मुख्य सामग्रीवर वगळा

दमा असूनही दम-दार गाणारे विष्णुबुवा...




जे गरिब पर हित करे, ते रहीम बड लोग।
कहाँ सुदामा बापुरो, कृष्ण मिताई जोग।।

अर्थात- जे लोक गरीबांचे भले करतात, ते सर्वात मोठे. मोठे ते नाहीत, जे एखाद्या मोठ्या पदावर असतील...। इथे रहीमदासजींनी कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण देऊन सांगितलंय की सुदामा गरीब असूनही, कृष्णाने त्याच्याशी मैत्री केली होती..! सुदामा कृष्णाचा 'जिवलग मित्र' होता.

रहीम यांचा हा दोहा अचानक आठवला! निमित्त होतं, ते म्हणजे दारासमोर बसून मधुर आवाजात अभंग सादर करणार्‍या भिक्षेकर्‍याचं...! वयाची सत्तरी गाठलेला मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही दारोदार फिरून भिक्षा मागणारा हा भिक्षेकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळे अभंग, भजनं सादर करून मिळेल त्या पैशावर हा गृहस्थ कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालवतोय.


विष्णुबुवा असं यांचं नाव असून काही दिवसांपासून ते इंदूरमधल्या विशेषतः महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरून मराठी बांधवांकडून मिळतील ते पैसे, कपडे आदी वस्तूंद्वारे आपला उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरल्यामुळे मराठीत बोलता येतं आणि दोन पैसे जास्त मिळतात अशी विष्णुबुवांची भावना आहे. ते मूळचे महाराष्ट्रातल्या मलकापूरचे असून विदर्भासह मध्य प्रदेशातल्या भोपाळ, जबलपूर, हरदा, इंदूर आदी ठिकाणी जाऊन त्यांच्या मधुर आवाजामुळे नागरीक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्यांची वाहवा करतात, मात्र पैसे फार कमी लोक देतात अशी खंत विष्णुबुवा व्यक्त करतात. आपला आधार असलेला एकमेव मुलगा आणि सून काही वर्षांपूर्वीच वारले, यामुळे नातू पांडरुंग याला सोबत घेऊन गावोगावी फिरतो आणि मिळेल त्यात पोट भरतो. मधुनमधुन मध्यप्रदेशातल्या एखाद्या छोट्या गावात शासनातर्फे दोहे, भजनं गाण्याची संधी मिळते तेव्हा मात्र काही-हजार रुपये मिळतात आणि तेवढ्यापुरतं का होईनां, विष्णुबुवांना आनंद होतो. स्व. पं. भीमसेन जोशी यांचे अभंग, भजनं, कबीर, रहीम यांचे दोहे सादर करतात. अक्षरशः काठीचा आधार असलेली एकतारी सुद्धा जुनी झाली असल्याचं तिच्याकडे पाहिल्यावर सहज लक्षात येतं. विष्णुबुवांना सध्या दम्याचा त्रास होत असून गाणं म्हणताना काहीवेळा दम लागतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मधुर आणि दमदार आवाजात ते भजनं सादर करतात. दम्याचा त्रास होऊ नये म्हणून जवळ बाळगलेला स्प्रे सुद्धा लवकरच संपणार असून, त्यासाठी पैसे कसे जमतील याची चिंता त्यांना सध्या सतावते आहे. तरुणाईला सुद्धा लाजवेल इतका खणखणीत त्यांचा आवाज आहे, हे मात्र खरंय...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012