मुख्य सामग्रीवर वगळा

कोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी प्रभावी प्रस्ताव सादर करा: भुजबळ

मुंबई, ता. ७ - कोकणात, विशेषतः सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीची मोठी क्षमता आहे. तसेच कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असे समुद्र किनारे आहेत. यामुळे जगभरातून पर्यटक यावेत यासाठी कोकणला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळावे, यासाठी पर्यटनविषयक मोजकेच परंतू प्रभावी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
बाराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या कोकणपट्टीतल्या चार जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित तसेच प्रगतीपथावरील कामांच्या सद्यस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्ह्यातील पर्यटन, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. या आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राला सन २००६ ते २०१० या तीन वर्षांच्या कालावधीत सागरी किनारा विकासाकरिता दरवर्षी ६२ कोटी ५० लाख रुपये यानुसार २२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ठाणे रु. १८ कोटी ८९ लाख, रायगड रु. २४ कोटी ८० लाख, रत्नागिरी रु. ५२ कोटी ५७ लाख, सिंधुदुर्ग रु. ८८ कोटी ९९ लाख आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ रु. ४५ कोटी ७३ लाख याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत श्रीवर्धन, गणपतीपुळे, माथेरान, नेरळ, किल्लेरायगड, मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, बाणकोट किल्ला, बागमांडला, लोटे-परशुराम, हर्णे-मुरुड, गुहागर, आंगणेवाडी, रांगणागड, तारकर्ली, सावंतवाडी, कुणकेश्वर, मालवण, मिठबाव, आंबोली, निवती भोगवे, जयगड इ. विविध ठिकाणी मंजूर तसेच प्रगतीपथावरील कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012