मुख्य सामग्रीवर वगळा

भुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्षिके!

म्हापसा, गोवा, दि. 4 एप्रिल : महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवर (बीचेस) जीवरक्षक सेवा सुरू करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या समता मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या श्री. भुजबळ यांनी आज सकाळी येथील सिंकेरी बीचवर कार्यरत असलेल्या 'दृष्टी लाइफगाड्र्स'तर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाची, त्यांच्या यंत्रणेची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, बीचवर आनंदासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यास जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर गोव्यामधील विविध बीचेसवर लाईफगाड्र्सच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता उत्तमरित्या जपली जात आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने आज या सिंकेरी बीचवरील लाईफगाड्र्सच्या कामकाजाची माहिती घेतली असता यंदाच्या मोसमात एकाही व्यक्तीचा बळी याठिकाणी गेलेला नाही, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. लाईफगाड्र्सच्या जलद प्रतिसादामुळे येथे शेकडो लोकांचे जीव वाचले. त्याचप्रमाणे स्थानिकांना प्राधान्याने उत्तम प्रशिक्षण देऊन लाइफगार्ड म्हणून रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकते, ही बाबही अधोरेखित झाली, असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी दृष्टी लाईफगाड्र्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वीरेंद्र कंवर आणि उपाध्यक्ष राजेश गर्ग यांनी श्री. भुजबळ यांना येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची सविस्तर माहिती दिली. जीवरक्षक दलातील सर्व सदस्य वॉकी-टॉकीद्वारे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतात. व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकजण बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सक्षम असून त्याला तातडीच्या मदतीसाठी जेट-स्की, हाय स्पीड क्राफ्ट अशा बोटी तैनात असतात. त्याचप्रमाणे जीवरक्षक दलाच्या जीपही तातडीच्या मदतीसाठी किनाऱ्यावर उपलब्ध असतात, अशी माहिती त्यांनी श्री. भुजबळ यांना दिली. एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे वाचवता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिकही भुजबळ यांना दाखविण्यात आले. त्यानंतर जीवरक्षक दलाकडे असणाऱ्या अत्याधुनिक साधनसामुग्रीची, जीवरक्षक दलातील सदस्यांसाठी कंपनीने उपलब्ध केलेली सुसज्ज व्यायामशाळा आणि त्यांच्या निवासव्यवस्थेचीही भुजबळ यांनी पाहणी केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.