शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धा- जळगाव, परभणी विद्यापीठांचे संघ स्पर्धेबाहेर
कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल पुरूष गटाच्या स्पर्धेमध्ये आज बाद फेरीच्या सामन्यांत गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (अजमेर), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ (सूरत), पॅसिफिक विद्यापीठ (उदयपूर) आणि मोहनलाल सुकादिया विद्यापीठ (उदयपूर) यांच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या जळगाव आणि परभणीच्या संघांनी चुरशीची लढत देऊनही पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर पडावे लागले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), महारामा प्रताप विद्यापीठ (उदयपूर) आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ (नाडियाद) या संघांनी उपस्थिती न दर्शविल्यामुळे अनुक्रमे चारोतार विद्यापीठ (चुंग, जि. आणंद), जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ (उदयपूर) आणि सरदार पटेल विद्यापीठ (वल्लभ वैद्यनगर) यांना पुढे चाल देण्यात आली.
अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २५-१९, २५-१९, १२-२५, १६-२५, १५-१० असा ३-२ ने पराभव केला. जळगावच्या संघाने अत्यंत चिवट झुंज दिली.
राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३-२५, १४-२५, २५-१४, २५-१७, १५-१२ असा ३-२ ने पराभव केला. पिछाडीवरून जोरदार मुसंडी घेत राजस्थान विद्यापीठाने सामन्यावर वर्चस्व मिळवले आणि अखेरचे तीन सेट सलग जिंकत सामना जिंकला
.
सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या संघाने बिकानेरच्या महाराजा गंगासिंह विद्यापीठाचा २५-१८, २५-१०, २५-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उदयपूरच्या पॅसिफिक विद्यापीठाने गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन संघाचा २५-८, २५-१६, २५-१२ असा सहज पराभव केला तर उदयपूरच्याच मोहनलाल सुकादिया विद्यापीठानेही जयपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठाचा २५-१५, २५-२०, २५-१६ असा पराभव केला.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन
कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: राष्ट्रीय व राज्य स्तरावर क्रीडा संघटनांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी युवा खेळाडूंकडूनही सहकार्य आणि प्रयत्नांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू संजय नाईक यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धेचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन.जे. पवार अध्यक्षस्थानी; तर प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. एस.एस. हुंसवाडकर, शांताराम माळी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सूर्यवंशी, रेफ्री मंडळाचे समन्वयक डॉ. सुनील चव्हाण, पी.एस. पंत आणि अतुल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे प्रादेशिक सचिव असलेले श्री. संजय नाईक म्हणाले, खेळामध्ये राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती शिरल्यामुळे मूळ खेळ आणि खेळाडू या दोहोंवर त्याचा विपरित परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन व्हॉलीबॉल संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंची निवड पारदर्शकपणे करण्यावर भर दिला असून १४ ते २१ वयोगटातील संघनिवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. वरिष्ठ वयोगटातील निवडही त्याच धर्तीवर करण्यात येईल. क्रीडापटूंना विशेषतः व्हॉलीबॉल खेळाडूंना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याबाबतही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सन १९८३-८४मध्ये अमरावती विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघामधून शिवाजी विद्यापीठात खेळाडू म्हणून आल्याच्या आठवणीलाही श्री. नाईक यांनी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांनी निकोप स्पर्धेचा आनंद लुटावा आणि कोल्हापुरातून परत जात असताना चांगल्या आठवणींचा ठेवा आपल्यासोबत न्यावा, असे आवाहन केले. सुवर्णमहोत्सवी शिवाजी विद्यापीठात अनेक चांगले विभाग, संग्रहालये आहेत; परिसरात उत्तम जैवविविधता आहे, त्यांची पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संजय नाईक यांच्या हस्ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या ध्वज तर कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. यजमान शिवाजी विद्यापीठ संघाचा कप्तान दिग्विजय साळुंखे याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
यावेळी कुलसचिव डॉ. डीव्ही. मुळे यांनी स्वागत केले. क्रीडा विभागप्रमुख पी.टी. गायकवाड यांनी आभार मानले. सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४
Anand Mahindra accepts Sustainable Development Leadership Award
February 06, 2014, New Delhi: Mr. Anand Mahindra, Chairman of the USD 16.7 billion Mahindra Group, today received the Sustainable Development Leadership Award from The Energy and Resources Institute (TERI). Mr. Mahindra accepted the award from External Affairs Minister, Mr. Salman Khurshid on behalf of the Mahindra Group, at a special ceremony held in the National Capital.
