मुख्य सामग्रीवर वगळा

कोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी प्रभावी प्रस्ताव सादर करा: भुजबळ

मुंबई, ता. ७ - कोकणात, विशेषतः सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीची मोठी क्षमता आहे. तसेच कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असे समुद्र किनारे आहेत. यामुळे जगभरातून पर्यटक यावेत यासाठी कोकणला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळावे, यासाठी पर्यटनविषयक मोजकेच परंतू प्रभावी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
बाराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या कोकणपट्टीतल्या चार जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित तसेच प्रगतीपथावरील कामांच्या सद्यस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्ह्यातील पर्यटन, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. या आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राला सन २००६ ते २०१० या तीन वर्षांच्या कालावधीत सागरी किनारा विकासाकरिता दरवर्षी ६२ कोटी ५० लाख रुपये यानुसार २२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ठाणे रु. १८ कोटी ८९ लाख, रायगड रु. २४ कोटी ८० लाख, रत्नागिरी रु. ५२ कोटी ५७ लाख, सिंधुदुर्ग रु. ८८ कोटी ९९ लाख आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ रु. ४५ कोटी ७३ लाख याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत श्रीवर्धन, गणपतीपुळे, माथेरान, नेरळ, किल्लेरायगड, मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, बाणकोट किल्ला, बागमांडला, लोटे-परशुराम, हर्णे-मुरुड, गुहागर, आंगणेवाडी, रांगणागड, तारकर्ली, सावंतवाडी, कुणकेश्वर, मालवण, मिठबाव, आंबोली, निवती भोगवे, जयगड इ. विविध ठिकाणी मंजूर तसेच प्रगतीपथावरील कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.