्य जनतेला या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. निविदा प्रक्रियेत वास्तुरचना क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आलेला सहभाग व परिपूर्ण तयारी यामुळेच हे साध्य करण्यात यश आले आहे.
मेट्रो प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी एकूण 6 वेगवेगळे पर्याय असलेल्या सर्वकष प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला व प्रत्येक पर्यायाचे फायदे–तोटे लक्षात घेऊन सिडको महामंडळाचा भागभांडवळात 26% सहभाग असलेला पर्याय अंतिम करण्यात आला. याचा प्रारंभीचा कार्यकाल 10 वर्षाचा असून त्याचा खर्च रू. 550 करोड इतका आहे. चालक संस्थेची निवड करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
महामंडळाच्या धोरणानुसार प्रकल्पाच्या आरंभापासून दर पंधरवड्यानी या प्रकल्पाचा आढावा अतिशय बारकाईने घेतला जातो त्यावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक स्वत: जातीने लक्ष ठेवून असतात तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते आजपर्यंत प्रकल्पपुर्तीच्या एकूण कारभाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या कमीत कमी 60 बैठका तसेच प्रकल्प स्थळाला विविध राज्यस्तरीय मान्यवरांकडून दिल्या जाणाऱ्या नियमित भेटीच्या आधारे प्रकल्पाचा मध्यावधी आढावा घेण्याची आवश्यकता नाही, असे जर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
(शब्दांकन- डॉ. मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...