Mr. Mahindra was presented with the award in recognition of the dynamic and visionary leadership he has shown in spearheading the Mahindra Group on the path of sustainability and environmental awareness.
“With its dynamic and visionary approach, TERI has greatly contributed to the global dialogue on finding solutions to global problems in the fields of energy, environment and sustainable development and I am honoured to accept this award from them on behalf of the Mahindra Group,” said Mr. Anand Mahindra, Chairman, Mahindra Group.
Instituted by TERI in 2005, the Sustainable Development Leadership Award felicitates global leaders for their contributions to the field of sustainable development. The Award is presented at the Delhi Sustainable Development Summit as TERI’s tribute to eminent individuals engaged in encouraging global initiatives that can lead the world towards a sustainable future.
Past recipients of the award include Mr. Yukio Hatoyama, Prime Minister of Japan, Dr. Manmohan Singh, Prime Minister of India, Mr Ban Ki-moon, Secretary-General of the United Nations, Mr Arnold Schwarzenegger, Governor of California, Mr. Shoichiro Toyoda, Honorary Chairman of Toyota Motor Corporation, amongst others.
The annual Delhi Sustainable Development Summit (DSDS) is a major event focusing on sustainable development, the pursuit of the Millennium Development Goals (MDGs) and assessment of worldwide progress in these critical areas. DSDS attracts the most prominent thinkers and practitioners in a range of fields that impinge on development. Since development worldwide is moving towards an architecture based on partnerships, the leaders who participate in DSDS come from government, business and industry, multilateral and bilateral organizations, research and academia and civil society.
In keeping with its focus on harnessing the technological advancements in green technology and deploy the same towards betterment of the overall automotive eco-system, Mahindra has its green product portfolio on display at the Auto Expo currently underway in Greater Noida. Mr. Mahindra also unveiled the Mahindra Formula-E Car, which will participate in the FIA sponsored Formula-E Championship starting in September 2014. The Mahindra Group, besides being the only Indian team to participate in the Formula-E, hopes to integrate its advanced operations and expertise in electronics, IT, automotive technologies and manufacturing into the global electric vehicle growth story.
The Formula-E is a new FIA Championship featuring Formula Cars powered solely by electricity. It is expected to serve as a critical platform for research and development into future sustainable electric vehicles.
Ads powered by TrulyShare
गुरुवार, ३० जानेवारी, २०१४
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी
विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले.
अर्हता विनंती निविदेच्या दस्ताऐवजास केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून आता या संदर्भातील निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी जागतिक निविदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस 90 दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून त्यानुसार प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र संस्थांची यादी जाहीर करण्यात येईल. तद्नंतर स्वारस्य अभिव्यक्ती निविदा मागविण्यात येतील. या प्रक्रियेअंती नवी मुंबई विमानतळाच्या विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदार निवडला जाईल. ज्यांच्यामार्फत विमानतळ विकासाचे कार्य सुरू करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेस 9-10 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. सार्वजनिक खाजगी भागीदाराच्या निवडीनंतर लवकरच विकास कामास सुरूवात करण्यात येईल.
