मुख्य सामग्रीवर वगळा

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी

नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे. नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील याप्रसंगी उपस्थित होते. आजवर ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू होती. या योजनेचे सामान्यांना मिळालेले लाभ लक्षात घेता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आघाडी सरकारने घेतला आहे. या योजनेचे लोकार्पण केल्यानंतर यूपीए अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी भाषणासाठी उभ्या झाल्या तेव्हा लाखोंच्या जनसमुदायाने “सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी आगे बढो”चा एकच जयघोष केला. सभास्थळावर आल्यानंतर त्यांनी या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या 78 रूग्णांशी थेट संवाद साधला. सदर रूग्णांशी झालेली चर्चा गहिवरून आणणारी होती, असे श्रीमती गांधी म्हणाल्या. दुर्दैवाने एखादा गंभीर आजार जडला तर अनेकांना परिस्थितीअभावी उपचार घेणे शक्य होत नसे. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन यूपीए सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू केल्याचे श्रीमती सोनिया गांधी यांनी सांगितले. या योजनेंतर्गत केवळ शस्त्रक्रियाच होणार नसून, रूग्णाचा औषधोपचार, भोजन आणि त्याला घरापर्यंत पोहोचविण्याचीही तरतूद असल्याचे त्या म्हणाल्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी यावेळी केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि राज्यातील श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या कामाचे कौतूक केले. आयुष्यातील विविध जबाबदा-यांचे यशस्वीरित्या वहन करायचे असेल तर सुदृढ आरोग्याची गरज आहे. त्यामुळेच गावा-खेड्यात राहणा-या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यूपीए सरकार कटिबद्ध असून, सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यूपीएने नागरिकांना केवळ सुविधाच दिल्या नाहीत तर थेट कायदेशीर अधिकारच प्रदान केल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनांसारख्या अनेक योजनांची सुरूवात महाराष्ट्रात झाली आणि त्यांची उपयोगिता लक्षात घेऊन अशा योजना देशपातळीवरही राबविल्या गेल्या, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांचे हित समोर ठेवूनच योजना आणल्या आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती सोनिया गांधी यांनी या योजनेच्या कार्डांचे वितरण केले. श्रीमती गांधी यांच्यासह सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये बालकांचाही समावेश होता. श्रीमती सोनिया गांधी यांनी या चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस केली. योजनेचे कार्ड वितरण करतेवेळीही त्यांनी तिथे आलेल्या महिलांशी मनमोकळा संवाद साधला. दरम्यान, जनसामान्यांच्या हिताच्या असंख्य योजना लागू केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी तर आभार प्रदर्शन आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान यांनी केले. याप्रसंगी संपूर्ण राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे सचिन सावंत,प्रवक्ता व प्रभारी, कम्युनिकेशन्स विभाग यांनी कळविले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा - छगन भुजबळ

मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले. हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्य...