मुख्य सामग्रीवर वगळा

उपनिबंधक राजेंद्र मगर यांचे निधन

शिरूर (जिल्हा पुणे) येथे तहसील कार्यालयात उपनिबंधक असलेले राजेंद्र गुलाबराव मगर (वय ४६) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, वडील, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. सोमवारी दुपारी कोपरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील उपखेड (ता. चाळीसगाव)  येथील राहिवाशी असलेले मगर गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव बेट येथे स्थायिक होते. अत्यंत दानशूर आणि धार्मिक तसेच त्यांच्या मनमिळावू परिस्थितीमुळे त्यांचा मित्रपरिवारही दांडगा होता. 'राजाभाऊ' या नावाने ते तहसील विभागात व मित्रपरिवारातही लोकप्रिय होते. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून  ते पहिल्याच प्रयत्नात स्टाफ सिलेक्शनमार्फ़त सरकारी सेवेत दाखल झाले होते. त्यांना तहसील विभागाचा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा तसेच राजपत्रीत अधिकारी महासंघाचाही गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012