विमानतळाकरिता आवश्यक जमीनीच्या भूसंपादनसंदर्भातील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व भूधारकांची सहमती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. हिंदुराव यांनी सांगितले. मूळ विमानतळ प्रकल्पाकरिता 1160 हेक्टर जमीनीची आवश्यकता असून त्यापैकी 292 हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. विमानतळ आणि संलग्न विकास क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 2268 हेक्टर असून त्यापैकी 75 टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. उर्वरीत 25 टक्के जमीनीचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. या जमीनीचे संपादन भूधारकांच्या सहमतीनेच करण्यात येणार आहे.
विमानतळ क्षेत्रातील जमीन विकासासंदर्भातील 50 टक्के कामे प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्यात येणार असून सद्यस्थितीत पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या पुष्पक नगरीतील जमीन विकासासाठी 300 कोटी रूपये किंमतीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विमानतळाकरिता संपादित केलेल्या जमीनीच्या बदल्यात पुष्पक नगर येथे 22.5 टक्के जमीन देण्यात येणार आहे. राहत्या घरांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी वडघर आणि वहाळ येथील क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे अशीही माहिती श्री. हिंदुराव यांनी दिली.
सोमवार, २७ जानेवारी, २०१४
प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल 2 नवे चिटणीस व 8 जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्त्या
मुंबई, दि. 27 जानेवारी 2014: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी संघटनेमध्ये अनेक फेरबदल केले आहेत.
नव्या फेरबदलांमध्ये नागपूरचे श्री जयप्रकाश गुप्ता आणि जळगावचे श्री सलिम पटेल यांची प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील 8 जिल्हा काँग्रेस कमिटींचे नवे अध्यक्ष नेमले आहेत. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री विकास ठाकरे, चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश देवतळे, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.श्री अर्जून भंगाळे, जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अॅड. श्री संदीप पाटील, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती आश्विनी बोरस्ते, अकोला जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री हिदायत पटेल, सांगली जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री मोहनराव कदम तर बीड जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री सर्जेराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील आणखी काही जिल्हाध्यक्ष येत्या 3-4 दिवसात बदलण्यात येणार असून, प्रदेश पदाधिकारीपदी काही नवीन नियुक्त्यासुद्धा केल्या जाणार आहेत.
मंगळवार, २१ जानेवारी, २०१४
वीज दर कपातीबाबत काँग्रेसच्या मागणीला राज्य सरकारची मंजुरी- प्रदेश काँग्रेसने केले निर्णयाचे स्वागत
मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: वीज दरांमध्ये कपात करण्याच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, या निर्णयाचे प्रदेश काँग्रेसने स्वागत केले आहे.
सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राकडून विजेचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विजेच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वीज दरात सरसकट 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.
वीज दरांचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्यातील वीज ग्राहकांच्या मागणीला अनुकूल भूमिका घेऊन दर कमी करण्याबाबत शिफारस केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने सरदहू निर्णय घेतला आहे. दरकपातीच्या निर्णयासाठी राज्य सरकारला सुमारे 7200 कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील दर कपातीप्रमाणेच मुंबई महानगरातही वीजेचे दर कमी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. राज्यातील शेतकरी नुकतेच कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे कनेक्शन्स थकबाकीसाठी तोडली जाऊ नये, असेही प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.
राज्यातील बहुतांश काँग्रेस उमेदवारांची घोषणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात
मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पातळीवरील पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची मोठी संख्या असेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.
दि. 20 जानेवारी 2014 रोजी टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे सदस्य मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.श्री गुरूदास कामत, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.श्री जनार्दन चांदूरकर, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण, वनमंत्री श्री पतंगराव कदम, श्री सुरूपसिंग नाईक, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ.श्री राजीव सातव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष आ.श्री जयप्रकाश छाजेड, एनएसयुआयचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ.श्री माणिकराव ठाकरे म्हणाले की, या बैठकीत राज्यातील सर्वच्या 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे व परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. परंतु, काँग्रेसने नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन समोर जाण्याची काँग्रेसची भूमिका घेतली आहे व ती आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढण्यास प्रदेश काँग्रेसचे निवड मंडळ अनुकूल आहे. विविध पक्षांसोबत आघाडीचा निर्णय घेणा-या संरक्षण मंत्री श्री ए. के. अॅन्थनी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील समितीकडे तसा अहवाल देखील रवाना करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरून बोलणी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर लगेच उपरोक्त समविचारी पक्षांशी जागावाटपाची बोलणी केली जाईल, असेही आ.श्री ठाकरे म्हणाले.
