सोमवार, १३ जानेवारी, २०१४

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाई समस्या तीव्र - संच क्र. ५ बंद

मुंबई, ता. १३ - महानिर्मितीच्या ११३० मेगावॉट क्षमतेच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाईची समस्या तीव्र झाली असून सध्या जेमतेम सरासरी १ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या संच क्र. ५ बंद करण्यात आला असून अन्य संच देखील पुरेशा कोळशाअभावी पूर्ण क्षणतेनेचालविता येत नाहीत. परळी औष्णिक विद्युत केंद्रास कोळसा पुरवठा करणार्‍या मे. एम.सी.एल., मे. एस.ई.सी.एल., मे. डब्ल्यू.सी.एल. या सर्व कोळसा कंपन्यांशी पुरेसा कोळसा मिळण्यासाठी महानिर्मितीचा सातत्याने पुरवठा सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी सुमारे ६ महिन्यांहून अधिक काळ परळी औष्णिक विद्युत केंद्र पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने बंद ठेवावे लागले होते. असे महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी कळविले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...