बुधवार, १५ जानेवारी, २०१४
सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प या नव्या गृहसंकुलाच्या योजनापुस्तिकेची विक्री 16 जानेवारीपासून सुरु
नवी मुंबई (खारघर)दि. १५ - महाराष्ट्रातील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे सिडको पुन्हा एकदा व्हॅलीशिल्प हा भव्य गृहप्रकल्प घेऊन येत आहे. नवी मुंबई, खारघर, सेक्टर 36 मध्ये साकारलेला हा गृहप्रकल्प 16 जानेवारी 2014 पासून लोकांसाठी खुला होत आहे.
या प्रकल्पासाठीचे अर्ज 16 जानेवारी ते 5 फेबुवारी 2014 या काळात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत तर शनिवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे अर्ज उपलब्ध होणार नाहीत. व्हॅलीशिल्पच्या अर्जाची किंमत रुपये 500/- (+ रु. 25/- वॅट) एवढी असेल. हे अर्ज, तळ मजला, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तिसरा मजला,
पणन विभाग-2, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, अकरावा मजला, निर्मल, नरिमन पाँईट,
मुंबई, टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा या ठिकाणी उपलब्ध होतील.
अर्जदारांनी नोंदणी शुल्काच्या रकमेचा सिडको लिमिटेडच्या नावे काढलेला व नवी मुंबई येथे देय असलेल्या डीडी अथवा पे ऑर्डर सहीत अर्ज 20 फेबुवारी 2014 पर्यंत टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत सादर करावा. कुरीअर अथवा पोस्टाने पाठवलेले अर्ज गाह्य धरले जाणार नाही.
या गृहसंकुलासाठी सिडकोने पात्रतेचे काही निकष ठेवले आहेत. अर्जदाराचे कौटुंबिक मासिक उत्पन्न 62,000/- रुपये पर्यंत असेल तर त्यांना मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकेसाठी अर्ज करता येईल. उच्च उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा नाही. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कमीतकमी 15 वर्षांचा रहिवासी असावा, तसेच अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाचेही नवी मुंबईत घर नसावे.
शासनाच्या आरक्षण धोरणानुसार या गृहसंकुलात विविध प्रवर्गांसाठी काही सदनिका राखीव असतील. त्याचबरोबर सिडको यावेळी प्रथमच विशेष प्रवर्गांसाठी राखीव कोट्यातील काही सदनिका उपलब्ध करुन देणार आहेत. त्यात महाराष्ट्र विधानसभा/परिषदचे विद्यमान सदस्य, नवी मुंबईतले पत्रकार तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त यांचा समावेश आहे.
व्हॅलीशिल्प हे 6.45 हेक्टरच्या विस्तीर्ण भूखंडावर साकारण्यात आलेलं निसर्गाच्या सान्निध्यातलं आणि आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त असं भव्य गृहसंकुल आहे. यात मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी मिळून एकूण 1224 सदनिका आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी 802 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1015.42 + 55.58 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 609 + 45.19 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 49 ते 60 लाख रुपये एवढी आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 422 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1515.76 + 58.96 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 1024.56 + 58.18 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 96 लाख ते 1.07 कोटी रुपये एवढी आहे.
व्हॅलीशिल्पमध्ये उत्तमोत्तम आणि आधुनिक सुविधा देण्याचा सिडकोने पूरेपूर प्रयत्न केला आहे. यात दोन उद्वाहकांसहित वातानुकुलित क्लब हाऊस, सर्व आधुनिक सोयींनीयुक्त फिटनेस सेंटर (टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, टेबल टेनिस, स्नूकर, चेस, कॅरम इ.), जॉगिंग ट्रॅक, स्नेहसंमेलनांसाठी आणि कार्यकमांसाठी सभागृह, लहान मुलांसाठी खेळांसह बगीचे, मैदाने, पाळणाघर, लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी जलतरण तलाव, बहुस्तरीय वाहनतळ आदी सुविधा आहेत.
घराच्या अंतर्गत सुविधांबाबतीत सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. घराचा मुख्य दरवाजा अग्नी रोधक असून फेम्स आणि फिटिंग्सने परिपूर्ण आहे तर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.
उत्तम प्रकल्प स्थळामुळे हे गृहसंकुल नवी मुंबईत लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री वाटते. हा गृहप्रकल्प प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो स्थानकापासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोयीच्या वाहतुकीने जोडलेला आहे. प्रसिध्द सेन्ट्रल पार्क आणि गोल्फ कोर्स केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर तर खारघर रेल्वे स्थानक 7 किमी अंतरावर आहे. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक आदी सर्व सुविधा संकुलाच्या अगदी जवळ आहेत तर पांडवकडा धबधबा हे प्रसिध्द पर्यटनस्थळ केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
नवी मुंबई मध्ये स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचे स्वप्न व्हॅलीशिल्पच्या माध्यमातून साकार होईल याची सिडकोला खात्री आहे. ज्यांना या प्रकल्पाचा एक भाग होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रकल्पस्थळी सॅम्पल फ्लॅट अवलोकनार्थ उपलब्ध आहे. सिडकोने या पूर्वीही उन्नती, वास्तुविहार, सेलिबेशन्स, स्पॅगेटी तसेच सीवूडस इस्टेटच्या माध्यमातून अनेकांना आपले घराचं स्वप्न साकार करण्याची संधी दिली आहे आणि सिडको कायमच या कामाप्रती बांधील राहील.
सोमवार, १३ जानेवारी, २०१४
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाई समस्या तीव्र - संच क्र. ५ बंद
मुंबई, ता. १३ - महानिर्मितीच्या ११३० मेगावॉट क्षमतेच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाईची समस्या तीव्र झाली असून सध्या जेमतेम सरासरी १ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या संच क्र. ५ बंद करण्यात आला असून अन्य संच देखील पुरेशा कोळशाअभावी पूर्ण क्षणतेनेचालविता येत नाहीत.
परळी औष्णिक विद्युत केंद्रास कोळसा पुरवठा करणार्या मे. एम.सी.एल., मे. एस.ई.सी.एल., मे. डब्ल्यू.सी.एल. या सर्व कोळसा कंपन्यांशी पुरेसा कोळसा मिळण्यासाठी महानिर्मितीचा सातत्याने पुरवठा सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी सुमारे ६ महिन्यांहून अधिक काळ परळी औष्णिक विद्युत केंद्र पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने बंद ठेवावे लागले होते. असे महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी कळविले आहे.
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने महान उद्योजक हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवसायातील कारागिर आणि कामगारांच्या श्रमांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे आपल्या यशाचं श्रेय त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच यशात सहभागी करुन घेतलं, यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
माणसं जोडणं, संघटना बांधणं, लोकांच्या हक्कांसाठी लढणं, संकटांच्या-अडचणींच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं या आपल्या स्वभावगुणांमुळे त्यांनी पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. पुणेकरांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. अनेक मानसन्मानांनी त्यांचा गौरव केला. दाजीकाकांनी त्यांच्या पत्नी कमलाबाईंच्या निधनानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने न उतरवता ते वैकुंठधामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच ठेवून देण्याचा निर्णय घेतला होता. लातूर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भरीव निधी उभारण्यातही त्यांचा पुढाकार होता. अशा अनेक घटनांमधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी सिद्ध करुन दाखवली. त्यांच्यासारखा उद्योजक आणि उमद्या मनाचा माणूस निघून जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...